शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

महालक्ष्मी एक्स्प्रेसचा एक आरक्षित डबा शनिवारपासून कमी, रेल्वे संघटना आक्रमक 

By संदीप आडनाईक | Updated: May 22, 2024 14:13 IST

संदीप आडनाईक कोल्हापूर : मध्य रेल्वेच्या पुणे विभागात सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या रेल्वे गाडीपैकी एक असलेल्या कोल्हापूर -मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेसला ...

संदीप आडनाईककोल्हापूर : मध्य रेल्वेच्या पुणे विभागात सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या रेल्वे गाडीपैकी एक असलेल्या कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेसला जोडलेला एक आरक्षित डबा शनिवारपासून (दि.२५ मे) पासून कमी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतल्याने रेल्वे प्रवासी संघटना आक्रमक झाली आहे. डबा कमी करण्यापेक्षा वाढवण्याची मागणी असताना रेल्वे प्रशासन कोल्हापूरकरांवर अन्याय करत असल्याने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे.कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूरसाठी (ट्रेन क्रमांक १७४११/१७४१२) महालक्ष्मी एक्स्प्रेसचे सर्व जुने आयसीएफ कोच बदलून जानेवारी २०२४ पासून नवीन एलएचबी कोच जोडले आहेत. प्रवासी आरामदायी आणि सुखकर प्रवासाचा आनंद घेत असतानाच प्रशासनाने या गाडीचा एस ११ हा आरक्षित डबा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आजही या रेल्वेला ५०० पेक्षा जास्त वेटिंग असते. ही गाडी कोल्हापूर येथून रोज रात्री ८:५० वाजता मुंबईसाठी सुटते.उत्पन्न देणारी गाडी..कोल्हापुरातून सुटणाऱ्या या गाडीच्या प्रत्येक फेरीमधून रेल्वेला १५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. मध्य रेल्वेच्या पुणे विभागात सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या रेल्वे गाडीपैकी महालक्ष्मी एक्स्प्रेस या गाडीचा समावेश असतानाही या गाडीचा एक डबा १९७१ पासून धावतेय महालक्ष्मी मीटर गेजची ब्रॉड गेजमध्ये परिवर्तन झाल्यापासून म्हणजे १८ मार्च १९७१ या दिवसांपासून ही एक्स्प्रेस कोल्हापुरातून या मार्गावर सातत्याने धावत आली आहे. २७ जुलै २०१९ या दिवशी ही गाडी महापुरामुळे बदलापूर आणि वांगनी स्टेशनदरम्यान १२ ते १५ तास थांबून राहिली होती.

मध्य रेल्वेला उत्पन्न देणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेसला दोन डबे वाढविण्याची मागणी असताना आता एक आरक्षित डबा कमी करण्यात येणार आहे. हे अन्यायकारक आहे. हा निर्णय रद्द न केल्यास नाईलाजाने तीव्र आंदोलन करावे लागेल. -सुहास गुरव, अध्यक्ष, महाराष्ट्र रेल्वे व रोड पॅसेंजर्स असोसिएशन 

कोल्हापूरहून सुटणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेसला ५०० पेक्षा जास्त वेटिंग असते, त्यामुळे एस १२ आरक्षित एलएचबी कोच वाढवण्याची मागणी केली आहे. परंतु आता आहे त्यातीलच एक डबा कमी करण्याचा निर्णय धक्कादायक आहे. सह्याद्री सुरू नसल्यामुळे या गाडीवर लोड वाढलेला आहे, तो कमी करण्याऐवजी प्रशासन भलतेच निर्णय घेत आहे. कोल्हापूरचे प्रवासी हे सहन करणार नाहीत. -शिवनाथ बियाणी, सदस्य, मुंबई रेल्वे सल्लागार सदस्य.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरrailwayरेल्वे