शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मुलींसाठी एक कोटीच्या सायकली

By admin | Updated: August 29, 2014 00:32 IST

जिल्हा परिषदेची योजना : निविदा मागविल्या

उस्मानाबाद/ढोकी : शेतकऱ्यांची लक्ष्मी आणि कामधेनु असलेला तेरणा सहकारी साखर कारखाना चुकीच्या माणसांच्या हातात दिला. ‘त्या’ माणसांनी कारखाना चालविण्याऐवजी भंगारात काढला. त्यामुळे आज शेतकऱ्यांसोतबच कामगारही देशोधडीला लागले असून मामा-भाच्याने मिळून शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरविण्याचे काम केल्याची तोफ माजी राज्यमंत्री राणाजगजितसिंंह पाटील यांनी डागली. तेरणा कारखान्यातील गैरप्रकाराची चौकशी करण्यात यावी, कारखान्यावर प्रशासक नेमावा, तहसीलदारांनी २०१० पासूनचे कारखान्याचे रेकॉर्ड जप्त करावे, शेतकऱ्यांचे उसाचे बिल देण्यात यावे, कामगारांचे वेतन तातडीने द्यावे यासह विविध मागण्यांसाठी गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा काढण्यात आला. मोर्चाला ढोकी गावातील श्रीराम मंदिरापासून प्रारंभ झाला. यामध्ये हजारोच्या संख्येने शेतकरी, सभासद, कामगार आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. हा मोर्चा कारखानास्थळी आल्यानंतर त्यांनी जनसमुदायास संबोधित केले. यावेळी बाळासाहेब पाटील, रशीद काझी, आबा दंडनाईक, नगर परिषद गटनेते नंदू राजेनिंबाळकर, माजी उपनगराध्यक्ष अमित शिंदे, सतीश दंडनाईक, रामचंद्र पाटील, ढोकीचे माजी उपसरपंच शिवाजी देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की, १९७८ मध्ये तेरणा सहकारी साखर कारखाना डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या ताब्यात आला. सुरूवातील या कारखान्याची साडेबाराशे मेट्रीक टन इतकीच गाळप क्षमता होती. मात्र, उसाचे क्षेत्र वाढत गेल्याने गाळप क्षमता १ हजार ८०० मेट्रीक टनापर्यंत वाढविण्यात आली. त्यानंतरही ऊस वाढच गेला. त्यामुळे गाळप क्षमता २ हजार २०० मेट्रीक टन इतकी करण्यात आली. त्यानंतर पुन्हा साडेतीन हजार मेट्रीक टनापर्यंत गाळप क्षमता नेण्यात आली. त्यानंतही गाळपासाठी येणाऱ्या उसाचे प्रमाण वाढतच गेले. ही बाब लक्षात घेवून डॉ. पद्मसिंह पाटील यांनी कारखान्याची गाळप क्षमता पाच हजार मेट्रीक टनापर्यंत नेली. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, हा यामागचा डॉ. पद्मसिंहांचा प्रमुख उद्देश होता, असे ते म्हणाले. २००७ मध्ये कारखान्यात ८ लाख ३६ हजार मेट्रीक टन इतके विक्रमी गाळप झाले. असे असतानाच कारखान्यात सत्तांतर झाले. डॉ. पद्मसिंंह पाटील यांनी ज्यांच्यावर विश्वास टाकला, त्यांनीच विश्वासघात केला. त्याची शिक्षा मला आणि डॉक्टरांनाही दिली. परंतु, यामध्ये सर्वांचेच नुकसान झाल्याचे पाटील यांनी सांगितले. ज्या ठिकाणी ऊस उभा होता, त्या ठिकाणी आज काँग्रेस गवत उगवले आहे. आमदारांनी किमान या शेतामध्ये उसाची लागवड केली असती तर कामगारांच्या पगारी झाल्या असत्या, असा टोलाही पाटील यांनी लगावला. २००७ साली कारखाना सोडला, तेव्हा सुमारे साडेतीनशे कोटीचा माल होता. तो गेला कोठे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी गफार काझी, रामभाऊ देशमुख, कोंडप्पा कोरे, दिलीप नाडे, तानाजी पवार, तानाजी जमाले, सुरेश देशमुख, प्रवीण यादव आदींची भाषणे झाली. त्यांनीही कारखान्याच्या कारभारावर टिकेची झोड उठविली. (प्रतिनिधी)कारखान्यातील भंगार विक्री करण्यासाठी संबंधित यंत्रणेची परवानगी घेणे आवश्यक असते. परंतु, तशी कुठल्याही स्वरूपाची परवानगी न घेताच भंगार विक्री करण्यात आले. त्यामुळे याला भंगार चोरी म्हणायचे नाही, तर आणखी काय? असा सवाल करीत उत्पादित मालाचे साडेतीनशे कोटी आणि गाळपाचे ६०० कोटी असे एकूण साडेनऊशे कोटी रूपये गेले कुठे? असा प्रश्न उपस्थित केला. आमदारांना याचा जाब द्यावाच लागेल, असेही राणाजगजितसिंह पाटील यांनी नमूद केले.तेरणा साखर कारखान्याचे २२ सदस्यांचे संचालक मंडळ आहे. आजघडीला केवळ नऊ संचालक राहिले आहेत. उर्वरित संचालकांनी राजीनामे का दिले? असा सवाल करीत कारखान्याचा कारभार पाहणारी मंडळी सोंगाडी असल्याचा आरोप त्यांनी केला. यांच्या कारभाराला कंटाळल्याचे सांगत मामा-भाच्याने मिळून कारखाना देशोधडीला लावून शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या घरावर एकप्रकारे नांगर फिरविण्याचे काम केल्याचे ते म्हणाले.