शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

शेती नुकसानभरपाईचा जीआरच नाही, तर मोर्चे कशाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:28 IST

कोल्हापूर : महापूर व अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीचे नुकसान ठरवण्यासाठी पंचनाम्याकरता जीआर काढला आहे, प्रत्यक्षात किती मदत द्यायची याचा अजून ...

कोल्हापूर : महापूर व अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीचे नुकसान ठरवण्यासाठी पंचनाम्याकरता जीआर काढला आहे, प्रत्यक्षात किती मदत द्यायची याचा अजून जीआरच निघालेला नाही, मग मोर्चे आंदोलने तरी कशाला काढता, अशी विचारणा करत पालकमंत्री सतेज पाटील यांनी दोन दिवसांत जीआर निघेल, त्यातील त्रुटी बघा आणि मग आंदोलनाचा निर्णय घ्या, २०१९ पेक्षा चांगली मदत आम्ही देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्यातील शिरोळ, हातकणंगले व इचलकरंजी येथील काही भाग वगळता पंचनाम्याचे काम पूर्ण झाले आहे. पंचनामे कसे करावेत याबाबत मार्गदर्शन म्हणून राज्य शासनाने मागील पंधरवड्यात जीआर काढला आहे; पण तो मदतीचा नाही. मदतीसाठी राज्य सरकार स्वतंत्र जीआर काढणार आहे, त्याची मंत्रालयात तयारी पूर्ण झाली असून, दोन दिवसांत तो जाहीर केला जाणार आहे. यामध्ये २०१९ मध्ये शेतीच्या नुकसानभरपाईपोटी मिळालेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम यावेळी मदत म्हणून दिली जाणार आहे. दोन्ही वर्षांतील महापुरातील तुलना जीआर आल्यानंतरच शेतकऱ्यांनी करावी. तरीदेखील यात त्रुटी आढळल्यास त्या निदर्शनास आणून द्याव्यात, मोर्चे काढणे हा त्यावरचा उपाय नाही, ही पूर्णपणे राजकीय स्टंटबाजी आहे.

जिल्ह्यातील पूरग्रस्तांना नुकसाभरपाईपोटी पहिल्या टप्प्यात १७ कोटींचा निधी शासनाने दिला आहे. त्याचे वाटपही सुरू झाले आहे. आता दोन दिवसांत आणखी १७ कोटी रुपये मिळणार आहेत. पूरग्रस्तांना सर्वांत चांगला दिलासा महाविकास आघाडीचे सरकारच देत आहे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.