शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

महालक्ष्मी एक्स्प्रेसचा एक आरक्षित डबा शनिवारपासून कमी, रेल्वे संघटना आक्रमक 

By संदीप आडनाईक | Updated: May 22, 2024 14:13 IST

संदीप आडनाईक कोल्हापूर : मध्य रेल्वेच्या पुणे विभागात सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या रेल्वे गाडीपैकी एक असलेल्या कोल्हापूर -मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेसला ...

संदीप आडनाईककोल्हापूर : मध्य रेल्वेच्या पुणे विभागात सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या रेल्वे गाडीपैकी एक असलेल्या कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेसला जोडलेला एक आरक्षित डबा शनिवारपासून (दि.२५ मे) पासून कमी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतल्याने रेल्वे प्रवासी संघटना आक्रमक झाली आहे. डबा कमी करण्यापेक्षा वाढवण्याची मागणी असताना रेल्वे प्रशासन कोल्हापूरकरांवर अन्याय करत असल्याने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे.कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूरसाठी (ट्रेन क्रमांक १७४११/१७४१२) महालक्ष्मी एक्स्प्रेसचे सर्व जुने आयसीएफ कोच बदलून जानेवारी २०२४ पासून नवीन एलएचबी कोच जोडले आहेत. प्रवासी आरामदायी आणि सुखकर प्रवासाचा आनंद घेत असतानाच प्रशासनाने या गाडीचा एस ११ हा आरक्षित डबा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आजही या रेल्वेला ५०० पेक्षा जास्त वेटिंग असते. ही गाडी कोल्हापूर येथून रोज रात्री ८:५० वाजता मुंबईसाठी सुटते.उत्पन्न देणारी गाडी..कोल्हापुरातून सुटणाऱ्या या गाडीच्या प्रत्येक फेरीमधून रेल्वेला १५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. मध्य रेल्वेच्या पुणे विभागात सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या रेल्वे गाडीपैकी महालक्ष्मी एक्स्प्रेस या गाडीचा समावेश असतानाही या गाडीचा एक डबा १९७१ पासून धावतेय महालक्ष्मी मीटर गेजची ब्रॉड गेजमध्ये परिवर्तन झाल्यापासून म्हणजे १८ मार्च १९७१ या दिवसांपासून ही एक्स्प्रेस कोल्हापुरातून या मार्गावर सातत्याने धावत आली आहे. २७ जुलै २०१९ या दिवशी ही गाडी महापुरामुळे बदलापूर आणि वांगनी स्टेशनदरम्यान १२ ते १५ तास थांबून राहिली होती.

मध्य रेल्वेला उत्पन्न देणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेसला दोन डबे वाढविण्याची मागणी असताना आता एक आरक्षित डबा कमी करण्यात येणार आहे. हे अन्यायकारक आहे. हा निर्णय रद्द न केल्यास नाईलाजाने तीव्र आंदोलन करावे लागेल. -सुहास गुरव, अध्यक्ष, महाराष्ट्र रेल्वे व रोड पॅसेंजर्स असोसिएशन 

कोल्हापूरहून सुटणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेसला ५०० पेक्षा जास्त वेटिंग असते, त्यामुळे एस १२ आरक्षित एलएचबी कोच वाढवण्याची मागणी केली आहे. परंतु आता आहे त्यातीलच एक डबा कमी करण्याचा निर्णय धक्कादायक आहे. सह्याद्री सुरू नसल्यामुळे या गाडीवर लोड वाढलेला आहे, तो कमी करण्याऐवजी प्रशासन भलतेच निर्णय घेत आहे. कोल्हापूरचे प्रवासी हे सहन करणार नाहीत. -शिवनाथ बियाणी, सदस्य, मुंबई रेल्वे सल्लागार सदस्य.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरrailwayरेल्वे