शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

एक कदम (अ)स्वच्छता’ की ओर...कोल्हापूर शहर स्वच्छ राहीलच कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 01:15 IST

एका हाताने कधी टाळी वाजतही नाही आणि टाळीसाठी दोन्ही हात एकत्र करायचेच नाहीत, हा अलिखित नियम आपल्या समाजाने अमलात नाही आणला तर नवलच.

कोल्हापूर : एका हाताने कधी टाळी वाजतही नाही आणि टाळीसाठी दोन्ही हात एकत्र करायचेच नाहीत, हा अलिखित नियम आपल्या समाजाने अमलात नाही आणला तर नवलच. सर्वच स्तरावर स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणावर अभियान राबविण्यात येत असताना ‘गांधारी’ची भूमिका बजावणाऱ्यांना जागरूक करणे कठीण काम आहे. कोल्हापुरातील रेल्वेफाटक परिसरातील भिंतीवर महानगरपालिकेने स्वच्छता अभियानासाठी फलक लावूनही तेथे असा मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचा ढीग पहावयास मिळतो.

कोल्हापूर शहर स्वच्छ राहावे म्हणून महापालिकेतर्फे अनेकदा स्वच्छता अभियान राबविण्याबरोबरच ठिकठिकाणी जनजागृतीसाठी सुंदर-आकर्षक फलक लावण्यात आले आहे; तरीही स्वच्छता राखा असे फलक नजरेसमोर दिसत असतानाही काही छोटे-मोठे व्यावसायिक, नागरिक, भाजीपाला विक्रेते हे बिनधास्तपणे शहरातील राजारामपुरी रोडसमोर रेल्वेफाटकजवळ असा कचरा टाकून आपल्या अस्वच्छ मनाच्या संस्कृतीचे दर्शन घडवित आहेत.

त्यामुळे हे शहर स्वच्छ राहीलच कसे? या अस्वच्छतेला नेमके कोण जबाबदार असा प्रश्न निर्माण होत आहे. अनेक ठिकाणी असे दृष्य कोल्हापुरात पहायला मिळते. जिथे जिथे महापालिका प्रशासनाने स्वच्छता अभियानविषयी जनजागृतीचे फलक लावले आहेत, नेमके त्याचठिकाणी काही नागरिक बिनधिक्कतपणे कचरा टाकण्याचे धाडस करून आपल्या स्वच्छ शहराचा चेहरा अस्वच्छ बनविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे महापालिकेने शहर स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न करायचा आणि नागरिक कचरा करण्यासाठी पुढे येत असतील, तर अशा अस्वच्छ शहराचा चेहरा बनविण्यासाठी नेमके कोण जबाबदार असाच सवाल येथे उपस्थित होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान