शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

Kolhapur: निवडणुकीतून माघार, तरीही हिशोब सादर करण्याच्या नोटिसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 17:38 IST

उमेदवारांचे भविष्य टांगणीला

कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीतून माघार घेतलेल्या उमेदवारांना जिल्हा प्रशासनाच्या ग्रामपंचायत विभागाकडून शासनाला निवडणूक खर्चाचा हिशोब वेळेत सादर न केल्याने सुनावणीस हजर राहण्याच्या नोटिसा पाठवण्याचा अजब प्रकार झाला आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ज्या उमेदवारांनी निवडणूकच लढवलेली नाही त्यांनी खर्चाचा हिशोब सादर करायचा नसताे. पण, नोटिशीनुसार सुनावणीला आले नाही तर, उमेदवारांची चूक नसताना त्यांच्यावर ६ वर्षे बंदीची टांगती तलवार आहे.जिल्ह्यातील १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३ या काळात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींची निवडणूक नोव्हेंबर २०२३ मध्ये पार पडली. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार निवडणूक लढवलेल्या उमेदवारांनी निकाल लागल्यापासून एक महिन्याच्या आता निवडणूक खर्च प्रशासनाला सादर करणे बंधनकारक असते. अन्यथा त्यांना ६ वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी घातली जाते. मात्र हा नियम निवडणुकीतून माघार घेतलेल्या उमेदवारांना लागू नाही. असे असतानाही पन्हाळ्यातील माघार घेतलेल्या उमेदवारांनादेखील नोटीस काढून सुनावणीसाठी १६ जानेवारीस पन्हाळा तहसीलदार कार्यालयात हजर राहण्याची नोटिस काढली आहे. त्यावेळी काहीजणांनी म्हणणे मांडले, पण बाकीच्यांचे राजकीय भविष्य टांगणीला लागले आहे.

पण आदेश नाही..दोन वर्षांपूर्वीच्या निवडणुकीच्या नोटिसा आता कशा याबाबत विचारले असता समजले की, तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या काळात याबाबतची सुनावणी पूर्ण झाली होती. मात्र आदेश झालेला नव्हता. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची पुन्हा सुनावणी घेण्यास सांगितले.शाहूवाडीत नाही, मग पन्हाळ्यात का?पन्हाळा-शाहूवाडीत एकाचवेळी निवडणूक झालेली असताना शाहूवाडीतील माघार घेतलेल्या उमेदवारांना अशा कोणत्याही नोटिसा आलेल्या नाहीत. मग पन्हाळ्यातच का आल्या हा प्रश्न आहे, म्हणजे कोणत्या तरी एका कार्यालयाकडून चूक झाली आहे. निवडणूक आयोगाचे निर्देश बघता पन्हाळ्याच्या बाबतीतच गफलत झाल्याचे दिसते.

उमेदवारांचे भवितव्य धोक्यात..माघार घेतलेले अनेक उमेदवार आपल्याला खर्च सादर करायचा नाही, म्हणून निर्धास्त आहेत. नोटिस काही जणांना मिळाली, काहींना नाही. ज्यांना मिळाली त्यापैकी काहीजण तहसिल कार्यालयात सुनावणीवेळी निवडणूक आयोगाचे खर्चाच्या सूचनांचे पत्र जोडून म्हणणे सादर केले व त्याची पोच मागितली. मात्र सुनावणी घेतलेल्या कर्मचाऱ्यांनी पोच दिली नाही अशी उमेदवारांची तक्रार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक 2024