शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

यंदा सर्वच शाळांचा निकाल शंभर टक्के !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:18 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शालेय शिक्षण विभागाने दहावीची परीक्षा रद्द केली. इयत्ता नववीचे अंतिम गुण आणि दहावीतील अंतर्गत परीक्षांच्या ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शालेय शिक्षण विभागाने दहावीची परीक्षा रद्द केली. इयत्ता नववीचे अंतिम गुण आणि दहावीतील अंतर्गत परीक्षांच्या गुणांवर मूल्यमापन करण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, कोरोनामुळे जिल्ह्यातील ३० ते ३५ टक्के शाळांमध्ये अंतर्गत तोंडी, लेखी परीक्षाच झालेल्या नाहीत. त्यामुळे मूल्यमापन समान पद्धतीने कसे होणार याबाबत प्रश्न आहे. सद्य स्थितीमध्ये या परीक्षा कशा घ्यावयाच्या आणि विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करायचे हा प्रश्न शिक्षकांसमोर उभारला आहे. अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेतली जाणार आहे, तर मग दहावीची परीक्षा घेण्यास काय हरकत होती असा सवाल पालक आणि विद्यार्थ्यांमधून उपस्थित केला जात आहे. निकाल लावण्याच्या प्रक्रियेतील शिक्षक, मुख्याध्यापकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. शासनाने जाहीर केलेल्या पद्धतीप्रमाणे मूल्यमापन झाल्यास सर्वच शाळांचा निकाल शंभर टक्के लागणार आहे.

चौकट

असे असेल नवे सूत्र

शासनाने जाहीर केल्याप्रमाणे ५०-३०-२० असा दहावी निकालाचा नवा फॉर्म्युला असणार आहे. याअंतर्गत इयत्ता नववीमध्ये मिळालेल्या गुणांचे ५० टक्के गुण, वर्षभरात दहावीच्या विविध लेखी परीक्षांमध्ये मिळणाऱ्या गुणांचे ३० गुणांकनाने लेखी आणि २० गुणांकांनी तोंडी परीक्षेच्या गुणांची बेरीज केली जाणार असल्याची माहिती शासनाने दिली आहे.

चौकट

आयटीआय, तंत्रनिकेतनला निर्णयाची प्रतीक्षा

अकरावीतील प्रवेशासाठी सीईटी घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. मात्र, ही सीईटी ऐच्छिक आहे. दहावीच्या निकालावर आयटीआय, तंत्रनिकेतनमधील प्रवेश होतात. आयटीआयला तंत्रशिक्षण संचालनालयाच्या, तर तंत्रनिकेतनला व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा लागली आहे.

शिक्षणतज्ज्ञ काय म्हणतात?

कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी पूर्णवेळ शाळा भरलेल्या नाहीत. त्यामुळे नववी, दहावीतील परीक्षांबाबतची माहिती बहुतांश शाळांमध्ये अद्ययावत नाही. विविध शिक्षण मंडळांनी नववीच्या निकालासाठी वेगळी प्रक्रिया राबविली आहे. त्यामुळे निकाल लावताना एकसारखेपणा राहणार नाही. एकूणच निकालाबाबत सध्या गोंधळाची स्थिती आहे.

-डॉ. बी. एम. हिर्डेकर, शिक्षणतज्ज्ञ

विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घेतलेला हा निर्णय योग्य आहे. याशिवाय दुसरा पर्याय नाही.

-आय. सी. शेख, प्राचार्य, डाएट

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. त्यामुळे नववीतील अंतिम आणि दहावीतील अंतर्गत गुणांवर मूल्यमापन करण्याचा निर्णय चांगला आहे.

-डी. एस. पोवार, शिक्षण निरीक्षक

पालक काय म्हणतात?

कोरोनामुळे नववीमध्ये असताना या विद्यार्थ्यांचे वर्ग भरले नाहीत. त्यामुळे नववीच्या गुणांचा दहावीच्या मूल्यमापनासाठी आधार घेणे योग्य वाटत नाही. परीक्षा झाली असती, तर बरे झाले असते. पण, कोरोनामुळे ते शक्य नाही.

-संजय मांडवकर, कनाननगर.

सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाता आलेले नाही. ऑनलाईन शिक्षण झाले, पण ते देखील परिणामकारकपणे झालेले नाही. त्यामुळे नववी, दहावीतील गुणांच्या आधारे कसे मूल्यमापन होणार याबाबत काहीच समजेना झाले आहे.

-अर्चना पुरेकर, शाहुपुरी.

विद्यार्थ्यांमध्ये संमिश्र वातावरण

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑफलाईन परीक्षा रद्द करण्याचा निर्णय योग्य आहे. मात्र, ऑनलाईन स्वरूपात परीक्षा घेऊन आमचे मूल्यांकन केले असते, तर ते पुढील शिक्षणासाठी आम्हाला बरे झाले असते.

-नैनेश जंगले, प्रियदर्शनी कॉलनी.

दहावीचा निकाल लावताना इयत्ता नववीतील गुणांवर ५० टक्के गुण दिले जाणार आहेत. त्यामुळे आम्ही पास होणारच यात काही शंका नाही. पुढील अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी कोणती प्रक्रिया राबविली जाणार हे शासनाने लवकर जाहीर करावे.

-पूर्वा मोहिते, कसबा बावडा.

===Photopath===

010621\01kol_1_01062021_5.jpg

===Caption===

डमी (०१०६२०२१-कोल-स्टार ७६७ डमी)