शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
2
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन
3
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
4
Beed: लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण
5
Viral Video : अरे बापरे हे काय बघितलं! महिलेने कॅमेरा सुरू केला अन् पुढे जे काही घडलं... ; व्हिडीओ बघून तुम्हीही हैराण व्हाल!
6
सरकारी बँकांमध्ये वाढणार परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा! सरकार करतंय मोठी तयारी
7
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...
8
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
9
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
10
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
11
'माझ्या बायकोला तू पळवून लावलंस!'; रागाच्या भरात भावाने बहिणीची केली निर्घृण हत्या
12
"लग्न नाही, फॅमिली नाही विचार करा...", फुकटचा सल्ला देणाऱ्या चाहत्याला जुईचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "अशा माणसांची..."
13
नवरात्रीतील विनायक चतुर्थी २०२५: 'या' ८ राशींसाठी जुळून आले ३ महाशुभ योग; मिळेल विशेष धनलाभ!
14
मुलाला तुरुंगवास, धक्का बसलेल्या वडिलांनी संपवलं जीवन, अंत्यसंस्कारावेळी घडलं असं काही, ७ पोलीस निलंबित
15
पाकिस्तान युद्धात सैनिक लढला होता, नंतर पेन्शनशिवाय काढून टाकले; पत्नीला ५७ वर्षांनंतर मिळाला न्याय
16
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
17
Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु!
18
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
19
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
20
एकाच वेळी पाच-सहा मराठी सिनेमे रिलीज, कसं व्हायचं? प्रसिद्ध गायकाने मांडलं मत, इंडस्ट्रीबद्दल म्हणाला...

कर्नाटकातील ऊसदराकडे आता सर्वांचे लक्ष

By admin | Updated: November 3, 2014 00:42 IST

संघटना आक्रमक : तीन हजार २०० रुपये पहिला हप्ता विनाकपात देण्याची मागणी

कोल्हापूर : महाराष्ट्रात प्रत्येक वर्षी ऊसदराच्या प्रश्नावर आंदोलनाचे रणशिंग फुंकणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यंदाच्या गळीत हंगामासाठी पहिला हप्ता विनाकपात २७०० रुपयांची मागणी केली आहे. दरम्यान, कर्नाटकातील शेतकरी संघटना यंदा रिकव्हरीनुसार बेळगाव, बागलकोट जिल्ह्यांतील ऊस उत्पादकांना तीन हजार २०० रुपये पहिला हप्ता विनाकपात द्यावा, या निर्णयापर्यंत आली आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील अनेक ऊस उत्पादक बेळगाव जिल्ह्यातील अधिक दर देणाऱ्या कारखान्यांना ऊस देत असतात. त्यामुळे कर्नाटकातील ऊसदराच्या मागणीकडे या भागातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांची सीमा बेळगाव जिल्ह्याजवळ आहे. बेळगाव आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील काही साखर कारखान्यांनी बहुराज्य परवाना घेतला आहे. सांगली, कोल्हापूर, बेळगाव, बागलकोट या भागांतील शेतकरी प्रत्येक वर्षी जो कारखाना अधिक ऊस दर देतो, त्या कारखान्याला ऊस देत असतात. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीला या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऊसदराची उत्सुकता लागलेली असते. कर्नाटकात गेल्यावर्षी एसएपी कायद्यांतर्गत ऊसखरेदी नियंत्रण मंडळाची बैठक घेऊन पहिला हप्ता म्हणून २५०० रुपये कारखानदारांनी द्यावे, अशी घोषणा तेथील मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली. मात्र, कारखानदारांनी हा दर आम्हाला देता येत नाही, असे सांगितले तर शेतकऱ्यांनीही ‘आम्हाला परवडत नाही. प्रतिटन तीन हजार दर मिळावा,’ अशी मागणी लावून धरली. बेळगावातील ‘सुवर्णसौध’मध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असताना विविध शेतकरी संघटनांनी आंदोलन केले. शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे रायबाग (जि. बेळगाव) तालुक्यातील इटनाळ गावच्या शेतकऱ्याने आंदोलनाच्या ठिकाणीच कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. त्यानंतर जाग्या झालेल्या शासनाने प्रतिटन दीडशे रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आश्वासन दिले. दीडशे रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना मिळाले; परंतु कर्नाटक शासनाने निश्चित केलेला २५०० रुपयांचा भाव कर्नाटकातील एकाही साखर कारखान्याने दिलेला नाही. बेळगाव जिल्ह्यातील चार कारखान्यांनी २३५० रुपयांपर्यंत दर दिला आहे. उर्वरित सर्वच कारखान्यांनी दोन हजार ते २२०० रुपयेच दिले आहेत. यामुळे कारखान्यांविरोधात शेतकरी संघटना न्यायालयात गेली आहे. गेल्या हंगामात सांगली, कोल्हापूरच्या तुलनेत कर्नाटकातील ऊसदर कमीच राहिला. यंदा कर्नाटकात अजूनही ऊस खरेदी नियंत्रण मंडळाची बैठक झालेली नाही. त्यामुळे दर निश्चित झालेला नाही. मात्र, महिन्यापूर्वी कर्नाटक शासनाने ‘एफआरपी’च यंदाचा दर असेल, अशी घोषणा करून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण केला. परंतु, साडेनऊ रिकव्हरीला २२०० रुपये एफआरपी निश्चित केली आहे. रिकव्हरी अधिक असल्यामुळे बेळगाव, बागलकोट जिल्ह्यांतील साखर कारखान्यांकडून तीन हजार रुपये मिळावेत, अशी तेथील शेतकरी संघटनेची मागणी आहे.कर्नाटकात एसएपी कायदा आहे. यामुळे रिकव्हरीनुसार ऊस खरेदी नियंत्रण मंडळाने ठरविलेला भाव कारखानदारांना देणे बंधनकारक आहे. बेळगाव, बागलकोट जिल्ह्यांतील रिकव्हरीचा विचार केल्यास यंदाच्या उसाला कारखानदारांनी तीन हजार २०० रुपये असा पहिला हप्ता देणे आवश्यक आहे. कारखानदारांनीच तोडणी, ओढणीचा खर्च करावा, अशीही आमची मागणी आहे. येत्या दोन दिवसांत दरासंबंधी भूमिका स्पष्ट करणार आहोत. - कुरबूर शांतकुमार, कर्नाटक राज्य ऊस उत्पादक संघटना