शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
2
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
3
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
4
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
5
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
6
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
7
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
8
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
9
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
10
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
11
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
12
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
13
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
14
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
15
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
16
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
17
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
18
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
19
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
20
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला

महाशिवरात्रीनिमित्त शाबू, वरी, केळींना मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 11:24 IST

महाशिवरात्री सणाच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मीपुरीतील रविवारच्या आठवडी बाजारात विशेषत: शाबू, वरी, राजगिरा या उपवासाच्या पदार्थांसह सर्वच प्रकारच्या फळांना मागणी होती. काही भाज्यांच्या दरांत वाढ, तर काही भाज्यांचे दर घसरले होते. दोडका, मुळा, शेवग्याची शेंग, मेथी, चाकवतचा दर निम्म्यावर आला होता. मार्च सुरू झाल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. त्यामुळे द्राक्षे, अननसाच्या दरांत वाढ झाली आहे.

ठळक मुद्देमहाशिवरात्रीनिमित्त शाबू, वरी, केळींना मागणीदोडका, मेथी, चाकवत निम्म्यावर

कोल्हापूर :  महाशिवरात्री सणाच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मीपुरीतील रविवारच्या आठवडी बाजारात विशेषत: शाबू, वरी, राजगिरा या उपवासाच्या पदार्थांसह सर्वच प्रकारच्या फळांना मागणी होती. काही भाज्यांच्या दरांत वाढ, तर काही भाज्यांचे दर घसरले होते. दोडका, मुळा, शेवग्याची शेंग, मेथी, चाकवतचा दर निम्म्यावर आला होता. मार्च सुरू झाल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. त्यामुळे द्राक्षे, अननसाच्या दरांत वाढ झाली आहे.कोल्हापुरात कपिलतीर्थ मार्केट, राजारामपुरीतील नार्वेकर मार्केट, शाहूपुरीजवळील रेल्वे फाटक बाजारात सणानिमित्त सकाळपासून ग्राहकांची गर्दी होती. शाबू, रताळे, बटाटा, केळी, वरी, राजगिरा, राजगिरा लाडू खरेदीसाठी गर्दी होती; पण यंदा रताळ्यांची आवक कमी असल्याने दरावर परिणाम झाला होता. रताळे ४० पासून ते ६० रुपयांपर्यंत होते.

शाबू ५७ वरून ६० रुपये प्रतिकिलो, वरी ८० रुपये, बटाटा २५ ते ३० रुपये, राजगिरा ८० रुपये, राजगिरा लाडू पॅकेट (१२ नग) २० रुपये दर होता. तसेच फळांनाही मागणी होती. त्याचे दरही वाढले होते. गेल्या आठवड्यात असलेला सफरचंदांचा ८० रुपयांचा दर १०० रुपयांवर गेला होता.पेरू ८० रुपयांवरून १०० ते १२० रुपयांच्या घरात होता. केळी ३० रुपयांवरून ४० रुपये झाली होती. डाळिंब ८० रुपये असे दर होते. मात्र चिकू व मोसंबीचा दर स्थिर होता. पेरू ४० रुपये तर मोसंबी ८० रुपये होते. सणानिमित्त केळींची आवक मोठ्या प्रमाणात आली होती. त्यामुळे बाजारात केळींचे ढीगच्या ढीग होते.याचबरोबर कोबी, टोमॅटो, गवार, ओला वाटाणा, वरणा, फ्लॉवर, शेवग्याची शेंग, बीट, तोंदलीच्या दरात वाढ झाली आहे; तर वांगी, ओली मिरची, मुळा, ढबू मिरची, कारली, भेंडी, बिनीस, दुधी भोपळा, कांदापात, चाकवताच्या दरात घसरण झाली आहे. तसेच साखर ३६ रुपये, हरभराडाळ ७० रुपये, मूगडाळ ८८ रुपये, मसूरडाळ ६४, उडीदडाळ ८४ ते ८८ रुपये असा दर होता.

काकडी, गाजरात वाढउन्हाचा तडाखा वाढल्याने काकडी, गाजराला ग्राहकांकडून मागणी वाढली आहे. त्यामुळे दरात वाढ झाली आहे. घाऊक बाजारात काकडी २५ रुपये प्रतिकिलो, गाजर २० रुपये किलो असा दर होता. याचबरोबर दह्यालाही मागणी वाढली आहे.

आंब्यांचे दर असे :

  • आंबा हापूस - दोन हजार रुपये पेटी
  • आंबा हापूस- बॉक्स ५०० रुपये
  • आंबा लालबाग- बॉक्स २५० रुपये

 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर