शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

दुसऱ्या दिवशीही किरणे अंबाबाईच्या चरणापर्यंतच

By संदीप आडनाईक | Updated: November 10, 2024 23:20 IST

किरणोत्सवाची तीव्रता कमीच : पंधरा मिनिटांत ढगाळ हवामान

कोल्हापूर: करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात पारंपारिक दक्षिणायन किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी ५ वाजून ४२ मिनिटांनी मावळतीची सूर्यकिरणे जेमतेम देवीच्या चरणापर्यंतच पोहोचून लुप्त झाली. पूर्वीच्या अनुमानानुसार रविवारी सूर्यकिरणे देवीच्या खांद्यापर्यंत अपेक्षित होती, परंतु ढगाळ वातावरण, हवेतील आर्द्रतेचे वाढलेले प्रमाण आणि वाढलेल्या धूलीकणांमुळे किरणोत्सवाची तीव्रता कमी राहिली. हवेतील आर्द्रतेचे प्रमाणही १८ टक्क्यांनी वाढल्याचे पदार्थ विज्ञान विभागाचे निवृत्त प्राध्यापक मिलिंद कारंजकर यांनी सांगितले.

दक्षिणायनाच्या कालखंडातील पारंपरिक किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी ४.५५ वाजता महाद्वारातून आत आलेली सूर्यकिरणे १५ हजार ३०० लक्स इतकी नोंदविली होती, परंतु पुढच्या पंधरा मिनिटांतच वातावरण ढगाळ झाल्याने किरणांची तीव्रता कमी झाली. यावेळी हवेतील आर्द्रतेची टक्केवारी ४० टक्क्यांपासून ५६ टक्क्यांपर्यंत राहिली. या सूर्यकिरणांमध्ये अंबाबाईच्या खांद्यापर्यंत पोहोचण्याइतकी तीव्रता राहिली नाही. त्यामुळे भाविकांची निराशा झाली. ५ वाजून ४७ मिनिटांनी किरणे देवीच्या उजव्या बाजूला लुप्त झाली त्यानंतर नंदादीपाच्या प्रकाशात देवीची कर्पुरारती करण्यात आली. यावेळी सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक धनंजय दिंडे, गणेश नेर्लीकर-देसाई उपस्थित होते.

किरणोत्सवासाठी एलईडी स्क्रीन

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने मंदिर परिसरात तसेच शहरात ठिकठिकाणी हा पारंपरिक किरणोत्सव साेहळा पाहण्यासाठी एलईडी स्क्रीनची व्यवस्था केली आहे. याद्वारे हा सोहळा पाहण्याचा आनंद भाविकांनी घेतला. बुधवारी (दि. १३)पर्यंत हा किरणोत्सव सोहळा रंगणार आहे.

पर्यटकांच्या वर्दळीमुळे धुलिकणांत वाढमहाद्वार रोड आणि परिसरातील पर्यटकांची वाढलेली गर्दीही हवेतील धूलिकण वाढण्यात मदत करतात. त्याचा किरणोत्सवावर परिणाम होतो आहे. दिवसा उष्मा आणि रात्रीची थंडी यामुळे वातावरणातील आद्रतेत पाण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे किरणोत्सवाच्या तीव्रतेवर फरक पडला आहे, असे प्रा. कारंजकर यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर