शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

कर्नाटकातील ऊसदराकडे आता सर्वांचे लक्ष

By admin | Updated: November 3, 2014 00:42 IST

संघटना आक्रमक : तीन हजार २०० रुपये पहिला हप्ता विनाकपात देण्याची मागणी

कोल्हापूर : महाराष्ट्रात प्रत्येक वर्षी ऊसदराच्या प्रश्नावर आंदोलनाचे रणशिंग फुंकणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यंदाच्या गळीत हंगामासाठी पहिला हप्ता विनाकपात २७०० रुपयांची मागणी केली आहे. दरम्यान, कर्नाटकातील शेतकरी संघटना यंदा रिकव्हरीनुसार बेळगाव, बागलकोट जिल्ह्यांतील ऊस उत्पादकांना तीन हजार २०० रुपये पहिला हप्ता विनाकपात द्यावा, या निर्णयापर्यंत आली आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील अनेक ऊस उत्पादक बेळगाव जिल्ह्यातील अधिक दर देणाऱ्या कारखान्यांना ऊस देत असतात. त्यामुळे कर्नाटकातील ऊसदराच्या मागणीकडे या भागातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांची सीमा बेळगाव जिल्ह्याजवळ आहे. बेळगाव आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील काही साखर कारखान्यांनी बहुराज्य परवाना घेतला आहे. सांगली, कोल्हापूर, बेळगाव, बागलकोट या भागांतील शेतकरी प्रत्येक वर्षी जो कारखाना अधिक ऊस दर देतो, त्या कारखान्याला ऊस देत असतात. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीला या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऊसदराची उत्सुकता लागलेली असते. कर्नाटकात गेल्यावर्षी एसएपी कायद्यांतर्गत ऊसखरेदी नियंत्रण मंडळाची बैठक घेऊन पहिला हप्ता म्हणून २५०० रुपये कारखानदारांनी द्यावे, अशी घोषणा तेथील मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली. मात्र, कारखानदारांनी हा दर आम्हाला देता येत नाही, असे सांगितले तर शेतकऱ्यांनीही ‘आम्हाला परवडत नाही. प्रतिटन तीन हजार दर मिळावा,’ अशी मागणी लावून धरली. बेळगावातील ‘सुवर्णसौध’मध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असताना विविध शेतकरी संघटनांनी आंदोलन केले. शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे रायबाग (जि. बेळगाव) तालुक्यातील इटनाळ गावच्या शेतकऱ्याने आंदोलनाच्या ठिकाणीच कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. त्यानंतर जाग्या झालेल्या शासनाने प्रतिटन दीडशे रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आश्वासन दिले. दीडशे रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना मिळाले; परंतु कर्नाटक शासनाने निश्चित केलेला २५०० रुपयांचा भाव कर्नाटकातील एकाही साखर कारखान्याने दिलेला नाही. बेळगाव जिल्ह्यातील चार कारखान्यांनी २३५० रुपयांपर्यंत दर दिला आहे. उर्वरित सर्वच कारखान्यांनी दोन हजार ते २२०० रुपयेच दिले आहेत. यामुळे कारखान्यांविरोधात शेतकरी संघटना न्यायालयात गेली आहे. गेल्या हंगामात सांगली, कोल्हापूरच्या तुलनेत कर्नाटकातील ऊसदर कमीच राहिला. यंदा कर्नाटकात अजूनही ऊस खरेदी नियंत्रण मंडळाची बैठक झालेली नाही. त्यामुळे दर निश्चित झालेला नाही. मात्र, महिन्यापूर्वी कर्नाटक शासनाने ‘एफआरपी’च यंदाचा दर असेल, अशी घोषणा करून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण केला. परंतु, साडेनऊ रिकव्हरीला २२०० रुपये एफआरपी निश्चित केली आहे. रिकव्हरी अधिक असल्यामुळे बेळगाव, बागलकोट जिल्ह्यांतील साखर कारखान्यांकडून तीन हजार रुपये मिळावेत, अशी तेथील शेतकरी संघटनेची मागणी आहे.कर्नाटकात एसएपी कायदा आहे. यामुळे रिकव्हरीनुसार ऊस खरेदी नियंत्रण मंडळाने ठरविलेला भाव कारखानदारांना देणे बंधनकारक आहे. बेळगाव, बागलकोट जिल्ह्यांतील रिकव्हरीचा विचार केल्यास यंदाच्या उसाला कारखानदारांनी तीन हजार २०० रुपये असा पहिला हप्ता देणे आवश्यक आहे. कारखानदारांनीच तोडणी, ओढणीचा खर्च करावा, अशीही आमची मागणी आहे. येत्या दोन दिवसांत दरासंबंधी भूमिका स्पष्ट करणार आहोत. - कुरबूर शांतकुमार, कर्नाटक राज्य ऊस उत्पादक संघटना