शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

यंदा सर्वच शाळांचा निकाल शंभर टक्के !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:18 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शालेय शिक्षण विभागाने दहावीची परीक्षा रद्द केली. इयत्ता नववीचे अंतिम गुण आणि दहावीतील अंतर्गत परीक्षांच्या ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शालेय शिक्षण विभागाने दहावीची परीक्षा रद्द केली. इयत्ता नववीचे अंतिम गुण आणि दहावीतील अंतर्गत परीक्षांच्या गुणांवर मूल्यमापन करण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, कोरोनामुळे जिल्ह्यातील ३० ते ३५ टक्के शाळांमध्ये अंतर्गत तोंडी, लेखी परीक्षाच झालेल्या नाहीत. त्यामुळे मूल्यमापन समान पद्धतीने कसे होणार याबाबत प्रश्न आहे. सद्य स्थितीमध्ये या परीक्षा कशा घ्यावयाच्या आणि विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करायचे हा प्रश्न शिक्षकांसमोर उभारला आहे. अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेतली जाणार आहे, तर मग दहावीची परीक्षा घेण्यास काय हरकत होती असा सवाल पालक आणि विद्यार्थ्यांमधून उपस्थित केला जात आहे. निकाल लावण्याच्या प्रक्रियेतील शिक्षक, मुख्याध्यापकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. शासनाने जाहीर केलेल्या पद्धतीप्रमाणे मूल्यमापन झाल्यास सर्वच शाळांचा निकाल शंभर टक्के लागणार आहे.

चौकट

असे असेल नवे सूत्र

शासनाने जाहीर केल्याप्रमाणे ५०-३०-२० असा दहावी निकालाचा नवा फॉर्म्युला असणार आहे. याअंतर्गत इयत्ता नववीमध्ये मिळालेल्या गुणांचे ५० टक्के गुण, वर्षभरात दहावीच्या विविध लेखी परीक्षांमध्ये मिळणाऱ्या गुणांचे ३० गुणांकनाने लेखी आणि २० गुणांकांनी तोंडी परीक्षेच्या गुणांची बेरीज केली जाणार असल्याची माहिती शासनाने दिली आहे.

चौकट

आयटीआय, तंत्रनिकेतनला निर्णयाची प्रतीक्षा

अकरावीतील प्रवेशासाठी सीईटी घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. मात्र, ही सीईटी ऐच्छिक आहे. दहावीच्या निकालावर आयटीआय, तंत्रनिकेतनमधील प्रवेश होतात. आयटीआयला तंत्रशिक्षण संचालनालयाच्या, तर तंत्रनिकेतनला व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा लागली आहे.

शिक्षणतज्ज्ञ काय म्हणतात?

कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी पूर्णवेळ शाळा भरलेल्या नाहीत. त्यामुळे नववी, दहावीतील परीक्षांबाबतची माहिती बहुतांश शाळांमध्ये अद्ययावत नाही. विविध शिक्षण मंडळांनी नववीच्या निकालासाठी वेगळी प्रक्रिया राबविली आहे. त्यामुळे निकाल लावताना एकसारखेपणा राहणार नाही. एकूणच निकालाबाबत सध्या गोंधळाची स्थिती आहे.

-डॉ. बी. एम. हिर्डेकर, शिक्षणतज्ज्ञ

विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घेतलेला हा निर्णय योग्य आहे. याशिवाय दुसरा पर्याय नाही.

-आय. सी. शेख, प्राचार्य, डाएट

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. त्यामुळे नववीतील अंतिम आणि दहावीतील अंतर्गत गुणांवर मूल्यमापन करण्याचा निर्णय चांगला आहे.

-डी. एस. पोवार, शिक्षण निरीक्षक

पालक काय म्हणतात?

कोरोनामुळे नववीमध्ये असताना या विद्यार्थ्यांचे वर्ग भरले नाहीत. त्यामुळे नववीच्या गुणांचा दहावीच्या मूल्यमापनासाठी आधार घेणे योग्य वाटत नाही. परीक्षा झाली असती, तर बरे झाले असते. पण, कोरोनामुळे ते शक्य नाही.

-संजय मांडवकर, कनाननगर.

सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाता आलेले नाही. ऑनलाईन शिक्षण झाले, पण ते देखील परिणामकारकपणे झालेले नाही. त्यामुळे नववी, दहावीतील गुणांच्या आधारे कसे मूल्यमापन होणार याबाबत काहीच समजेना झाले आहे.

-अर्चना पुरेकर, शाहुपुरी.

विद्यार्थ्यांमध्ये संमिश्र वातावरण

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑफलाईन परीक्षा रद्द करण्याचा निर्णय योग्य आहे. मात्र, ऑनलाईन स्वरूपात परीक्षा घेऊन आमचे मूल्यांकन केले असते, तर ते पुढील शिक्षणासाठी आम्हाला बरे झाले असते.

-नैनेश जंगले, प्रियदर्शनी कॉलनी.

दहावीचा निकाल लावताना इयत्ता नववीतील गुणांवर ५० टक्के गुण दिले जाणार आहेत. त्यामुळे आम्ही पास होणारच यात काही शंका नाही. पुढील अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी कोणती प्रक्रिया राबविली जाणार हे शासनाने लवकर जाहीर करावे.

-पूर्वा मोहिते, कसबा बावडा.

===Photopath===

010621\01kol_1_01062021_5.jpg

===Caption===

डमी (०१०६२०२१-कोल-स्टार ७६७ डमी)