शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

तासगाव कारखान्याच्या अवसायकांना नोटीस!

By admin | Updated: November 5, 2014 00:48 IST

मंडळाकडून दुर्लक्ष : फंडाची रक्कम न भरल्याप्रकरणी कारवाई

सांगली : तासगाव साखर कारखान्याकडील १ एप्रिल २००४ ते जुलै २००५ या कालावधीतील ७५० कर्मचाऱ्यांची फंडाची सुमारे अडीच कोटीची रक्कम भविष्य निर्वाह निधी विभागाकडे भरलेली नाही. याप्रकरणी कोल्हापूर येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने तासगाव कारखान्याकडील अवसायक मंडळाला तीन नोटिसा बजावल्या आहेत. तरीही अवसायक मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून कोणतेही उत्तर मिळाले नसल्यामुळे अंतिम नोटीस बजावण्यात आली आहे. या कारवाईमुळे अवसायक मंडळाकडील अधिकारी अडचणीत सापडल्याची चर्चा आहे.तत्कालीन कारभाऱ्यांनी नेत्यांच्या इशाऱ्याने कारखान्यासाठी खरेदी केलेल्या यंत्रसामग्रीची किंमत दहापटीने दाखवली. मग कारखाना डबघाईला येण्यास वेळ लागला नाही. २००० मध्ये आर्थिक अडचणीमुळे शासनाने प्रशासक नियुक्त केला़ २००३-०४ मध्ये प्रशासक आणि कामगारांनी पुढाकार घेऊन गळीत हंगाम यशस्वी केला़ त्याबाबत कामगार सांगतात, ‘राज्य बँकेने वेळेवर कर्जपुरवठा केला नसतानाही १४ कोटींचे उत्पन्न मिळाले़ हजार-दोन हजाराच्या तुटपुंज्या पगारावर कामगार राबले़ उसाला अन्य कारखान्यांच्या बरोबरीने दर दिला़ मात्र कुठे तरी माशी शिंकली आणि दुसऱ्या हंगामाला राज्य बँकेने अर्थसहाय्यच दिले नाही़ त्यामुळे २००४-०५ च्या हंगामात पुन्हा कारखान्याचे धुराडे बंद राहिले़’ या कालावधित कामगार नियमीत कारखान्यावर येत होते. या कामगारांना पगार मिळावा, अशी याचिका साखर कामगार संघटनेचे सदाशिव देवर्षी आणि हिंमत पाटील यांनी दाखल केली होती. त्यानुसार न्यायालयाने कारखान्याकडे सध्या असलेल्या अवसायक मंडळाच्या अधिकाऱ्यांना कामगारांचा थकित पगार देण्याची सूचना केली होती. त्यानुसार निर्वाह भत्ता (रिटेन्शन अलाऊन्स) अवसायक मंडळाने दिला आहे. परंतु, कामगारांच्या फंडाची रक्कम अवसायक मंडळाने भविष्य निर्वाह निधी विभागाकडे भरली नाही. अवसायक मंडळाच्या या कारभाराविरोधात कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा सांगलीच्या औद्योगिक न्यायालयात दावा दाखल करून फंडाची रक्कम भरण्याची मागणी केली होती. याचा निर्णयही कामगारांच्या बाजूने झाला आहे. त्यानुसार कोल्हापूर येथील भविष्य निर्वाह कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त पी. बी. खुने यांनी अवसायक मंडळाचे अध्यक्ष व्ही. वाय. सुर्वे यांना तीन नोटिसा बजावल्या आहेत. तरीही त्यांच्याकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही, असे खुने यांनी सांगितले. सुर्वे यांना अंतिम नोटीस बजावून संबंधित कामगारांची फंडाची सर्व कागदपत्रे आणि थकित रक्कम भरण्याची सूचना दिली आहे. पैसे वाटपाचीही होणार चौकशीतासगाव साखर कारखान्याकडील कामगारांच्या पगाराची थकित रक्कम १३ कोटी ७८ लाख रूपये अवसायक मंडळाकडून वाटप केली आहे. कामगारांना पैसे वाटप करताना काही नेतेमंडळींनी कामगारांकडून सक्तीने ६ टक्के रक्कम कपात करून घेतली होती. पैसे मागतानाची चित्रफीत कामगारांनी एका नेत्याकडे दिली असून त्याच्याआधारे फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी हालचाली सुरु आहेत. तसेच अवसायक मंडळाच्या कारभाराची चौकशीही लावण्यासाठी कारखान्यातील एक गट सक्रिय झाला आहे, असे खात्रीशीर सूत्राने सांगितले.