शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
2
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
3
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
4
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
5
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
6
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
7
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
8
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
9
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
10
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
11
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
12
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
13
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
14
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
15
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
16
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
17
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
18
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
19
शाब्बास पोरा! शिक्षणासाठी केली फूड डिलिव्हरी, मजुराचा लेक होणार मोठा सरकारी अधिकारी
20
रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?

१ मार्चपासून असहकार आंदोलन फसवी कर्जमाफी : शेतकरी सुकाणू समितीत निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 01:27 IST

कोल्हापूर : राज्य सरकारच्या कर्जमाफीत आतापर्यंत केवळ १० ते १५ टक्के शेतकºयांना लाभ झाला असून, ही कर्जमाफी पूर्णत: फसवी आहे. या विरोधात संपूर्ण राज्यात रान उठविणार असून

कोल्हापूर : राज्य सरकारच्या कर्जमाफीत आतापर्यंत केवळ १० ते १५ टक्के शेतकºयांना लाभ झाला असून, ही कर्जमाफी पूर्णत: फसवी आहे. या विरोधात संपूर्ण राज्यात रान उठविणार असून, त्याची सुरुवात १ मार्चपासून असहकार आंदोलनाने करण्याचा निर्धार शेतकरी सुकाणू समितीच्या बैठकीत करण्यात आला.

जिल्हा शेतकरी सुकाणू समितीची बैठक शुक्रवारी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात झाली. अध्यक्षस्थानी माजी आमदार संपतराव पवार होते. शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष रघुनाथदादा पाटील म्हणाले, कर्जमाफी म्हणजे डोंगर पोखरून उंदीर काढल्यासारखा प्रकार आहे. सरकार व मंत्री हजारो कोटींच्या कर्जमाफीची भाषा करीत सुटले आहेत; पण शेतकºयांच्या हातात अद्याप दमडीही पडलेली नाही.

सरकारने पाठविलेल्या हिरव्या यादीतील शेतकºयांची नावे पाहिली तर यामध्ये धनदांडगे, कर्जबुडव्यांचा भरणा अधिक असून त्यामुळे प्रामाणिकपणे परतफेड करणारे शेतकरी हडबडले आहेत. यावरून कर्जमाफीचे धोरण फसवे आहे, हेच सिद्ध होते. असहकार आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला शुद्धीवर आणावे लागणार आहे. आंदोलनाची सुरुवात इस्लामपूर येथून होणार असून सरकारचे कोणतेही कर, वीज बिल शेतकरी भरणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. यावेळी अतुल दिघे, अ‍ॅड. माणिक शिंदे, गणेशकाका जगताप, किशोर ढमाले, बाबासाहेब देवकर, आदी उपस्थित होते.२३ मार्च रोजी हुतात्मा दिन पाळणारसंपतराव पवार म्हणाले, कर्जबाजारीपणाला कंटाळून १९ मार्च १९८६ रोजी साहेबराव करपे या शेतकºयाने विष प्र्राशन केले. सरकारला याची आठवण करून देण्यासाठी राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर उपोषण करण्यात येणार आहे. हा दिवस ‘अन्नत्याग दिन’ म्हणून पाळण्यात येणार आहे. त्याचबरोबर २३ मार्च हा ‘शेतकरी हुतात्मा दिवस’म्हणून पाळण्यात येणार असून, प्रमुख शहरांतून संघर्षयात्रा काढण्यात येणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरStrikeसंप