शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

महालक्ष्मी एक्स्प्रेसचा एक आरक्षित डबा शनिवारपासून कमी, रेल्वे संघटना आक्रमक 

By संदीप आडनाईक | Updated: May 22, 2024 14:13 IST

संदीप आडनाईक कोल्हापूर : मध्य रेल्वेच्या पुणे विभागात सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या रेल्वे गाडीपैकी एक असलेल्या कोल्हापूर -मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेसला ...

संदीप आडनाईककोल्हापूर : मध्य रेल्वेच्या पुणे विभागात सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या रेल्वे गाडीपैकी एक असलेल्या कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेसला जोडलेला एक आरक्षित डबा शनिवारपासून (दि.२५ मे) पासून कमी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतल्याने रेल्वे प्रवासी संघटना आक्रमक झाली आहे. डबा कमी करण्यापेक्षा वाढवण्याची मागणी असताना रेल्वे प्रशासन कोल्हापूरकरांवर अन्याय करत असल्याने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे.कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूरसाठी (ट्रेन क्रमांक १७४११/१७४१२) महालक्ष्मी एक्स्प्रेसचे सर्व जुने आयसीएफ कोच बदलून जानेवारी २०२४ पासून नवीन एलएचबी कोच जोडले आहेत. प्रवासी आरामदायी आणि सुखकर प्रवासाचा आनंद घेत असतानाच प्रशासनाने या गाडीचा एस ११ हा आरक्षित डबा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आजही या रेल्वेला ५०० पेक्षा जास्त वेटिंग असते. ही गाडी कोल्हापूर येथून रोज रात्री ८:५० वाजता मुंबईसाठी सुटते.उत्पन्न देणारी गाडी..कोल्हापुरातून सुटणाऱ्या या गाडीच्या प्रत्येक फेरीमधून रेल्वेला १५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. मध्य रेल्वेच्या पुणे विभागात सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या रेल्वे गाडीपैकी महालक्ष्मी एक्स्प्रेस या गाडीचा समावेश असतानाही या गाडीचा एक डबा १९७१ पासून धावतेय महालक्ष्मी मीटर गेजची ब्रॉड गेजमध्ये परिवर्तन झाल्यापासून म्हणजे १८ मार्च १९७१ या दिवसांपासून ही एक्स्प्रेस कोल्हापुरातून या मार्गावर सातत्याने धावत आली आहे. २७ जुलै २०१९ या दिवशी ही गाडी महापुरामुळे बदलापूर आणि वांगनी स्टेशनदरम्यान १२ ते १५ तास थांबून राहिली होती.

मध्य रेल्वेला उत्पन्न देणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेसला दोन डबे वाढविण्याची मागणी असताना आता एक आरक्षित डबा कमी करण्यात येणार आहे. हे अन्यायकारक आहे. हा निर्णय रद्द न केल्यास नाईलाजाने तीव्र आंदोलन करावे लागेल. -सुहास गुरव, अध्यक्ष, महाराष्ट्र रेल्वे व रोड पॅसेंजर्स असोसिएशन 

कोल्हापूरहून सुटणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेसला ५०० पेक्षा जास्त वेटिंग असते, त्यामुळे एस १२ आरक्षित एलएचबी कोच वाढवण्याची मागणी केली आहे. परंतु आता आहे त्यातीलच एक डबा कमी करण्याचा निर्णय धक्कादायक आहे. सह्याद्री सुरू नसल्यामुळे या गाडीवर लोड वाढलेला आहे, तो कमी करण्याऐवजी प्रशासन भलतेच निर्णय घेत आहे. कोल्हापूरचे प्रवासी हे सहन करणार नाहीत. -शिवनाथ बियाणी, सदस्य, मुंबई रेल्वे सल्लागार सदस्य.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरrailwayरेल्वे