शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
2
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
3
"काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
4
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
5
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
6
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
7
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
8
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
9
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
10
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
11
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
12
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
13
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
14
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
15
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
16
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
17
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
18
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
20
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!

ना ‘कार्यक्रम’... ना ‘अल्टीमेट’! ‘गडहिंग्लज’ची पाणी परिषद : ठोस भूमिकेअभावी झाला उद्बोधकांचा मेळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 11:12 PM

गडहिंग्लज : दीर्घकाळ रेंगाळलेले उचंगी, सर्फनाला व आंबेओहोळ हे तिन्ही प्रकल्प मार्गी लागावेत. त्याचप्रमाणे भावी पिढ्यांच्या भविष्यासाठी गडहिंग्लज विभागाला जादा पाच टीएमसी

राम मगदूम ।गडहिंग्लज : दीर्घकाळ रेंगाळलेले उचंगी, सर्फनाला व आंबेओहोळ हे तिन्ही प्रकल्प मार्गी लागावेत. त्याचप्रमाणे भावी पिढ्यांच्या भविष्यासाठी गडहिंग्लज विभागाला जादा पाच टीएमसी पाणी मिळावे, ही प्रमुख मागणी घेऊन गडहिंग्लजची पाणी परिषद भरली. मात्र, त्यातील सहभागी नेत्यांची भाषणे आणि मंजूर ठराव पाहता परिषदेत पाण्यासंदर्भात केवळ चर्चाच झाली. त्यातून ‘ना’ जनतेला कार्यक्रम मिळाला, ‘ना’ सरकारला अल्टीमेट. त्यामुळेच ठोस भूमिकेअभावी ही परिषद म्हणजे उद्बोधकांचा मेळाच ठरला.

१९९० च्या दशकात तत्कालीन लोकप्रतिनिधी व जनतेच्या उठावामुळे त्यावेळी रखडलेले ‘चित्री’ व ‘फाटकवाडी’ हे दोन प्रकल्प मार्गी लागले. मात्र, त्यानंतर मंजूर झालेले वरील तिन्ही प्रकल्प वेळेवर निधी व पुनर्वसनअभावी आजही रेंगाळलेलेच आहेत. घळभरणीच्या कामापर्यंत येऊन थांबलेले हे प्रकल्प कधी पूर्ण होणार? याचा जाब विचारावा आणि गडहिंग्लजच्या पूर्वेकडील जनतेलाही पिण्यासाठी व शेतीसाठी हक्काचे पाणी मिळावे, हाच या परिषदेचा मुख्य हेतू होता. जनतेच्या मनातील ही मागणी केदारी रेडेकर फौंडेशनने उचलून धरली आणि त्यासाठी सर्वांना एका व्यासपीठावर आणले. त्याबद्दल फौंडेशनचे कौतुक आहेच; परंतु परिषदेच्या सफलतेविषयीदेखील साधक-बाधक चर्चा करायला हवी तरच दीर्घकाळानंतर नव्याने सुरू झालेल्या पाण्याच्या चळवळीला मूर्त स्वरूप येऊन संयोजकांचे कष्ट कारणी लागतील.

कोल्हापुरातील लिंगायत मोर्चा व गडहिंग्लजच्या पाणी परिषदेचा दिवस आणि वेळ एकच असल्यामुळे सहभागी झालेल्या नेत्यांना पाणी परिषदेसाठी पुरेसा वेळ देता आला नाही. त्यामुळेच घाई-गडबडीत येऊन हजेरी लावणे आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत इतकेच सांगणे किंवा हे सरकार पक्षाचे काम आहे, त्यांनी ते पार पाडले पाहिजेत, अशी शेरेबाजी करणे. यापलीकडे काही घडल्याचे एकंदरीत कार्यक्रमावरून दिसले नाही. तथापि, शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांना सोबत घेऊन त्यांना काही कालबद्ध कृती कार्यक्रम देणे शक्य होते. तसेच अपूर्ण प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी सरकारला ‘अल्टीमेट’ही द्यायला हवा होता. मात्र, तेही घडले नाही. त्यामुळेच ही परिषद म्हणजे केवळ ‘इव्हेंट’ ठरल्याची चर्चा जनमानसात आहे.‘समन्यायी’ पाण्याचे काय ?सार्वजनिक पैशांतून बांधण्यात येणाºया धरणातील ‘पाणी’ या संसाधनावर लाभक्षेत्रातील तमाम जनतेचा हक्क आहे. मात्र, जंगमहट्टी, फाटकवाडी, चित्री आणि झांबरे-उमगाव या प्रकल्पांचे उदाहरण लक्षात घेता हे संसाधन मूठभरांच्या ताब्यात जाऊन जुन्या सावकारीप्रमाणे ‘नवी पाणीदारी’ सुरू झाली आहे. यासंदर्भातही ठोस भूमिका घेणे आवश्यक आहे. मात्र, या विषयाला स्पर्शदेखील झाला नाही. त्यामुळे गडहिंग्लज विभागातील बहुसंख्य अल्प भूधारक व अत्यल्प भूधारक शेतकºयांच्या शेतीला हक्काचे पाणी कसे मिळणार ? हा कळीचा मुद्दा बाजूलाच राहिला.‘पाणीदार’ गावांसाठी ‘चळवळ’!दर दोन-चार वर्षांनी पिकांची आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी येणाºया गडहिंंग्लजच्या पूर्वेकडील खेड्यांच्या समृद्धीसाठी पाणी फौंडेशनच्या धर्तीवर लोकसहभागातून अनेक उपक्रम राबविणे शक्य आहे. संयोजकांनी त्यासंदर्भात वेळोवेळी बोलूनही दाखविले. मात्र, त्यासाठीदेखील काही कृती कार्यक्रम देणे त्यांच्याकडून राहून गेले, तर दस्तुरखुद्द महसूल व पुनर्वसनमंत्री येऊन देखील ठोस आश्वासनांअभावी नेत्यांचे रुसवे-फुगवे व टीका-टिप्पणीचीच चर्चा अधिक झाली.

 

टॅग्स :water transportजलवाहतूकkolhapurकोल्हापूर