शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

कोल्हापूर वनवृत्तात ४ कोटी १२ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट : क्लेमेंट बेन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 11:00 IST

  लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर वनवृत्तामध्ये यंदा ४ कोटी १२ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून, त्या ...

ठळक मुद्देकोल्हापूर वनवृत्तात ४ कोटी १२ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट : क्लेमेंट बेनकोल्हापूर जिल्ह्यातील ७५ टक्के झाडे जगल्याचा दावा

 

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर वनवृत्तामध्ये यंदा ४ कोटी १२ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून, त्या दृष्टीने कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत तयारी झाल्याची माहिती मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन यांनी दिली.शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेबाबतच्या तयारीची माहिती देण्यासाठी सोमवारी बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी उपवनसंरक्षक हणमंत धुमाळ, विभागीय वनसंरक्षक सूर्यकांत काटकर आणि विभागीय वनअधिकारी दीपक खाडे उपस्थित होते.बेन म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्याला १ कोटी १३ लाख २२ हजार, साताऱ्यासाठी १ कोटी २४ लाख १ हजार, सांगलीसाठी ७२ लाख ३० हजार, सिंधुदुर्गसाठी ४१ लाख ६६ हजार आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी ४८ लाख ९३ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामध्ये वनविभागासोबतच सामाजिक वनीकरण, वनविकास महामंडळ, ग्रामपंचायत आणि इतर शासकीय विभागांसह स्वयंसेवी संस्था यांच्याकडून हे उद्दिष्ट पूर्ण करून घेण्यात येणार आहे.या सर्व जिल्ह्यांमध्ये खड्डे खुदाईची कामे पूर्ण झाली आहेत. याअंतर्गत या जिल्ह्यांमध्ये २३ ओढ्यांच्या दुतर्फा प्रायोगिक तत्त्वांवर ५० हजार बांबूची रोपे लावण्यात येणार आहेत. या कालावधीत ३० सप्टेंबरपर्यंत वनमहोत्सव आयोजित करण्यात आला असून, त्याद्वारे रोपांची विक्री केली जाणार आहे.उपवनसंरक्षक हणमंत धुमाळ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्याला १ कोटी १३ लाख २२ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट असून, त्यासाठी वन विभाग आणि सामाजिक वनीकरणाकडे १ कोटी २१ लाख ४७ हजार रोपे तयार करण्यात आली आहेत. जिल्ह्यात ४ लाख ४० हजार हरित सेना सदस्यांची नोंदणी करावयाची असून, त्यापैकी ३ लाख ७२ हजार नोंद झाली आहे.................................नवे पारगाव येथे वृक्षारोपण आरंभशासनाचा १ जुलैचा वृक्षारोपण आरंभ हा पारगाव (ता. हातकणगंले) येथील तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमी येथे आयोजित करण्यात आला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे........................................झाडे वाळलेली दिसली म्हणजे मेली असे नव्हेगेल्या दोन वर्षांतील वृक्षलागवडीपैकी ७३ टक्के झाडे जगल्याचा दावा यावेळी करण्यात आला. क्लेमेंट बेन म्हणाले, सर्वच १०० टक्के झाडे जगली असा आमचा दावा नाही; परंतु झाडे वाळली म्हणजे ती लगेच मरत नाही. पावसाळ्यात पुन्हा ती जगतात.................................समीर

 

टॅग्स :forest departmentवनविभागkolhapurकोल्हापूर