शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

थकित वीजबीलापोटी उपोषण, तिळवणीच्या संतप्त ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना कोंडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2023 11:43 IST

महिलाही आक्रमक झाल्या आणि त्यांनी महावितरणच्या प्रवेशद्वारालाच टाळे ठोकले

कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील तिळवणीच्या ग्रामस्थांनी शुक्रवारी साडेचार तास महावितरणचे प्रवेशद्वार बंद करून अधिकारी, कर्मचाऱ्यांची कोंडले. अखेर नवीन पंपहाऊसला डीपी बसवण्याची तयारी दर्शविल्यानंतर पात्री साडेसात वाजता ग्रामस्थ येथून उठले. त्यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.गेले दोन दिवस तिळवणीचे सरपंच सूरज पाटील आणि सदस्यांनी जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले आहे. १४ गावांच्या पाणी योजनेतून तेरा गावे बाहेर पडली आणि त्यांचे एकूण अडीच कोटी रुपयांचे बिल तिळवणी ग्रामपंचायतीला आले आहे. ते भरल्याशिवाय नवीन पंप हाऊसला वीजजोडणी देणार नसल्याचे ‘महावितरण’ने स्पष्ट केल्याने ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय होत होती. दुसरीकडे शासनाने वीज बिल माफ केल्याच्या यादीत या योजनेचा समावेश नसल्याने अडचणीत भर पडली.त्यामुळे पहिल्या दिवशी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली परंतु ठोस आश्वासन देण्यात चव्हाण यांना मर्यादा होत्या. त्यामुळे गुरुवारीही उपोषण सुरूच राहिले. काहीजणांच्या तब्येती बिघडल्या.खासदार धैर्यशील माने यांनी शुक्रवारी सकाळी उपोषणस्थळी भेट देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर महावितरणचे अधीक्षक अभियंता अंकुर कावळे हे जिल्हा परिषदेत आले आणि त्यांनी चव्हाण यांच्याशी चर्चा केली. दुपारी एकनंतर तिळवणीच्या ग्रामस्थ आणि महिलांनी महावितरणसमोर ठिय्या मारला.याच दरम्यान माजी आमदार राजीव आवळे, माणगावचे सरपंच राजू मगदूम, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने, भैय्या माने यांनी उपोषणस्थळी भेट दिली. याबाबत कावळे यांच्याशी चर्चा सुरू केल्यानंतर त्यांनी सुरुवातीला हा प्रश्न राज्य पातळीवरच सुटू शकतो अशी भूमिका घेतल्याने आंदोलक संतप्त झाले. त्यानंतर चारच्या सुमारास महिलाही आक्रमक झाल्या आणि त्यांनी महावितरणच्या प्रवेशद्वारालाच टाळे ठोकले. घोषणाबाजी सुरू केली.यानंतर पुन्हा खासदार माने यांच्या निवासस्थानी चर्चा झाल्यानंतर नव्याने उभारण्यात आलेल्या पंपहाऊसला जिल्हा नियोजनमधून मिळणाऱ्या निधीतून डीपी उभारून देण्याची ग्वाही कावळे यांनी दिल्यानंतर महावितरणाच्या समोरून ग्रामस्थ उठले. तोपर्यंत अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही बाहेर पडता आले नाही.आज नेतेमंडळी येणारमुंबईहून अधिवेशनातून सर्व नेतेमंडळी आज कोल्हापूरला येणार असून ती उपोषणस्थळी भेट देण्याची शक्यता आहे. एकीकडे राज्यातील सर्व ग्रामपंचायतींचे थकीत वीज बिल माफ झाले असताना तिळवणीलाही याचा फायदा झाला पाहिजे, अशी भूमिका घेण्यात आली असून याबाबत मुंबईतील बैठकीतही निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmahavitaranमहावितरण