शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
4
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
5
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
6
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
7
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
8
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
9
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
10
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
11
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
12
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
13
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
14
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
15
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
16
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
17
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
18
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
19
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
20
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी

नोकऱ्यांसाठी वशिल्याची नाही गरज-: पूर्ण परीक्षा अंॉनलाईन, प्रक्रिया पारदर्शक, मुलाखतीला फाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 01:06 IST

राज्यातील ३५ जिल्हा परिषदांच्या सुमारे १५ हजार जागा भरण्याच्या जाहिराती निघाल्यानंतर आता पैसे उकळण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. मात्र ही नोकरभरतीची प्रक्रिया आॅनलाईन आणि पारदर्शी असून, ती

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्हा परिषद

समीर देशपांडे ।कोल्हापूर : राज्यातील ३५ जिल्हा परिषदांच्या सुमारे १५ हजार जागा भरण्याच्या जाहिराती निघाल्यानंतर आता पैसे उकळण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. मात्र ही नोकरभरतीची प्रक्रिया आॅनलाईन आणि पारदर्शी असून, ती समजून घेऊन कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याची गरज आहे.

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने ३ मार्च रोजी एकाच दिवशी सर्व जिल्हा परिषदांना रिक्त जागांची जाहिरात देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जाहिराती प्रसिद्धही झाल्या. मात्र त्यानंतर काही जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि काही जिल्ह्यामध्ये ‘दलाल’ सक्रिय झाले असून, त्यांनी पैसे गोळा करायला सुरुवात केली आहे. वास्तविक जाहिराती याआधी आल्या असल्या तरी २६ मार्चच्या रात्री १० नंतर आॅनलाईन अर्ज दाखल करण्यासाठीचे पोर्टल खुले होणार आहे. १६ एप्रिल २०१९ च्या रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत आॅनलाईन अर्ज दाखल करता येणार आहेत.समान गुण मिळाले तर...वय आणि पदवी समान असेल तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलाला प्राधान्य दिले जाईल.वय समान असेल तर उच्चतम शैक्षणिक पात्रता असणाºयाला प्राधान्य.वय, पदवी समान असेल तर किमान शैक्षणिक पात्रतेमध्ये सर्वाधिक गुण असणाºयास प्राधान्य.कुणाला कितीही जागांसाठी कुठल्याही जिल्हा परिषदेला अर्ज करता येतो.त्या त्या जिल्ह्यातील इंटरनेटची सुविधा असणाºया संगणकांची उपलब्ध संख्या पाहून एकूण चार ते पाच महिन्यांत ही नोकरभरतीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

अधिक माहितीसाठी    www.mahapariksha.gov.in या वेबसाईटवर माहिती घ्यावी लागणार आहे.ही परीक्षा २०० गुणांसाठी होईल.हे प्रश्न बहुपर्यायी राहणार आहेत.प्रश्न सोडविण्यासाठी दीड तास वेळ असेल.तांत्रिक पदांसाठी ४० गुणांचे प्रश्न त्या विषयावरील असतील.सर्वसाधारणपणे इंग्रजी, मराठी, सामान्यज्ञान आणि बुद्धिमापन या विषयासाठी प्रत्येकी १५ प्रश्न असतील.एका प्रश्नाला दोन गुण असतील.गुणांना उत्तीर्णज्या उमेदवाराला २०० पैकी ९० गुण म्हणजे ४५ टक्के गुण मिळतील तो उत्तीर्ण समजला जाईल. यानंतर सर्वसाधारण गुणवत्ता आणि प्रतीक्षा यादी तयार केली जाईल. ही यादी जिल्हा परिषदांकडे पाठविण्यात येईल. त्यानुसार उमेदवारांना बोलावून त्यांच्या कागदपत्रांची छाननी केली जाईल. त्यानंतर संबंधितांना नेमणूक पत्र दिले जाईल. ही निवड यादी एक वर्षासाठी ग्राह्य धरली जाईल.वयाची मर्यादा38खुल्या प्रवर्गासाठी43मागासवर्गीयांसाठी45अपंग, प्रकल्पग्रस्त, स्वातंत्र्यसैनिकांच्या पाल्यांसाठी43खेळाडूंसाठी38अनाथांसाठी43आर्थिकदृष्ट्या मागास (१० टक्के आरक्षणासाठी) 

ही संपूर्ण प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने होणार असल्याने कुणीही, कितीही सांगितले तरीही यामध्ये वशिला चालणार नाही. एकाच वर्गात पेपर सोडविताना प्रत्येकाला वेगळा पेपर जाणार आहे. त्यामुळे कुणालाही पैसे देऊन उमेदवारांनी फसवणूक करून घेऊ नये.- रविकांत आडसूळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर

 

टॅग्स :Politicsराजकारणkolhapurकोल्हापूर