शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
2
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
3
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
4
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
6
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
7
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
8
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
9
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
10
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
11
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
13
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
14
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
15
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
16
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
17
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
18
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
19
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
20
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार

कोल्हापुरातील जुन्या अपार्टमेंटच्या पुनर्विकासात अडथळ्यांचीच भिंत, सभासदांचे एकमत होत नाही

By भीमगोंड देसाई | Updated: December 2, 2024 17:51 IST

वर्षात केवळ १० प्रस्ताव : रस्ता कमी रुंदीचा असेल तर एफएसआय कमी मिळत असल्याने अडचण

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : शहरातील जुन्या म्हणजे ३० वर्षे पूर्ण झालेल्या अपार्टमेंटच्या पुनर्विकासात अडथळ्यांची भिंत मोठी असल्याचे समोर आले आहे. म्हणून वर्षभरात केवळ १० अपार्टमेंटधारकांनी पुनर्विकासासाठी महापालिका नगर प्रशासनाकडून परवानगी घेतली आहे. परिणामी नवीन अपार्टमेंटची संख्या वाढत आहे. मात्र आयुर्मान संपलेल्या अपार्टमेंटची पुनर्बांधणी रखडली आहे.शहरात झपाट्याने नागरीकरण होत आहे. जुन्या अपार्टमेंटचा पुनर्विकास ३० वर्षांनंतर करता येतो. बांधकाम मोडकळीस आलेले असेल, धोकादायक असेल तर ३० वर्षे पूर्ण होण्याआधीही पुन्हा बांधणी करता येते. पण पुनर्विकास करताना शहरातील अपार्टमेंटधारकांना अनेक अडथळ्यांशी सामना करावा लागत आहे. काही अपार्टमेंटच्या समोरचा रस्ता ९ मीटर रुंदीचा आहे. रस्त्याची रुंदी कमी राहिल्याने तर एफएसआय कमी मिळत असल्याने बिल्डर तेथील जुन्या अपार्टमेंटचा पुनर्विकास करण्यास पुढे येत नाही.याशिवाय अपेक्षा वाढल्याने अपार्टमेंटमधील सर्व सदस्यांचे एकमत होत नाही. पाडून बांधल्यानंतर नवीन फ्लॅट सध्यापेक्षा मोठा हवा असतो, पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावरच पाहिजे, असा हट्ट असतो, अशा अनेक अपेक्षा असतात. परिणामी अपार्टमेंटला ३० वर्षे पूर्ण झाली तरी अपार्टंमेट पुनर्विकास होत नसल्याचे शहरात चित्र आहे.

ताराबाई, नागाळा पार्क परिसरात अधिक..जुने अपार्टमेंट किंवा मोठा बंगला पाडून त्या ठिकाणी अत्याधुनिक सेवा, सुविधांयुक्त अपार्टमेंट बांधण्याचे प्रमाण ताराबाई, नागाळा पार्क आणि उपनगरात अधिक आहे. या भागात वर्षभरात आठ अपार्टमेंटच्या पुनर्विकासाच्या प्रस्तावांना तर पेठा, शाहपुरी, राजारामपुरी अशा परिसरात दोन असे एकूण १० प्रस्तावांना महापालिकेच्या नगर प्रशासन विभागाने मंजुरी दिली आहे.

अनुभव असेही..जुन्या फ्लॅटपेक्षा किमान २५ टक्के जास्त जागा द्यावी, पार्किंग फ्री आणि बांधकाम सुरू असल्याच्या काळात फ्लॅटधारकांना भाडे असा प्रस्ताव दिला तरी सभासद काही ठिकाणी ते मान्य करत नसल्याचे अनुभव आहेत. वाढवून देणारी जागा २५ टक्के बिल्डर देईलच कशावरून, अशी शंका उपस्थित केली जाते. अपार्टमेंटमध्ये दहा विचारांचे दहा लोक असतात. त्यांच्यातच मुळात एकमत करणे ही डोकेदुखी असते. त्यातील एखादा माणूस हेकड स्वभावाचा असला तरी सर्वच प्रक्रिया ठप्प होते.

असाही पर्याय..फ्लॅटधारकांची सहकारी गृहनिर्माण संस्था नोंदणीकृत असेल तर त्यांनाही स्वत: अशी इमारत विकसित करता येते. परंतु आपल्याकडे इमारत पूर्ण झाल्यावर अशा सोसायट्या स्थापन झालेल्या नाहीत. त्या सोसायटीसाठी बांधकाम पूर्णत्वाचा दाखला लागतो. परंतु बऱ्याचदा दाखला घेतलेला नसतो. बँकेत खाते हवे आणि त्यावर वर्षभर व्यवहार झालेले असावेत, परंतु खाते काढण्यासाठीच कागदपत्रांची यादी मोठी आहे. त्यामुळे या मार्गानेही विकास करणे अडचणीचेच ठरत आहे.

जुने अपार्टमेंट किंवा बंगले पाडून त्या ठिकाणी बिल्डर नवीन अपार्टमेंट बांधताना अधिकाधिक आधुनिक सेवा, सुविधा देण्याचा प्रयत्न करतो. याचा विचार करण्याऐवजी मला पूर्वीपेक्षा अधिक मोठा फ्लॅट कसा मिळेल, याचाच अधिक विचार सदस्य करतात. परिणामी जुन्या अपार्टमेंटचा पुनर्विकास होताना दिसत नाही. -डॉ. विजय पाटील, चार्टर्ड इंजिनिअर, कोल्हापूर 

शहरातील अनेक भागातील जुन्या अपार्टमेंटच्या समोरचा रस्ता ९ मीटर किंवा त्यापेक्षा कमी रुंदीचा आहे. अशा ठिकाणचे अपार्टमेंटचा पुनर्विकास करताना बिल्डरला एफएसआय कमी मिळतो. तो वाढवून द्यावा, अशी शासनाकडे मागणी केली आहे. ही मागणी मान्य झाल्यास पुनर्विकासास गती येईल. -कृष्णात खोत, अध्यक्ष क्रेडाई, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूर