शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

विद्यार्थी संख्या ७५ हजाराने घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 00:46 IST

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्हा परिषदेतील शाळांच्या माध्यमातून शिक्षण घेऊन विविध क्षेत्रांमध्ये उत्तुंग कामगिरी केलेली हजारो उदाहरणे समोर असताना आता या जिल्हा परिषदां मधूनच विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गळती सुरू झाली आहे. बेसुमार पद्धतीने वाढणाºया खासगी शाळा, त्याला इंग्रजी माध्यमाची असलेली जोड आणि अशा शाळांकडे पाहिजे तेवढी फी देऊन ...

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्हा परिषदेतील शाळांच्या माध्यमातून शिक्षण घेऊन विविध क्षेत्रांमध्ये उत्तुंग कामगिरी केलेली हजारो उदाहरणे समोर असताना आता या जिल्हा परिषदांमधूनच विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गळती सुरू झाली आहे. बेसुमार पद्धतीने वाढणाºया खासगी शाळा, त्याला इंग्रजी माध्यमाची असलेली जोड आणि अशा शाळांकडे पाहिजे तेवढी फी देऊन मुलांना अशा शाळांमध्ये घालण्याकडे पालकांचा कल यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ही गळती लागल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.गेल्या १० वर्षांचा विचार करता जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पहिली ते चौथी शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांमध्ये ७५७७८ नी घट झाली आहे. त्यामध्ये ४३५६३ मुलांचा तर ३२२१५ मुलींचा समावेश आहे. तालुकास्तरीय गावे आणि तालुक्यातील मोठ्या गावांच्या ठिकाणी अनेक खासगी शाळा, अनुदानित शाळा, विना अनुदानित शाळा, स्वयंअर्थसहाय्यित शाळा सुरू झाल्याने साहजिकच पालकांचा ओढा अशा शाळांकडे वाढला आहे.जिल्हा परिषदांच्या शाळांबाबत आणि तेथील अध्यापनाच्या दर्जाबाबतही सुशिक्षित पालकांमध्ये शंका उत्पन्न होत असल्याचे चित्र दिसत असून त्याचाच हा मोठा परिणाम मानला जातो. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांच्याच मुलांचे २जर सर्वेक्षण केले तर अनेक शिक्षकांची मुले जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकत नाहीत हे वास्तव आहे.एकीकडे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आजरा, भुदरगड, राधानगरी तालुक्यातील विद्यार्थी राज्यात आपला दबदबा निर्माण करत असताना दुसरीकडे अन्य निमशहरी तालुक्यांना ही गुणवत्ता राखताना कसरत करावी लागत आहे. अनेक ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांसाठी राबणूक करत असताना दुसरीकडे पाट्या टाकणाºया शिक्षकांचीही संख्या मोठी आहे. शासनाच्या बदलत्या धोरणांचाही परिणाम होत असल्याचेही चित्र जिल्'ात दिसून येते. दर आठ-दहा दिवसांनी शासनाचे वेगवेगळे येणार आदेश, माहितीचे संकलन करण्यात अडकलेले शिक्षक आणि शिक्षिका, अधिकारी बदलला किंवा सत्ता बदलली की बदलणाºया योजना याचा परिणाम शाळांवर होत असल्याचेही सांगण्यात येते.विद्यार्थ्यांची झालेली घट तालुकानिहायतालुका ३० सप्टेंबर २००६ ३० सप्टेंबर २०१६ झालेली घटआजरा १२००० ०७१७६ ०४८२४गगनबावडा ०३४९० १०५१९ अधिक ७०२९भुदरगड १५५५९ १४०५८ ०१५०१चंदगड २०३८१ १०८९४ ९४८७गडहिंग्लज १६७१४ ०३२९० १३४२४हातकणंगले ३५२५८ २२४४१ १२८१७कागल २२८७९ १६१२६ ०६१३१करवीर ३८१११ २८५०८ ०९६०३पन्हाळा २३०२७ १६८२३ ०६२०४राधानगरी २००५९ १५०८१ ०४९७८शाहूवाडी २१०१४ १५०२९ ०५९८५शिरोळ २६९९१ १९१३८ ०७८५३एकूण २५४८६१ १७९०८३ ७५७७८गगनबावड्यातउलट परिस्थितीएकीकडे ११ तालुक्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या घटत असताना गगनबावडा तालुक्यात मात्र याच्या नेमकी उलटी परिस्थिती दिसत आहे. या तालुक्यात दि. ३० सप्टेंबर २००६ मध्ये ३५४० विद्यार्थी या शाळांमध्ये शिकत होते तर सप्टेंबर २०१६ मध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये तब्बल १०५१९ विद्यार्थी शिकत आहेत म्हणजेच ७०२९ विद्यार्थी संख्या या शाळांमध्ये वाढली आहे. अतिशय दुर्गम भाग आणि छोटी, गावे, वाड्या, वस्त्या असल्याने येथे खासगी शाळा फारशा नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांशिवाय पर्याय नसल्याचे चित्र येथे दिसून येते.

टॅग्स :Schoolशाळाkolhapurकोल्हापूर