शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

रेल्वेने फाटक बंद केल्याने आता कोल्हापूरकरांचा नवा छुपा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 13:18 IST

रेल्वे प्रशासनाने गेल्या आठवड्यात मध्यवर्ती बसस्थानक ते राजारामपुरीला जोडणारा रेल्वे फाटक क्रमांक एक पादचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी बंदी घातली तरी, पादचाऱ्यांनी मात्र नवा छुपा मार्ग शोधून काढून पुन्हा धोकादायक प्रवास सुरु केला आहे.

ठळक मुद्देरेल्वेच्या बंदीला झुगारुन धोकादायक मार्गक्रमण बाबुभाई परिख पूलांच्या खालून धोकादायक प्रवास

कोल्हापूर : रेल्वे प्रशासनाने गेल्या आठवड्यात मध्यवर्ती बसस्थानक ते राजारामपुरीला जोडणारा रेल्वे फाटक क्रमांक एक पादचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी बंदी घातली तरी, पादचाऱ्यांनी मात्र नवा छुपा मार्ग शोधून काढून पुन्हा धोकादायक प्रवास सुरु केला आहे. प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी रेल्वे प्रशासनाने हे पाऊल जरी उचलले असले तरी पादचाऱ्यांनीही हार न मानता रेल्वेच्या बंदीला झुगारुन धोकादायक मार्गक्रमण सुरुच ठेवले आहे.रेल्वे प्रशासनाने कोल्हापूर स्टेशन नजीकचा रेल्वे रूळ ओलांडण्यास गेल्या आठवड्यात लोकांना बंदी घातली. त्यामुळे राजरामपुरीत येणाऱ्या आणि जाणाऱ्या असंख्य लोकांची गैरसोय झाली, मात्र तरीही लोकांनी हार न मानता पुन्हा या फाटकाजवळील १00 ते १५0 मीटर अंतरावर असलेला नवा धोकादायक मार्ग शोधून काढून तेथून ये-जा सुरु केली आहे.

या प्रकाराकडे अजूनतरी रेल्वे प्रशासनाने डोळेझाक केली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेने अजूनतरी पर्यायी व्यवस्था केली नसल्याने पादचाऱ्यांना परिख पूलाखालून जाण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.रेल्वेचा सध्या अस्तित्वात असलेला परिख पूल धोकादायक बनला आहे, अरुंद रस्त्याममुळे तेथुनही जीव मुठीत घेऊन मार्गस्थ व्हावे लागत आहे. नवा पादचारी मार्ग बांधण्याची जबाबदारी महापालिकेची असतानाही त्याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले जात आहे.

यामुळे या परिसरातील नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थी यांचा प्रवास सुरिक्षत करण्याची जबाबदारी कोण घेणार, येथे नवा पूल केव्हा होणार, असाच सवाल केला जात आहे.सध्या रेल्वेफाटक बंद केल्याने या मार्गावरून होणारा प्रवास करण्यासाठी लोकांना परीख पुलाखालून ये-जा करावी लागत आहे. तो गैरसोयीचा असल्यामुळे पादचाऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

गेल्याच आठवड्यात रेल्वे अधिकाऱ्यांनी राजर्षी शाहू महाराज टर्मिनस रेल्वेस्थानकासह परिसराची पाहणी केली होती. मध्यवर्ती बसस्थानक ते राजारामपुरीला जोडणारे रेल्वे फाटक क्रमांक एक या ठिकाणी घडणाऱ्या वारंवार होणाऱ्या दुर्घटनामुळे रेल्वे रूळ पादचाऱ्यांसाठी बंद करण्याचा करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला होता. त्यानुसार या ठिकाणी रेल्वे प्रशासनाने संरक्षक भिंत बांधून हा मार्गच बंद केला.राजारामपुरी मार्ग मध्यवर्ती बसस्थानकाकडे तसेच मध्यवर्ती बसस्थानक ते राजारामपुरी व शाहुपूरीकडे येण्यासाठी रेल्वे फाटक हा पादचाऱ्यांसाठी जवळचा आणि सोयीचा मार्ग होता. या मार्गावरून दररोज हजारो नागरिक ये - जा करत होते.

आता हा मार्ग बंद झाल्याने नागरिकांना बाबुभाई परिख पूलांच्या खालून प्रवास करावा लागत आहे. हा पूल आधीच अरुंद आणि गलिच्छ आहे. त्यामध्ये आता वाहनधारकांसोबत पादचाऱ्यांनाही एकाच वेळी ये - जा करावी लागत असल्यामुळे वाहतूकींची मोठी कोंडी होत आहे.रेल्वे प्रशासनाने वाहतूक बंद केल्याने पादचाऱ्यांना आता परीख पुलाखालून प्रवास करावा लागतो, या ठिकाणी नेहमी ड्रेनेजचे पाणी पसरत असल्याने ते गलिच्छ पाणी येथून ये - जा करणाऱ्या पादचाऱ्यांच्या अंगावर उडत असल्याने वादाचे प्रसंग घडत आहे. त्यामुळे महानगरपालिकेने पादचारी पूल बांधावा. तत्पूर्वी पूलाखालील ड्रेनेज पाईप लाईनचे काम तत्काळ करावे, अशी मागणी प्रवाशांच्यामधून होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरIndian Railwayभारतीय रेल्वे