शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

आत्मक्लेश नव्हे, सदाभाऊ क्लेश यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्करुकडी/माणगाव : आता दोघांनीही रिटायरमेंट घेऊन इतरांना संधी देऊया. राजकारणाची खुमखुमीच असेल तर दोन जिल्हे सोडून तिसºया जिल्ह्यात जाऊन समोरासमोर लढूया, मग बघू कोणाची ताकद किती आहे ते, असे आव्हान कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता दिले. तसेच काढलेली आत्मक्लेश ...

लोकमत न्यूज नेटवर्करुकडी/माणगाव : आता दोघांनीही रिटायरमेंट घेऊन इतरांना संधी देऊया. राजकारणाची खुमखुमीच असेल तर दोन जिल्हे सोडून तिसºया जिल्ह्यात जाऊन समोरासमोर लढूया, मग बघू कोणाची ताकद किती आहे ते, असे आव्हान कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता दिले. तसेच काढलेली आत्मक्लेश नव्हे, तर सदाभाऊ क्लेश यात्रा होती, असा टोलाही लगावला. रुकडी (ता. हातकणंगले) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडची प्रतिकृती मेघडंबरीच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खासदार निवेदिता माने होत्या.मंत्री खोत म्हणाले, राजकारणात नव्हतो ते बरे होतो; पण राजकारणात आल्यावर कळलं की घरातल्यांच्या पण पोटात दुखायला लागलं आहे. काल नुसतं जरा बोट लावलं तर त्यांना गुदगुल्या सुरू झाल्यात. कर्जमाफीचं आंदोलन खरंतर पुणतांब्याच्या सर्वसामान्य शेतकºयांनी उभं केलं आणि यांनी श्रेय घेण्यासाठी आत्मक्लेश यात्रा काढली. सरकारने साडेनऊ रिकव्हरीला २५५०, तर बारा रिकव्हरीला ३१०० रु. एफआरपी जाहीर केला आहे. एफआरपी वाढणार हे माहीत असतं तर त्यांनीही दोन दिवसांचे उपोषण केले असते. दोनशे मैलांवर जाऊन ४ लाख ८० हजार मते घेतली आणि हे म्हणतात यांच्या मागे कोण आहे. त्यांनी नेहमीच सोयीचे राजकारण केले आहे. आपलं जमलं की ओके; असा त्यांचा रीतिरिवाज आहे. मला आता काहीच नको आहे, मी पूर्ण समाधानी आहे. आता एकच काम आहे ......ओके, असा गर्भित इशाराही त्यांनी दिला.खासदार संभाजीराजे म्हणाले, देशात ३५० किल्ले आहेत. त्यांच्या संवर्धनासाठीच माझी खासदारकी पणाला लावेन. रुकडी ही ऐतिहासिक नगरी असल्याने त्याचे जतन करण्यासाठी लागेल तेवढा निधी देण्यात कमी पडणार नाही. यावेळी माजी खासदार निवेदिता माने, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार उल्हासदादा पाटील, माजी आमदार राजीव आवळे, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, प्रा. शहाजी कांबळे, ठेकेदार रफीक कलावंत, अमोलदत्त कुलकर्णी, आदींनी मनोगत व्यक्त केले. मिलिंद ढवळे-पाटील यांनी स्वागत केले. माजी जि. प. उपाध्यक्ष धैर्यशील माने यांनी प्रास्ताविक केले. ताज मुल्लाणी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी महापौर हसिना फरास, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, जि. प. सदस्य प्रसाद खोबरे, राजवर्धन निंबाळकर, सुरेशदादा पाटील, विकास माने, आदिल फरास, सरपंच मीनाक्षी अपराध, बबलू मकानदार, असलम फकीर, मोहन माने, नंदकुमार शिंगे, आदी उपस्थित होते.भाजप प्रवेशाची नांदीआजचा कार्यक्रम तसा सामाजिक होता, पण राजकीय उपस्थिती पाहता व टोलेबाजीमुळे माने गटाची ही भाजप प्रवेशाची नांदी आहे, अशी उपस्थितांत चर्चा होती.