शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

‘लोकमत’वर वर्धापनदिनी शुभेच्छांच्या ‘श्रावणसरी’, वाचकांनी दिले भक्कम पाठबळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 12:33 IST

‘लोकमत’ कोल्हापूरच्या समाजजीवनात रुजल्याचेच प्रत्यंतर

कोल्हापूर : कोल्हापूरच्या लोकजीवनाचे खरेखुरे प्रतिबिंब बनलेल्या कोल्हापूर ‘लोकमत’च्या १९ व्या वर्धापनदिनी वाचकांनी येथील महासैनिक दरबार हॉलवर अगत्याने उपस्थिती दर्शवत रविवारी शुभेच्छांच्या श्रावणसरींचा अनुभव दिला. संध्याकाळी पाचपासून रात्री नऊ वाजेपर्यंत सर्वच स्तरांतील मान्यवरांपासून ते सामान्य वाचकांपर्यंत अनेकांनी महासैनिक दरबार हॉलवर उपस्थित राहून ‘लोकमत’च्या वाटचालीस शुभेेच्छांचे भक्कम बळ दिले. कोल्हापूरच्या समाजजीवनात ‘लोकमत’ खरोखर किती रुजला आहे, याचेच प्रत्यंतर या शुभेच्छांतून प्रत्ययास आले.सायंकाळी पाच वाजल्यापासून स्नेहमेळावा होता; परंतू त्याच्या आधीपासूनच लोकांची रीघ लागली. बघता-बघता ही रीघ लांबच्या लांब रांगच झाली. त्या रांगेत कोल्हापूरची जडणघडण करणारे सर्वच घटक होते. विद्यार्थ्यांपासून शेतकऱ्यापर्यंत, वृत्तपत्र विक्रेत्यांपासून नामांकित डॉक्टरांपर्यंत, जाहिरात संस्थांच्या प्रतिनिधीपासून ते प्रथितयश उद्योजकांपर्यंत सर्वचजण आले. राजकीय, सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक क्षेत्रांतील लोक, ग्रामपंचायतीपासून सेवा सोसायटीपर्यंतचे पदाधिकारी असे मान्यवर आवर्जून स्नेहमेळाव्यास उपस्थित राहिले. तुम्ही आमचे प्रश्न मांडले. ‘तुम्ही लेखनातून समाजाला दिशा देता म्हणून आम्ही आलो,’ अशा भावना बहुतेक लोकांनी व्यक्त केल्या. पावसाने विश्रांती घेतली तरी सलग चार तास शुभेच्छांच्या वर्षावात ‘लोकमत’ परिवार चिंब झाला.गेल्या १८ वर्षांत ‘लोकमत’ने समाजातील विविध घटकांचे प्रश्न मांडले, शहरास जिल्ह्याच्या ज्वलंत समस्या मांडत, त्या सुटण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. प्रसंगी नेतेमंडळींना काही गोष्टी सुनावण्यासही मागे-पुढे पाहिले नाही. त्यामुळे वाचकांच्या मनात एक जिव्हाळ्याचे स्थान निर्माण केलेल्या ‘लोकमत’च्या या वर्धापनदिन आयोजित स्नेहमेळाव्याला कर्तव्य समजून अनेकांनी हजेरी लावली. सुट्टीचा दिवस आणि अन्य कार्यक्रम असतानाही नेते, कार्यकर्ते आणि वाचक प्राधान्य देत या स्नेहमेळाव्याला उपस्थित राहिले. संपादक डॉ. वसंत भोसले आणि सहायक उपाध्यक्ष मकरंद देशमुख यांनी शुभेच्छा स्वीकारल्या.प्रारंभी शाहू छत्रपती, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांना अभिवादन करण्यात आले. ‘लोकमत’च्या वर्धापनानिमित्त प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘कोल्हापूरचे अर्थकारण’ विशेषांकाचेही प्रकाशन करण्यात आले. यावेळी खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार पी. एन. पाटील, आमदार प्रकाश आवाडे, आमदार विनय कोरे, आमदार राजूबाबा आवळे, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर, डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे प्रमुख डॉ. संजय डी. पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, चंद्रदीप नरके, संजयबाबा घाटगे, डॉ. सुजित मिणचेकर, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभयकुमार साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी माजी आमदार उल्हास पवार, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, वसुधा पवार, व्ही. बी. पाटील, ताराराणी विद्यापीठाचे क्रांतिकुमार पाटील, उद्योजक आनंद माने, दिलीप मोहिते, हिंदकेसरी दीनानाथसिंह, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, डॉ. ज. ल. नागावकर, नीला नागावकर, बालरोगतज्ज्ञ मोहन पाटील, हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर, शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, प्र-कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, केआयटीचे संचालक डॉ. मोहन वनरोट्टी, क्रेडाईचे विद्यानंद बेडेकर, राजीव परिख, पारस ओसवाल, स्मॅकचे सुरेंद्र जैन, दीपक पाटील, कोल्हापूर इंंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष दिनेश बुधले, एम. बी. शेख, रणजित जाधव, शंकर पाटील,शास्त्रीय गायक विनोद डिग्रजकर, ॲड. महादेवराव आडगुळे, शिवाजीराव राणे, अजित मोहिते, राजेंद्र किंकर, धनंजय पठाडे, कोल्हापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, अनुराधा भोसले, ज्येष्ठ पत्रकार दिलीप लोंढे, संजय पाटोळे, सुनंदा मोरे, डॉ. प्रमिला जरग, मेघा पानसरे, ज्येष्ठ आर्किटेक्ट मोहन वायचळ, व्यवस्थापन समिती सदस्य सिद्धार्थ शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

अनेकांच्या गप्पा रंगल्या‘लोकमत’चा वर्धापनदिन म्हणजे सर्व क्षेत्रांतील मान्यवरांसह नागरिक, कार्यकर्ते भेटण्याचे हक्काचे ठिकाण. त्यामुळे शुभेच्छा दिल्यानंतर विविध क्षेत्रांतील कार्यकर्ते स्वतंत्रपणे बसून चर्चा करताना दिसून आले. ‘लोकमत’ला शुभेच्छा देतानाच अनेकांच्या गाठीभेटी होतात. त्यामुळे आम्ही आवर्जून येतो, असे काहींनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरLokmatलोकमत