शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

आता ग्राहक होणार पॉवरफुल्ल, नवीन कायदा सोमवारपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 12:39 IST

ग्राहकांच्या फसवणुकीचे वाढते प्रकार रोखण्यासाठी केंद्र सरकारने नवीन ग्राहक संरक्षण कायदा -२०१९ आणला आहे. याची अंमलबजावणी सोमवार (दि. २०) पासून देशभरात सुरू होणार आहे. जुन्या कायद्यात नसलेले ग्राहकांच्या हिताचे नवीन नियम लागू केले जाणार आहेत. त्यामुळे ग्राहकाची बाजू सबल होणार आहे.

ठळक मुद्देआता ग्राहक होणार पॉवरफुल्लनवीन ग्राहक संरक्षण कायदा - २०१९ सोमवारपासून लागू

कोल्हापूर : ग्राहकांच्या फसवणुकीचे वाढते प्रकार रोखण्यासाठी केंद्र सरकारने नवीन ग्राहक संरक्षण कायदा -२०१९ आणला आहे. याची अंमलबजावणी सोमवार (दि. २०) पासून देशभरात सुरू होणार आहे. जुन्या कायद्यात नसलेले ग्राहकांच्या हिताचे नवीन नियम लागू केले जाणार आहेत. त्यामुळे ग्राहकाची बाजू सबल होणार आहे.

हा कायदा मागील वर्षी तयार करण्यात आला होता. तो काही महिन्यांपूर्वीच लागू होणार होता; परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे या कायद्याची अंमलबजावणी पुढे ढकलण्यात आली होती. आता हा नवीन कायदा सोमवारपासून लागू होणार आहे. यात टेलिशॉपिंग व ऑनलाइर्न कंपन्यांचाही नव्याने समावेश केला आहे; तर १०० अधिक नवीन कलमे यात समविष्ट केली आहेत. पूर्वी जिल्हा ग्राहक मंचाच्या कार्यकक्षेत २० लाखांपर्यंतचे दावे दाखल करता येत होते. त्यात वाढवून एक कोटीपर्यंतचे दावे दाखल करता येणार आहेत. भेसऴयुक्त पदार्थ व वस्तूंपासून जीवितहानी झाली तर उत्पादकांना तुरुंगवासासह दहा लाखांपर्यंतचा दंड अशी तरतूद यात आहे.वैशिष्ट्ये अशी,

  • ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती दाखवल्यास कारवाई केली जाणार आहे.
  • ग्राहक देशातील कोणत्याही ग्राहक न्यायालयात खटला दाखल करू शकतो.
  • ऑनलाइन आणि टेलिशॉपिंग कंपन्यांचा प्रथमच नव्या कायद्यात समावेश होणार आहे.
  • खाण्या-पिण्याच्या जिन्नसांमध्ये भेसळ करणाऱ्या कंपन्यांना दंड व तुरुंगवासाची तरतूद
  •  ग्राहक मध्यस्थ सेलची स्थापना; दोन्ही पक्षकार परस्पर संमतीने या सेलमध्ये जाऊ शकतात.
  • याचिका आता ग्राहक मंचामध्ये दाखल करता येणार आहे. आधीच्या कायद्यात तशी तरतूद नव्हती.
  •  ग्राहक मंचामध्ये सुमारे एक कोटी खटले दाखल करता येणार आहेत.
  • राज्य ग्राहक विवाद निवारण आयोग एक कोटी ते दहा कोटीपर्यंतच्या, तर राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगात १० कोटींपेक्षा जास्त प्रकरणांची सुनावणी होणार आहे.

कोल्हापूर तिसऱ्या स्थानीमुंबई, पुण्यानंतर कोल्हापुरात सर्वाधिक दीडशेहून अधिक तक्रारी गेल्या वर्षी दाखल झाल्या. विशेष म्हणजे ग्रामीण भागातून सर्वाधिक तक्रारींचा ओघ आहे. यातील निम्म्या तक्रारींचे निवारण जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेत झाले आहे. 

सरकारने आणलेला नवीन कायदा ग्राहकांच्या हिताचा आहे. त्यांचा लाभ ग्राहकांनी घ्यावा.- अरुण यादव ,सदस्य, राज्य ग्राहक संरक्षण परिषद, मंत्रालय, मुंबई

टॅग्स :consumerग्राहकkolhapurकोल्हापूर