शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
5
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
6
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
7
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
8
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
9
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
10
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
11
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
12
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
13
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
14
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
15
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
16
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
17
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
18
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
19
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
20
अजितदादांना शह देण्यासाठी पार्थ पवार प्रकरण काढलं गेलं का?; चंद्रकांत पाटील म्हणाले...

आता काँग्रेस विरुद्ध आवाडे

By admin | Updated: February 5, 2017 00:34 IST

हातकणंगले तालुका : आवाडे गटावर अस्तित्व दाखविण्याची वेळ

इचलकरंजी : हातकणंगले तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाकडून आवाडे गटाला डावलल्याने या मतदारसंघात आता काँग्रेस विरुद्ध आवाडे अशीच लढत होणार आहे. त्यामुळे आवाडे गटावर आता अस्तित्व दाखविण्याची वेळ आली आहे. पक्षाकडून डावलले जाण्याच्या हालचाली दिसू लागल्याने आवाडे गटाने तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाच आणि पंचायत समितीच्या दहा जागा कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडीच्या माध्यमातून लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा निर्णय ठामपणे पेलणार की नेहमीप्रमाणे माघार घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार पी. एन. पाटील, माजी खासदार जयवंतराव आवळे व माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्यातील राजकीय वैर सर्वज्ञात आहे. त्यामुळे तिकीट वाटपात आवाडेंना डावलले जाणार याची जोरदार चर्चा सुरू होती, परंतु जिल्हा काँग्रेसच्या उमेदवार निवड समितीमध्ये प्रकाश आवाडे यांना सहभागी करून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न प्रदेश पातळीवरून करण्यात आला होता. मात्र, जिल्हा काँग्रेसकडून आवळे गटाला झुकते माप देत, आवाडे गटाला ज्याठिकाणी वर्चस्व नाही अशा काही मोजक्या जागा देण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्यास नकार देत आवाडे गटाने कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडी स्थापन करून त्या माध्यमातून निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्धार केला. त्याचवेळी ज्या ज्या ठिकाणी जिल्हा ताराराणी विकास आघाडीचे उमेदवार आहेत, त्याठिकाणी काँग्रेस पक्षाने उमेदवार उभे करू नयेत अशी विनंती पक्षश्रेष्ठींना केली होती. मात्र, पक्षाने पहिल्याच फेरीत थेट रेंदाळ मतदारसंघातील उमेदवार जाहीर करून जणू आवाडे यांना आव्हानच दिले. त्यामुळे आता आवाडे गटाला स्वत:चे अस्तित्व सिद्ध करावेच लागणार आहे.कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडीच्यावतीने हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ, हुपरी, पट्टणकोडोली, कबनूर आणि कोरोची या पाच जिल्हा परिषद आणि चंदूर, तारदाळ, कोरोची, कबनूर पश्चिम, कबनूर पूर्व, रेंदाळ, पट्टणकोडोली, रुई, हुपरी दक्षिण व हुपरी उत्तर या दहा पंचायत समितीच्या जागा लढविण्यात येणार आहेत. यामध्ये काही ठिकाणी राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना व शिवसेना यांच्यासह स्थानिक आघाड्यांशी हातमिळवणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, परंतु काही ठिकाणी अशा आघाड्या होण्याची चिन्हे सध्या तरी दृष्टिक्षेपात नाही. दरम्यान, आता काँग्रेस विरुद्ध आवाडे अशा लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून, आवाडे आणि आवळे यांच्यात मतांची विभागणी होणार असल्याने त्याचा फायदा कोणाला होणार याची चर्चा सुरू झाली आहे. (वार्ताहर)आवाडे गटाने निर्णयावर ठाम राहावेगेल्या अनेक वेळचा अनुभव पाहता ऐन वेळेला माघार घेण्याची भूमिका आवाडे गटाने घेतली आहे. आता पुन्हा आवाडे गटाने माघार घेतल्यास ‘लांडगा आलारे आला’ अशी स्थिती आवाडे गटाची होईल. त्यामुळे आवाडे गटाने या निर्णयावर ठाम राहावे, असे राजकीय जाणकारांतून व कार्यकर्त्यांतून बोलले जात आहे.