शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

रेल्वेच्या १०८ प्रवाशांच्या तिकिटांचे एक लाख रुपये परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 15:11 IST

बदलापूर-वांगणी दरम्यानच्या पुरामुळे मध्य रेल्वेने कोल्हापूर-मुंबई मार्गावर धावणारी श्री महालक्ष्मी एक्सप्रेस दोन दिवसांपासून रद्द केली आहे. रेल्वे रद्द झाल्याने या मार्गावरून प्रवासासाठी आरक्षण केलेल्या १०७ प्रवाशांना रेल्वेने त्यांच्या तिकिटांचे एकूण एक लाख दोन हजार ९६५ रुपये परत केले आहेत. रेल्वे विभागाने तिकिटांची पूर्ण रक्कम दिली आहे.

ठळक मुद्देरेल्वेच्या १०८ प्रवाशांच्या तिकिटांचे एक लाख रुपये परततीन दिवसांत मिळतो परतावा; रविवारी बाराजणांचे तिकीट रद्द

कोल्हापूर : बदलापूर-वांगणी दरम्यानच्या पुरामुळे मध्य रेल्वेनेकोल्हापूर-मुंबई मार्गावर धावणारी श्री महालक्ष्मी एक्सप्रेस दोन दिवसांपासून रद्द केली आहे. रेल्वे रद्द झाल्याने या मार्गावरून प्रवासासाठी आरक्षण केलेल्या १०७ प्रवाशांना रेल्वेने त्यांच्या तिकिटांचे एकूण एक लाख दोन हजार ९६५ रुपये परत केले आहेत. रेल्वे विभागाने तिकिटांची पूर्ण रक्कम दिली आहे.कोल्हापूरहून मुंबईला जाण्यासाठी शनिवारी (दि. २७) १०८ प्रवाशांनी तिकीट आरक्षित केले होते. मात्र, पुरामुळे श्री महालक्ष्मी एक्सप्रेस रद्द झाल्याने संबंधित सर्व प्रवाशांची तिकिटे रद्द झाली. या तिकिटांच्या रकमेपोटी एकूण एक लाख दोन हजार ९६५ रुपये इतका परतावा रेल्वे विभागाने दिला आहे.

रविवारी मुंबईहून कोल्हापूरला येणारी आणि कोल्हापूरमधून मुंबईला जाणारी रेल्वे रद्द करण्यात आली. त्यामुळे मुंबईसाठीचे एकूण ११, तर मुंबईहून कोल्हापूरसाठीच्या एका प्रवाशाने तिकीट रद्द केले आहे.दोन काउंटरची सुविधारेल्वे रद्द झाल्याने आरक्षित केलेल्या तिकिटांचे पूर्ण पैसे दिले जात आहेत. तीन दिवसांत रेल्वेच्या निर्धारित वेळेत तिकिटाचे पैसे प्रवाशांना परत घेता येतात. त्यासाठी तिकीट आणि ते रद्द करीत असल्याचा अर्ज प्रवाशांनी भरून देणे आवश्यक असते.

कोल्हापूर रेल्वेस्थानकावर प्रशासनाने तिकिटांचे पैसे देण्यासाठी दोन काउंटरची सुविधा उपलब्ध करून दिली असल्याची माहिती पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी दिली. 

 

टॅग्स :railwayरेल्वेkolhapurकोल्हापूर