शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

दुसऱ्या दिवशीही किरणे अंबाबाईच्या चरणापर्यंतच

By संदीप आडनाईक | Updated: November 10, 2024 23:20 IST

किरणोत्सवाची तीव्रता कमीच : पंधरा मिनिटांत ढगाळ हवामान

कोल्हापूर: करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात पारंपारिक दक्षिणायन किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी ५ वाजून ४२ मिनिटांनी मावळतीची सूर्यकिरणे जेमतेम देवीच्या चरणापर्यंतच पोहोचून लुप्त झाली. पूर्वीच्या अनुमानानुसार रविवारी सूर्यकिरणे देवीच्या खांद्यापर्यंत अपेक्षित होती, परंतु ढगाळ वातावरण, हवेतील आर्द्रतेचे वाढलेले प्रमाण आणि वाढलेल्या धूलीकणांमुळे किरणोत्सवाची तीव्रता कमी राहिली. हवेतील आर्द्रतेचे प्रमाणही १८ टक्क्यांनी वाढल्याचे पदार्थ विज्ञान विभागाचे निवृत्त प्राध्यापक मिलिंद कारंजकर यांनी सांगितले.

दक्षिणायनाच्या कालखंडातील पारंपरिक किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी ४.५५ वाजता महाद्वारातून आत आलेली सूर्यकिरणे १५ हजार ३०० लक्स इतकी नोंदविली होती, परंतु पुढच्या पंधरा मिनिटांतच वातावरण ढगाळ झाल्याने किरणांची तीव्रता कमी झाली. यावेळी हवेतील आर्द्रतेची टक्केवारी ४० टक्क्यांपासून ५६ टक्क्यांपर्यंत राहिली. या सूर्यकिरणांमध्ये अंबाबाईच्या खांद्यापर्यंत पोहोचण्याइतकी तीव्रता राहिली नाही. त्यामुळे भाविकांची निराशा झाली. ५ वाजून ४७ मिनिटांनी किरणे देवीच्या उजव्या बाजूला लुप्त झाली त्यानंतर नंदादीपाच्या प्रकाशात देवीची कर्पुरारती करण्यात आली. यावेळी सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक धनंजय दिंडे, गणेश नेर्लीकर-देसाई उपस्थित होते.

किरणोत्सवासाठी एलईडी स्क्रीन

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने मंदिर परिसरात तसेच शहरात ठिकठिकाणी हा पारंपरिक किरणोत्सव साेहळा पाहण्यासाठी एलईडी स्क्रीनची व्यवस्था केली आहे. याद्वारे हा सोहळा पाहण्याचा आनंद भाविकांनी घेतला. बुधवारी (दि. १३)पर्यंत हा किरणोत्सव सोहळा रंगणार आहे.

पर्यटकांच्या वर्दळीमुळे धुलिकणांत वाढमहाद्वार रोड आणि परिसरातील पर्यटकांची वाढलेली गर्दीही हवेतील धूलिकण वाढण्यात मदत करतात. त्याचा किरणोत्सवावर परिणाम होतो आहे. दिवसा उष्मा आणि रात्रीची थंडी यामुळे वातावरणातील आद्रतेत पाण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे किरणोत्सवाच्या तीव्रतेवर फरक पडला आहे, असे प्रा. कारंजकर यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर