शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

...आता लक्ष जयसिंगपूर ऊस परिषदेकडे

By admin | Updated: October 18, 2015 23:37 IST

‘एफआरपी’बाबत कोण ‘भारी’ ठरणार : शासन कोणती भूमिका घेणार

संदीप बावचे - जयसिंगपूर -यंदाच्या वर्षी एकरकमी ‘एफआरपी’ मिळावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. कोल्हापूर येथे साखर सहसंचालक कार्यालयावर विराट मोर्चा काढून ‘स्वाभिमानी’ने रणशिंग फुंकले आहे. तर ६ नोव्हेंबरला जयसिंगपूर येथे होणाऱ्या ऊस परिषदेमध्ये खा. राजू शेट्टी आंदोलनाची दिशा जाहीर करणार आहेत. गेल्या ऊस परिषदेत सावध भूमिका घेऊन जादा दिवसाचा सरकारला एल्टीमेटम दिला होता. यावर्षी एकरकमी एफआरपीबाबत कोणती भूमिका घेऊन आंदोलनाची दिशा ठरणार, याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.ऊस उत्पादन खर्च व दर याचा ताळमेळ बसत नसल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला साखर कारखानदारांनी एफआरपीची रक्कम तीन टप्प्यांत देण्याच्या भूमिकेवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एफआरपीचा हाच धागा पकडून एकरकमी एफआरपी हवी यावर जोर धरला आहे. ठिकठिकाणी शेतकरी मेळावे घेऊन जनजागृती केली, सह्यांची मोहीम राबवून १६ आॅक्टोबरला कोल्हापूर येथील साखर सहसंचालक कार्यालयावर विराट मोर्चा काढला. एकरकमी एफआरपीच्या मुद्यावरून ‘स्वाभिमानी’ आक्रमक झाली असून, ‘एफआरपी’प्रश्नी प्रसंगी न्यायालयात जाण्याचाही पवित्रा ‘स्वाभिमानी’ने घेतला आहे.कोल्हापूर येथे काढलेल्या मोर्चात खा. राजू शेट्टी यांनी यावर्षी दुष्काळ असल्यामुळे साखरेचे उत्पादनही कमी होणार आहे. ३ हजाराच्यावर साखरेचे दर होतील, त्यामुळे सरकारला एकरकमी एफआरपी देण्यास अडचण येणार नाही. मात्र, साखर कारखान्यांनी टप्प्याटप्प्याने एफआरपी देण्याचे जाहीर केले आहे. त्यांचा हा डाव मोडून काढून एकरकमी रक्कम घेऊ, असे ‘स्वाभिमानी’ने शासनाला खडसावले आहे.६ नोव्हेंबरला जयसिंगपूर येथे ऊस परिषदेची घोषणा खा. शेट्टी यांनी केली आहे. ऊस परिषद ऐतिहासिक होण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. ६ नोव्हेंबरपर्यंत शासन कोणती भूमिका घेते याकडे स्वाभिमानीचे लक्ष असून, शासनाने कारखानदारांची बाजू घेतली तर शासनाच्या विरोधात आरपारची लढाई करण्याची तयारीही ‘स्वाभिमानी’ची असल्यामुळे ऊस परिषदेकडे कारखानदार, शासन व शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीतएकवेळी खासदार शेट्टींच्या खांद्याला खादा लावून काम करणारे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनीही एकरकमी एफआरपीबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव दिला आहे. प्रसंगी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शिवसेनाही रस्त्यावर उतरणार असल्याची भूमिका जाहीर केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी खा. शेट्टी व आ. पाटील दोघेही ऊस दराचा प्रश्न उचलून धरत असल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपीची आशा निर्माण झाली आहे.यशस्वी कोण ठरणारतीन टप्प्यांतील एफआरपीबाबत शासनाने कोणतीही भूमिका अद्याप जाहीर केलेली नाही. ‘स्वाभिमानी’ने एकरकमी एफआरपीचा मुद्दा उचलून धरला आहे, तर कारखानदारांनी टप्प्याटप्प्याने एफआरपी देण्याची भूमिका घेतली आहे. एफआरपीच्या मुद्यावरून शासन, संघटना की कारखानदार यशस्वी होणार हा देखील कळीचा मुद्दा आहे. पहिली उचल मागे पडलीप्रत्येक वर्षी ऊस परिषदेमध्ये पहिली उचल मागायची आणि आंदोलन अंती तोडगा काढून दर निश्चित केला जात असे. मात्र, यावर्षी पहिल्यांदाच पहिल्या उचलीचा मुद्दा मागे पडला असून, एफआरपी एकरकमी द्या, अशी मागणी ‘स्वाभिमानी’ने सुरुवातीपासूनच केल्यामुळे ऊस परिषदेतील एकरकमी एफआरपीचा मुद्दा केंद्रस्थानी ठरणार आहे.