शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

उत्तर कर्नाटकातील कारखानेही देणार एकरकमी एफआरपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 00:45 IST

राम मगदूम । लोकमत न्यूज नेटवर्क गडहिंग्लज/बेळगाव : सांगली जिल्ह्यांप्रमाणे एकरकमी एफआरपी देण्याबरोबर गेल्या हंगामातील ऊसदराच्या फरकाची थकीत रक्कम ...

राम मगदूम ।लोकमत न्यूज नेटवर्कगडहिंग्लज/बेळगाव : सांगली जिल्ह्यांप्रमाणे एकरकमी एफआरपी देण्याबरोबर गेल्या हंगामातील ऊसदराच्या फरकाची थकीत रक्कम देण्यास उत्तर कर्नाटकातील साखर कारखानदारांनी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या उपस्थितीत झालेल्या शेतकरी संघटना प्रतिनिधींच्या संयुक्त बैठकीत मान्यता दिली. त्यामुळे ऊसदराच्या प्रश्नांवरून दीड महिन्यांपासून बंद असलेले बागलकोट जिल्ह्यातील कारखाने सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने कारखानदारांनी निश्वास सोडला तर एकरकमी एफआरपीची हमी मिळाल्याने सीमाभागातील शेतकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला.मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली बंगलोर येथील मंत्रालयात ही संयुक्त बैठक झाली. महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिव राजेंद्र गड्यान्नावर, कर्नाटकातील ऊस बागायतदार शांतकुमार, रयत संघटनेचे गंगाधर यांनी त्यांच्यासमोर सीमाभागासह उत्तर कर्नाटकातील ऊस उत्पादकांच्या व्यथा मांडल्या.बेळगाव व बागलकोट जिल्ह्यातील कारखानदारांनी गेल्या हंगामात स्वत:हून जाहीर केलेल्या दरातील थकीत ऊसबिलाची रक्कम सुमारे ७०० ते ८०० कोटी इतकी असून ती तातडीने मिळालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी करण्यात आली. त्यासंदर्भात लवकरच संबंधित कारखानदारांची स्वतंत्र बैठक बोलावून थकीत रक्कम अदा करण्याची सूचना केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.तोडणी-वाहतुकीचा खर्च, उसाचे वजन व साखर उताºयात शेतकºयांची फसवणूक होत असल्याचा मुद्दा संघटनांनी जोरदारपणे मांडला. त्यावर नियंत्रणासाठी स्वतंत्र समिती नेमण्याची मागणी झाली. त्यानुसार कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले.मुख्यमंत्री कुमारस्वामी, उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर, साखरमंत्री के. जे. जॉर्ज, सार्वजनिक बांधकाम मंत्री एच. डी. रेवण्णा, आरोग्य व ऊर्जामंत्री डी. के. शिवकुमार, मुख्य सचिव विजय भास्कर, साखर आयुक्त अजय नागभूषण यांच्यासह संबंधित जिल्हाधिकारी व अधिकाºयांसह शेतकरी उपस्थित होते.चर्चेतील ठळक मुद्देबेळगाव, बागलकोट, विजापूर, धारवाड, दावणगिरी, गुलबर्गा व मंड्या या जिल्ह्यातील साखर कारखानदार बैठकीस उपस्थित होते.उसाचा दर जागेवरच ठरवावा व नेट एफआरपी मिळावी आणि एफआरपीचा बेस ९.५० टक्क्यांवरून पूर्वीप्रमाणे १० टक्के करण्यात यावा, अशी मागणी झाली. यासंदर्भात केंद्राकडे शिफारस करून मंजुरीसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील उसाइतकीच बेळगाव जिल्ह्यातील कृष्णा खोरे पट्ट्यातील उसाची रिकव्हरी असल्यामुळे महाराष्ट्राइतकीच व एकरकमी एफआरपी मिळावी, अशी ‘स्वाभिमानी’सह सर्व रयत संघटनांची मागणी होती.त्यासाठी खासदार राजू शेट्टी यांनी कागवाड, निपाणी, मुधोळ, बागलकोट आदी ठिकाणी मेळावे घेऊन जनजागृती केली होती. त्यामुळे सीमाभागातील अनेक शेतकरीदेखील या बैठकीस आवर्जून उपस्थित होते.