शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
4
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
6
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
7
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
8
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
10
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
11
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
13
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
15
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
16
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
17
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
18
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
19
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
20
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

तासगाव कारखान्याच्या अवसायकांना नोटीस!

By admin | Updated: November 5, 2014 00:48 IST

मंडळाकडून दुर्लक्ष : फंडाची रक्कम न भरल्याप्रकरणी कारवाई

सांगली : तासगाव साखर कारखान्याकडील १ एप्रिल २००४ ते जुलै २००५ या कालावधीतील ७५० कर्मचाऱ्यांची फंडाची सुमारे अडीच कोटीची रक्कम भविष्य निर्वाह निधी विभागाकडे भरलेली नाही. याप्रकरणी कोल्हापूर येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने तासगाव कारखान्याकडील अवसायक मंडळाला तीन नोटिसा बजावल्या आहेत. तरीही अवसायक मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून कोणतेही उत्तर मिळाले नसल्यामुळे अंतिम नोटीस बजावण्यात आली आहे. या कारवाईमुळे अवसायक मंडळाकडील अधिकारी अडचणीत सापडल्याची चर्चा आहे.तत्कालीन कारभाऱ्यांनी नेत्यांच्या इशाऱ्याने कारखान्यासाठी खरेदी केलेल्या यंत्रसामग्रीची किंमत दहापटीने दाखवली. मग कारखाना डबघाईला येण्यास वेळ लागला नाही. २००० मध्ये आर्थिक अडचणीमुळे शासनाने प्रशासक नियुक्त केला़ २००३-०४ मध्ये प्रशासक आणि कामगारांनी पुढाकार घेऊन गळीत हंगाम यशस्वी केला़ त्याबाबत कामगार सांगतात, ‘राज्य बँकेने वेळेवर कर्जपुरवठा केला नसतानाही १४ कोटींचे उत्पन्न मिळाले़ हजार-दोन हजाराच्या तुटपुंज्या पगारावर कामगार राबले़ उसाला अन्य कारखान्यांच्या बरोबरीने दर दिला़ मात्र कुठे तरी माशी शिंकली आणि दुसऱ्या हंगामाला राज्य बँकेने अर्थसहाय्यच दिले नाही़ त्यामुळे २००४-०५ च्या हंगामात पुन्हा कारखान्याचे धुराडे बंद राहिले़’ या कालावधित कामगार नियमीत कारखान्यावर येत होते. या कामगारांना पगार मिळावा, अशी याचिका साखर कामगार संघटनेचे सदाशिव देवर्षी आणि हिंमत पाटील यांनी दाखल केली होती. त्यानुसार न्यायालयाने कारखान्याकडे सध्या असलेल्या अवसायक मंडळाच्या अधिकाऱ्यांना कामगारांचा थकित पगार देण्याची सूचना केली होती. त्यानुसार निर्वाह भत्ता (रिटेन्शन अलाऊन्स) अवसायक मंडळाने दिला आहे. परंतु, कामगारांच्या फंडाची रक्कम अवसायक मंडळाने भविष्य निर्वाह निधी विभागाकडे भरली नाही. अवसायक मंडळाच्या या कारभाराविरोधात कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा सांगलीच्या औद्योगिक न्यायालयात दावा दाखल करून फंडाची रक्कम भरण्याची मागणी केली होती. याचा निर्णयही कामगारांच्या बाजूने झाला आहे. त्यानुसार कोल्हापूर येथील भविष्य निर्वाह कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त पी. बी. खुने यांनी अवसायक मंडळाचे अध्यक्ष व्ही. वाय. सुर्वे यांना तीन नोटिसा बजावल्या आहेत. तरीही त्यांच्याकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही, असे खुने यांनी सांगितले. सुर्वे यांना अंतिम नोटीस बजावून संबंधित कामगारांची फंडाची सर्व कागदपत्रे आणि थकित रक्कम भरण्याची सूचना दिली आहे. पैसे वाटपाचीही होणार चौकशीतासगाव साखर कारखान्याकडील कामगारांच्या पगाराची थकित रक्कम १३ कोटी ७८ लाख रूपये अवसायक मंडळाकडून वाटप केली आहे. कामगारांना पैसे वाटप करताना काही नेतेमंडळींनी कामगारांकडून सक्तीने ६ टक्के रक्कम कपात करून घेतली होती. पैसे मागतानाची चित्रफीत कामगारांनी एका नेत्याकडे दिली असून त्याच्याआधारे फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी हालचाली सुरु आहेत. तसेच अवसायक मंडळाच्या कारभाराची चौकशीही लावण्यासाठी कारखान्यातील एक गट सक्रिय झाला आहे, असे खात्रीशीर सूत्राने सांगितले.