शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

कांदा भडकला, कोथिंबीर आवाक्यात, रताळ्यांची आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 17:44 IST

vegetable, market, kolhapur अनलॉकअंतर्गत निर्बंध शिथिल केल्यानंतर पाच महिन्यांनंतर रविवारी लक्ष्मीपुरीचा आठवडा बाजार भरला. पहिल्याच दिवशी बाजार हाऊसफुल्ल झाला. दसऱ्याच्या निमित्ताने फळांची आवक मोठ्या प्रमाणावर झाली असून, खरेदीसाठीही झुंबड उडाली आहे. रताळ्यांची आवक मोठ्या प्रमाणावर झाली आहे. भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. कांद्याच्या दराने पन्नाशी ओलांडली आहे.

ठळक मुद्दे कांदा भडकला, कोथिंबीर आवाक्यात, रताळ्यांची आवक वाढलीनिर्बंध उठल्यानंतर पहिलाच आठवडा बाजार फुल्ल

कोल्हापूर : अनलॉकअंतर्गत निर्बंध शिथिल केल्यानंतर पाच महिन्यांनंतर रविवारी लक्ष्मीपुरीचा आठवडा बाजार भरला. पहिल्याच दिवशी बाजार हाऊसफुल्ल झाला. दसऱ्याच्या निमित्ताने फळांची आवक मोठ्या प्रमाणावर झाली असून, खरेदीसाठीही झुंबड उडाली आहे. रताळ्यांची आवक मोठ्या प्रमाणावर झाली आहे. भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. कांद्याच्या दराने पन्नाशी ओलांडली आहे.पावसामुळे भाजीपाला कुजल्याने बाजारात टंचाई आहे. तरीदेखील खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. पालेभाज्या कमी प्रमाणात दिसत असून, दरही चढेच आहे. मेथी २५ ते ३० रुपये पेंढी आहे, कोथिंबीरचे दर आवाक्यात आले असून, ३० रुपयांची पेंढी आता १० ते १५ रुपयांवर आली आहे. उपवासासाठी रताळ्यांची मागणी वाढल्याने दरही ३० ते ४० रुपये किलोवर स्थिर आहेत. कांदा ५० ते ६०, लसूण १२०, बटाटा ४० रुपये किलो असा भाव आहे.धान्यबाजार वधारलासणासुदीचा हंगाम सुरू झाल्याने धान्य, कडधान्यांची मागणी वाढते, दरही वाढतात. त्याची सुरुवात बाजारात दिसत आहे. तांदूळ २५ ते ७५ रुपये किलो आहे. ज्वारी ४० ते ५६ रुपये, गहू ३० ते ३८ रुपये आहे. कडधान्यामध्येही दरात वाढच आहे. हरभरा डाळ ७० रुपयांवर स्थिर आहे. मटकी १११०, मसूरा व मसूर डाळ ८०, चवळी ८०, मूग डाळ १०० असे दर चढतच आहेत.भाजीपाला कडाडलाभाजीपाल्याचे दर ८० ते १२० रुपयांवर गेले आहेत. वांगी, दोडका १२० भेंडी, बिन्स, वरणा, कारली ८० रुपये किलो आहेत. टोमॅटो ४० रुपये किलो आहेत. काकडी ३० रुपये किलो आहे. कडीपत्ता, पुदीना १० रुपये पेंढी आहे. फ्लावर ३० ते ५० रुपये नग आहे.फळ बाजारात स्वस्ताईभाजीपाला, धान्यात महागाईने टोक गाठलेले असताना त्या तुलनेत फळबाजारात काहीशी स्वस्ताई नांदत आहे. सफरचंद, डाळिंब, मोसंबी ८० रुपये किलो, केळी २० ते ४० रुपये डझन, चिकू ४० रुपये किलो असा दर आहे. 

धान्य बाजारात आवक कमी आहे. दरात चढउतार आहेत. आता सणावारामुळे मागणी वाढू लागली आहे.अनिल महाजन, धान्य व्यापारी

पाच महिन्यांपासून आठवडा बाजार बंद असल्याने भाजी विक्रीवर मर्यादा होत्या. आता बाजार सुरू झाल्याने भाजी विक्री सुरू केली आहे. घर चालविण्यापुरते पैसे मिळणार असल्याने आनंदी आहे.- आदम मुजावर,भाजी विक्रेता

मी पन्हाळ्याहून भाजी विक्रीसाठी आले आहे. मूळचे बंगळूरचे; पण आम्ही शेतात जंगली वांगे लावले आहे, त्याच्या विक्रीसाठी आले आहे.सन्मती कांबळे, पन्हाळा 

टॅग्स :Marketबाजारvegetableभाज्याkolhapurकोल्हापूर