शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

मॅटप्रकरणी स्वतंत्र चौकशी नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : एकीकडे विनयभंगाच्या तक्रारीने मॅट प्रकरणाला वेगळे वळण लागले असताना दुसरीकडे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : एकीकडे विनयभंगाच्या तक्रारीने मॅट प्रकरणाला वेगळे वळण लागले असताना दुसरीकडे न्यायालयाने या प्रकरणामध्ये जिल्हा परिषदेने अन्य समितीच्या माध्यमातून स्वतंत्र चौकशी करू नये असे स्पष्ट आदेश दिल्यामुळे प्रशासनाची मोठी कुचंबणा झाली आहे. प्रशासन आणि पदाधिकारी यांच्यात समन्वय नसल्याने हे असे प्रकार घडत असल्याचे मत व्यक्त होत आहे.

गेली दोन वर्षे हे मॅट प्रकरण सुरू आहे. शिंगणापूर क्रीडा प्रशालेसाठी घेतलेल्या कुस्तीच्या मॅट निकृष्ट असल्याची तक्रार सदस्यांनी केली होती. त्याआधी प्राथमिक शिक्षण विभागाने मॅट खरेदीचा प्रस्ताव तयार केला. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली. त्याची गुणवत्ता तपासण्यासाठी कराड येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाचा अभिप्रायही दिला. त्यानुसार खरेदी झाली.

मात्र, सदस्यांच्या तक्रारीनंतर जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी या मॅटची तपासणी केली आणि ही मॅट दर्जेदार नसल्याचा अहवाल दिला. यानंतर प्रशासनाच्या मागे लागून सदस्यांनी संबंधित ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, अमन मित्तल यांनी लोकप्रतिनिधींची चौकशी समिती रद्द करून दोन अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली. तीन विभागांवर नुकसानभापाईची रक्कम निश्चित केली आणि नवीन मॅट पुरविण्याची ठेकेदारावर जबाबदारी टाकली. या अहवालावरूनही गोंधळ झाला. दरम्यान, या प्रकरणी ९ नोव्हेंबर २०२० रोजीच न्यायालयाने स्वतंत्र कोणतीही चौकशी करण्याची गरज नसल्याचे लेखी आदेशात स्पष्ट केले आहे.

यानंतरही संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कारवाई का होत नाही म्हणून सदस्यांनी उपोषणाचा इशारा दिला. एकीकडे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करायची असेल तर त्यांची चौकशी करून त्यांच्यावरील आरोप निश्चित करावे लागतील. परंतु आता स्वतंत्र चौकशी करण्याची गरज नाही असे न्यायालयाने आदेशात म्हटल्याने प्रशासन कोंडीत सापडले आहे.

चौकट

आधीचा सविस्तर अहवाल बाहेर येणे आवश्यक

ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरूण जाधव आणि पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे यांनी या प्रकरणामध्ये चौकशी केली आहे. मात्र, याचा नेमका अहवाल बाहेर आलेला नाही. मित्तल यांनी या दोघांच्या अहवालाच्या आधारे एक पानी अहवाल तयार करून पुढील कार्यवाहीची दिशा स्पष्ट केली होती. मात्र, ती प्रशासकीय बाजूंनी योग्य नसल्याचे अधिकाऱ्यांचेही म्हणणे आहे. त्यामुळे विनयभंगाच्या तक्रारीनंतर हे प्रकरण पुढे वेगळे वळण घेण्याची शक्यता आहे.