शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

आता काँग्रेस विरुद्ध आवाडे

By admin | Updated: February 5, 2017 00:34 IST

हातकणंगले तालुका : आवाडे गटावर अस्तित्व दाखविण्याची वेळ

इचलकरंजी : हातकणंगले तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाकडून आवाडे गटाला डावलल्याने या मतदारसंघात आता काँग्रेस विरुद्ध आवाडे अशीच लढत होणार आहे. त्यामुळे आवाडे गटावर आता अस्तित्व दाखविण्याची वेळ आली आहे. पक्षाकडून डावलले जाण्याच्या हालचाली दिसू लागल्याने आवाडे गटाने तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाच आणि पंचायत समितीच्या दहा जागा कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडीच्या माध्यमातून लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा निर्णय ठामपणे पेलणार की नेहमीप्रमाणे माघार घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार पी. एन. पाटील, माजी खासदार जयवंतराव आवळे व माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्यातील राजकीय वैर सर्वज्ञात आहे. त्यामुळे तिकीट वाटपात आवाडेंना डावलले जाणार याची जोरदार चर्चा सुरू होती, परंतु जिल्हा काँग्रेसच्या उमेदवार निवड समितीमध्ये प्रकाश आवाडे यांना सहभागी करून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न प्रदेश पातळीवरून करण्यात आला होता. मात्र, जिल्हा काँग्रेसकडून आवळे गटाला झुकते माप देत, आवाडे गटाला ज्याठिकाणी वर्चस्व नाही अशा काही मोजक्या जागा देण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्यास नकार देत आवाडे गटाने कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडी स्थापन करून त्या माध्यमातून निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्धार केला. त्याचवेळी ज्या ज्या ठिकाणी जिल्हा ताराराणी विकास आघाडीचे उमेदवार आहेत, त्याठिकाणी काँग्रेस पक्षाने उमेदवार उभे करू नयेत अशी विनंती पक्षश्रेष्ठींना केली होती. मात्र, पक्षाने पहिल्याच फेरीत थेट रेंदाळ मतदारसंघातील उमेदवार जाहीर करून जणू आवाडे यांना आव्हानच दिले. त्यामुळे आता आवाडे गटाला स्वत:चे अस्तित्व सिद्ध करावेच लागणार आहे.कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडीच्यावतीने हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ, हुपरी, पट्टणकोडोली, कबनूर आणि कोरोची या पाच जिल्हा परिषद आणि चंदूर, तारदाळ, कोरोची, कबनूर पश्चिम, कबनूर पूर्व, रेंदाळ, पट्टणकोडोली, रुई, हुपरी दक्षिण व हुपरी उत्तर या दहा पंचायत समितीच्या जागा लढविण्यात येणार आहेत. यामध्ये काही ठिकाणी राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना व शिवसेना यांच्यासह स्थानिक आघाड्यांशी हातमिळवणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, परंतु काही ठिकाणी अशा आघाड्या होण्याची चिन्हे सध्या तरी दृष्टिक्षेपात नाही. दरम्यान, आता काँग्रेस विरुद्ध आवाडे अशा लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून, आवाडे आणि आवळे यांच्यात मतांची विभागणी होणार असल्याने त्याचा फायदा कोणाला होणार याची चर्चा सुरू झाली आहे. (वार्ताहर)आवाडे गटाने निर्णयावर ठाम राहावेगेल्या अनेक वेळचा अनुभव पाहता ऐन वेळेला माघार घेण्याची भूमिका आवाडे गटाने घेतली आहे. आता पुन्हा आवाडे गटाने माघार घेतल्यास ‘लांडगा आलारे आला’ अशी स्थिती आवाडे गटाची होईल. त्यामुळे आवाडे गटाने या निर्णयावर ठाम राहावे, असे राजकीय जाणकारांतून व कार्यकर्त्यांतून बोलले जात आहे.