शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

रेल्वेने फाटक बंद केल्याने आता कोल्हापूरकरांचा नवा छुपा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 13:18 IST

रेल्वे प्रशासनाने गेल्या आठवड्यात मध्यवर्ती बसस्थानक ते राजारामपुरीला जोडणारा रेल्वे फाटक क्रमांक एक पादचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी बंदी घातली तरी, पादचाऱ्यांनी मात्र नवा छुपा मार्ग शोधून काढून पुन्हा धोकादायक प्रवास सुरु केला आहे.

ठळक मुद्देरेल्वेच्या बंदीला झुगारुन धोकादायक मार्गक्रमण बाबुभाई परिख पूलांच्या खालून धोकादायक प्रवास

कोल्हापूर : रेल्वे प्रशासनाने गेल्या आठवड्यात मध्यवर्ती बसस्थानक ते राजारामपुरीला जोडणारा रेल्वे फाटक क्रमांक एक पादचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी बंदी घातली तरी, पादचाऱ्यांनी मात्र नवा छुपा मार्ग शोधून काढून पुन्हा धोकादायक प्रवास सुरु केला आहे. प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी रेल्वे प्रशासनाने हे पाऊल जरी उचलले असले तरी पादचाऱ्यांनीही हार न मानता रेल्वेच्या बंदीला झुगारुन धोकादायक मार्गक्रमण सुरुच ठेवले आहे.रेल्वे प्रशासनाने कोल्हापूर स्टेशन नजीकचा रेल्वे रूळ ओलांडण्यास गेल्या आठवड्यात लोकांना बंदी घातली. त्यामुळे राजरामपुरीत येणाऱ्या आणि जाणाऱ्या असंख्य लोकांची गैरसोय झाली, मात्र तरीही लोकांनी हार न मानता पुन्हा या फाटकाजवळील १00 ते १५0 मीटर अंतरावर असलेला नवा धोकादायक मार्ग शोधून काढून तेथून ये-जा सुरु केली आहे.

या प्रकाराकडे अजूनतरी रेल्वे प्रशासनाने डोळेझाक केली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेने अजूनतरी पर्यायी व्यवस्था केली नसल्याने पादचाऱ्यांना परिख पूलाखालून जाण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.रेल्वेचा सध्या अस्तित्वात असलेला परिख पूल धोकादायक बनला आहे, अरुंद रस्त्याममुळे तेथुनही जीव मुठीत घेऊन मार्गस्थ व्हावे लागत आहे. नवा पादचारी मार्ग बांधण्याची जबाबदारी महापालिकेची असतानाही त्याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले जात आहे.

यामुळे या परिसरातील नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थी यांचा प्रवास सुरिक्षत करण्याची जबाबदारी कोण घेणार, येथे नवा पूल केव्हा होणार, असाच सवाल केला जात आहे.सध्या रेल्वेफाटक बंद केल्याने या मार्गावरून होणारा प्रवास करण्यासाठी लोकांना परीख पुलाखालून ये-जा करावी लागत आहे. तो गैरसोयीचा असल्यामुळे पादचाऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

गेल्याच आठवड्यात रेल्वे अधिकाऱ्यांनी राजर्षी शाहू महाराज टर्मिनस रेल्वेस्थानकासह परिसराची पाहणी केली होती. मध्यवर्ती बसस्थानक ते राजारामपुरीला जोडणारे रेल्वे फाटक क्रमांक एक या ठिकाणी घडणाऱ्या वारंवार होणाऱ्या दुर्घटनामुळे रेल्वे रूळ पादचाऱ्यांसाठी बंद करण्याचा करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला होता. त्यानुसार या ठिकाणी रेल्वे प्रशासनाने संरक्षक भिंत बांधून हा मार्गच बंद केला.राजारामपुरी मार्ग मध्यवर्ती बसस्थानकाकडे तसेच मध्यवर्ती बसस्थानक ते राजारामपुरी व शाहुपूरीकडे येण्यासाठी रेल्वे फाटक हा पादचाऱ्यांसाठी जवळचा आणि सोयीचा मार्ग होता. या मार्गावरून दररोज हजारो नागरिक ये - जा करत होते.

आता हा मार्ग बंद झाल्याने नागरिकांना बाबुभाई परिख पूलांच्या खालून प्रवास करावा लागत आहे. हा पूल आधीच अरुंद आणि गलिच्छ आहे. त्यामध्ये आता वाहनधारकांसोबत पादचाऱ्यांनाही एकाच वेळी ये - जा करावी लागत असल्यामुळे वाहतूकींची मोठी कोंडी होत आहे.रेल्वे प्रशासनाने वाहतूक बंद केल्याने पादचाऱ्यांना आता परीख पुलाखालून प्रवास करावा लागतो, या ठिकाणी नेहमी ड्रेनेजचे पाणी पसरत असल्याने ते गलिच्छ पाणी येथून ये - जा करणाऱ्या पादचाऱ्यांच्या अंगावर उडत असल्याने वादाचे प्रसंग घडत आहे. त्यामुळे महानगरपालिकेने पादचारी पूल बांधावा. तत्पूर्वी पूलाखालील ड्रेनेज पाईप लाईनचे काम तत्काळ करावे, अशी मागणी प्रवाशांच्यामधून होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरIndian Railwayभारतीय रेल्वे