शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

विद्यार्थी संख्या ७५ हजाराने घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 00:46 IST

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्हा परिषदेतील शाळांच्या माध्यमातून शिक्षण घेऊन विविध क्षेत्रांमध्ये उत्तुंग कामगिरी केलेली हजारो उदाहरणे समोर असताना आता या जिल्हा परिषदां मधूनच विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गळती सुरू झाली आहे. बेसुमार पद्धतीने वाढणाºया खासगी शाळा, त्याला इंग्रजी माध्यमाची असलेली जोड आणि अशा शाळांकडे पाहिजे तेवढी फी देऊन ...

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्हा परिषदेतील शाळांच्या माध्यमातून शिक्षण घेऊन विविध क्षेत्रांमध्ये उत्तुंग कामगिरी केलेली हजारो उदाहरणे समोर असताना आता या जिल्हा परिषदांमधूनच विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गळती सुरू झाली आहे. बेसुमार पद्धतीने वाढणाºया खासगी शाळा, त्याला इंग्रजी माध्यमाची असलेली जोड आणि अशा शाळांकडे पाहिजे तेवढी फी देऊन मुलांना अशा शाळांमध्ये घालण्याकडे पालकांचा कल यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ही गळती लागल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.गेल्या १० वर्षांचा विचार करता जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पहिली ते चौथी शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांमध्ये ७५७७८ नी घट झाली आहे. त्यामध्ये ४३५६३ मुलांचा तर ३२२१५ मुलींचा समावेश आहे. तालुकास्तरीय गावे आणि तालुक्यातील मोठ्या गावांच्या ठिकाणी अनेक खासगी शाळा, अनुदानित शाळा, विना अनुदानित शाळा, स्वयंअर्थसहाय्यित शाळा सुरू झाल्याने साहजिकच पालकांचा ओढा अशा शाळांकडे वाढला आहे.जिल्हा परिषदांच्या शाळांबाबत आणि तेथील अध्यापनाच्या दर्जाबाबतही सुशिक्षित पालकांमध्ये शंका उत्पन्न होत असल्याचे चित्र दिसत असून त्याचाच हा मोठा परिणाम मानला जातो. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांच्याच मुलांचे २जर सर्वेक्षण केले तर अनेक शिक्षकांची मुले जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकत नाहीत हे वास्तव आहे.एकीकडे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आजरा, भुदरगड, राधानगरी तालुक्यातील विद्यार्थी राज्यात आपला दबदबा निर्माण करत असताना दुसरीकडे अन्य निमशहरी तालुक्यांना ही गुणवत्ता राखताना कसरत करावी लागत आहे. अनेक ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांसाठी राबणूक करत असताना दुसरीकडे पाट्या टाकणाºया शिक्षकांचीही संख्या मोठी आहे. शासनाच्या बदलत्या धोरणांचाही परिणाम होत असल्याचेही चित्र जिल्'ात दिसून येते. दर आठ-दहा दिवसांनी शासनाचे वेगवेगळे येणार आदेश, माहितीचे संकलन करण्यात अडकलेले शिक्षक आणि शिक्षिका, अधिकारी बदलला किंवा सत्ता बदलली की बदलणाºया योजना याचा परिणाम शाळांवर होत असल्याचेही सांगण्यात येते.विद्यार्थ्यांची झालेली घट तालुकानिहायतालुका ३० सप्टेंबर २००६ ३० सप्टेंबर २०१६ झालेली घटआजरा १२००० ०७१७६ ०४८२४गगनबावडा ०३४९० १०५१९ अधिक ७०२९भुदरगड १५५५९ १४०५८ ०१५०१चंदगड २०३८१ १०८९४ ९४८७गडहिंग्लज १६७१४ ०३२९० १३४२४हातकणंगले ३५२५८ २२४४१ १२८१७कागल २२८७९ १६१२६ ०६१३१करवीर ३८१११ २८५०८ ०९६०३पन्हाळा २३०२७ १६८२३ ०६२०४राधानगरी २००५९ १५०८१ ०४९७८शाहूवाडी २१०१४ १५०२९ ०५९८५शिरोळ २६९९१ १९१३८ ०७८५३एकूण २५४८६१ १७९०८३ ७५७७८गगनबावड्यातउलट परिस्थितीएकीकडे ११ तालुक्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या घटत असताना गगनबावडा तालुक्यात मात्र याच्या नेमकी उलटी परिस्थिती दिसत आहे. या तालुक्यात दि. ३० सप्टेंबर २००६ मध्ये ३५४० विद्यार्थी या शाळांमध्ये शिकत होते तर सप्टेंबर २०१६ मध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये तब्बल १०५१९ विद्यार्थी शिकत आहेत म्हणजेच ७०२९ विद्यार्थी संख्या या शाळांमध्ये वाढली आहे. अतिशय दुर्गम भाग आणि छोटी, गावे, वाड्या, वस्त्या असल्याने येथे खासगी शाळा फारशा नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांशिवाय पर्याय नसल्याचे चित्र येथे दिसून येते.

टॅग्स :Schoolशाळाkolhapurकोल्हापूर