शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

थकित वीजबीलापोटी उपोषण, तिळवणीच्या संतप्त ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना कोंडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2023 11:43 IST

महिलाही आक्रमक झाल्या आणि त्यांनी महावितरणच्या प्रवेशद्वारालाच टाळे ठोकले

कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील तिळवणीच्या ग्रामस्थांनी शुक्रवारी साडेचार तास महावितरणचे प्रवेशद्वार बंद करून अधिकारी, कर्मचाऱ्यांची कोंडले. अखेर नवीन पंपहाऊसला डीपी बसवण्याची तयारी दर्शविल्यानंतर पात्री साडेसात वाजता ग्रामस्थ येथून उठले. त्यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.गेले दोन दिवस तिळवणीचे सरपंच सूरज पाटील आणि सदस्यांनी जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले आहे. १४ गावांच्या पाणी योजनेतून तेरा गावे बाहेर पडली आणि त्यांचे एकूण अडीच कोटी रुपयांचे बिल तिळवणी ग्रामपंचायतीला आले आहे. ते भरल्याशिवाय नवीन पंप हाऊसला वीजजोडणी देणार नसल्याचे ‘महावितरण’ने स्पष्ट केल्याने ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय होत होती. दुसरीकडे शासनाने वीज बिल माफ केल्याच्या यादीत या योजनेचा समावेश नसल्याने अडचणीत भर पडली.त्यामुळे पहिल्या दिवशी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली परंतु ठोस आश्वासन देण्यात चव्हाण यांना मर्यादा होत्या. त्यामुळे गुरुवारीही उपोषण सुरूच राहिले. काहीजणांच्या तब्येती बिघडल्या.खासदार धैर्यशील माने यांनी शुक्रवारी सकाळी उपोषणस्थळी भेट देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर महावितरणचे अधीक्षक अभियंता अंकुर कावळे हे जिल्हा परिषदेत आले आणि त्यांनी चव्हाण यांच्याशी चर्चा केली. दुपारी एकनंतर तिळवणीच्या ग्रामस्थ आणि महिलांनी महावितरणसमोर ठिय्या मारला.याच दरम्यान माजी आमदार राजीव आवळे, माणगावचे सरपंच राजू मगदूम, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने, भैय्या माने यांनी उपोषणस्थळी भेट दिली. याबाबत कावळे यांच्याशी चर्चा सुरू केल्यानंतर त्यांनी सुरुवातीला हा प्रश्न राज्य पातळीवरच सुटू शकतो अशी भूमिका घेतल्याने आंदोलक संतप्त झाले. त्यानंतर चारच्या सुमारास महिलाही आक्रमक झाल्या आणि त्यांनी महावितरणच्या प्रवेशद्वारालाच टाळे ठोकले. घोषणाबाजी सुरू केली.यानंतर पुन्हा खासदार माने यांच्या निवासस्थानी चर्चा झाल्यानंतर नव्याने उभारण्यात आलेल्या पंपहाऊसला जिल्हा नियोजनमधून मिळणाऱ्या निधीतून डीपी उभारून देण्याची ग्वाही कावळे यांनी दिल्यानंतर महावितरणाच्या समोरून ग्रामस्थ उठले. तोपर्यंत अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही बाहेर पडता आले नाही.आज नेतेमंडळी येणारमुंबईहून अधिवेशनातून सर्व नेतेमंडळी आज कोल्हापूरला येणार असून ती उपोषणस्थळी भेट देण्याची शक्यता आहे. एकीकडे राज्यातील सर्व ग्रामपंचायतींचे थकीत वीज बिल माफ झाले असताना तिळवणीलाही याचा फायदा झाला पाहिजे, अशी भूमिका घेण्यात आली असून याबाबत मुंबईतील बैठकीतही निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmahavitaranमहावितरण