शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

दीड महिने स्वच्छता मोहीम, तरीही शहर तुंबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 11:10 IST

पावसाळ्यापूर्वी गेले दीड महिने शहरात एकीकडे महास्वच्छता मोहीम सुरू आहे. त्यामार्फत नाले, मैदाने सफाई होत असताना दुसरीकडे रविवारी झालेल्या एकाच पावसातच संपूर्ण शहर तुंबल्याचे विदारक चित्र समोर आले. महास्वच्छता मोहिमेमुळे नाल्याचे पात्र रुंदावले असले तरीही एका पावसातच संपूर्ण शहर तुंबले. सफाई मोहीम चांगली असली तरीही काही तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष केल्याचा हा परिणाम असल्याचे खुद्द प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून बोलले जात आहे. अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने गटर्स चॅनल बांधल्याने पावसामुळे तुंबून पाणी रस्त्यावर आले आहे.

ठळक मुद्देदीड महिने स्वच्छता मोहीम, तरीही शहर तुंबलेएका पावसातच रस्ते जलमय : नालेसफाई, चॅनलकडे दुर्लक्ष

कोल्हापूर : पावसाळ्यापूर्वी गेले दीड महिने शहरात एकीकडे महास्वच्छता मोहीम सुरू आहे. त्यामार्फत नाले, मैदाने सफाई होत असताना दुसरीकडे रविवारी झालेल्या एकाच पावसातच संपूर्ण शहर तुंबल्याचे विदारक चित्र समोर आले. महास्वच्छता मोहिमेमुळे नाल्याचे पात्र रुंदावले असले तरीही एका पावसातच संपूर्ण शहर तुंबले. सफाई मोहीम चांगली असली तरीही काही तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष केल्याचा हा परिणाम असल्याचे खुद्द प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून बोलले जात आहे. अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने गटर्स चॅनल बांधल्याने पावसामुळे तुंबून पाणी रस्त्यावर आले आहे.महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पदभार घेतल्यानंतर अवघ्या दीड महिन्यात जयंती नाला गाळ व कचरामुक्त करून त्याला नदीचे मूळ स्वरूप आणण्याचा कौतुकास्पद प्रयत्न केला. महास्वच्छता चळवळ उभा केली, प्रतिसादही मिळाला आहे. जयंती नाल्यातील गाळ, कचरा तसेच लहान-मोठे नालेसफाई करून सुमारे ९०० टनांहून अधिक कचरा उचलला. पण, रविवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील रस्ते, भाजी मंडई, मैदाने, सखल भागात पाणीच पाणी झाले. दुसऱ्या दिवशीही पाण्याचा निचरा न झाल्याने नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.एकाच पावसामुळे लक्ष्मीपुरी भाजी मार्केट, व्हीनस कॉर्नर चौक, कोंडा ओळ चौक, रामानंद नगर नाला परिसर, लिशा हॉटेल परिसर, पार्वती मल्टिप्लेक्स, आदी परिसरासह शहरातील मैदाने जलमय झाली. गेले दीड महिना स्वच्छता मोहीम सुरूअसूनही शहर का तुंबले? असा सर्वसामान्यांतून प्रश्न उपस्थित होत आहे.लिशा हॉटेल परिसरात तर चक्कगटर्स चॅनलवर बांधकाम झाल्याने पावसात त्याचे पाणी रस्त्यावर येऊन तुंबते. आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलकडून आलेले चॅनल पुढे नेण्याऐवजी काही वजनदार व्यक्तींनी ते रस्ता क्रॉस करून थेट पार्वती मल्टिप्लेक्सपासून पुढे नेले आहे. त्यामुळे या परिसराला तळ्याचे स्वरूप येते. व्हीनस कॉर्नर चौकात दोन वर्षांपूर्वी चेंबर बांधल्याने तेथील नाल्याचे पाणी बाहेर येणे बंद झाले, पण सखल भागामुळे चेंबरमधून रस्त्यावर येऊन तुंबले. हीच स्थिती अनेक ठिकाणी आहे.नगरसेवकांनी चॅनल फिरवलीअनेक ठिकाणी नगरसेवकांनी आपले वजन प्रभागात वापरून नवीन चॅनल गटर्स बांधली, त्यासाठी तांत्रिक बाबींचा विचार न करता फक्त आपल्या प्रभागाचाच विचार केल्याने मुसळधार पावसानंतर हे पाणी बाहेर रस्त्यावरून वाहू लागल्याचे चित्र दिसते. त्यामुळे पाणी रस्त्यावर येऊन त्याचा निचरा झाला नाही.लक्ष्मीपुरी तुंबलीबिंदू चौक पार्किंग परिसरात चुकीच्या पद्धतीने चॅनल केल्याने पावसात ते ‘ओव्हर फ्लो’ होऊन लक्ष्मीपुरी भाजी मार्केटमध्ये शिरते, ही बाजारपेठ दोन्हीही बाजूंनी सखल असल्याने मुख्य बाजारपेठेलाच नाल्याचे स्वरूप येते. त्यात रविवारी आठवडी बाजाराचा दिवस असल्याने दुपारपर्यंत भाजी विक्रेत्यांनी रस्त्यावर टाकलेला भाजी-पाल्याचा कचरा थेट चॅनलमध्ये अडकल्याने पाण्याचा निचरा झाला नाही, त्यामुळे लक्ष्मीपुरी तुंबल्याचे चित्र निर्माण झाले.रामानंदनगरात नाल्यात बांधकामेरामानंदनगर नाल्याच्या पात्रात काहींनी अतिक्रमण करून बांधकाम केली असल्याने येथे पुलाजवळच पात्र अरुंद बनले आहे, परिणामी पावसाचा जोेर वाढल्याने नाला तुंबतो व पाणी रस्त्यावर येते. या नाल्यावरील अतिक्रमणे काढण्यासाठी प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावले का उचलली जात नाहीत, याचे कोडे अनेकांना उलगडलेले नाही.

 

 

टॅग्स :RainपाऊसMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर