शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
3
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
4
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
5
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
6
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
7
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
8
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
9
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
10
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
11
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
12
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
13
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
14
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
15
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
16
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
17
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
18
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
19
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
20
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'

नोकऱ्यांसाठी वशिल्याची नाही गरज-: पूर्ण परीक्षा अंॉनलाईन, प्रक्रिया पारदर्शक, मुलाखतीला फाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 01:06 IST

राज्यातील ३५ जिल्हा परिषदांच्या सुमारे १५ हजार जागा भरण्याच्या जाहिराती निघाल्यानंतर आता पैसे उकळण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. मात्र ही नोकरभरतीची प्रक्रिया आॅनलाईन आणि पारदर्शी असून, ती

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्हा परिषद

समीर देशपांडे ।कोल्हापूर : राज्यातील ३५ जिल्हा परिषदांच्या सुमारे १५ हजार जागा भरण्याच्या जाहिराती निघाल्यानंतर आता पैसे उकळण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. मात्र ही नोकरभरतीची प्रक्रिया आॅनलाईन आणि पारदर्शी असून, ती समजून घेऊन कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याची गरज आहे.

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने ३ मार्च रोजी एकाच दिवशी सर्व जिल्हा परिषदांना रिक्त जागांची जाहिरात देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जाहिराती प्रसिद्धही झाल्या. मात्र त्यानंतर काही जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि काही जिल्ह्यामध्ये ‘दलाल’ सक्रिय झाले असून, त्यांनी पैसे गोळा करायला सुरुवात केली आहे. वास्तविक जाहिराती याआधी आल्या असल्या तरी २६ मार्चच्या रात्री १० नंतर आॅनलाईन अर्ज दाखल करण्यासाठीचे पोर्टल खुले होणार आहे. १६ एप्रिल २०१९ च्या रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत आॅनलाईन अर्ज दाखल करता येणार आहेत.समान गुण मिळाले तर...वय आणि पदवी समान असेल तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलाला प्राधान्य दिले जाईल.वय समान असेल तर उच्चतम शैक्षणिक पात्रता असणाºयाला प्राधान्य.वय, पदवी समान असेल तर किमान शैक्षणिक पात्रतेमध्ये सर्वाधिक गुण असणाºयास प्राधान्य.कुणाला कितीही जागांसाठी कुठल्याही जिल्हा परिषदेला अर्ज करता येतो.त्या त्या जिल्ह्यातील इंटरनेटची सुविधा असणाºया संगणकांची उपलब्ध संख्या पाहून एकूण चार ते पाच महिन्यांत ही नोकरभरतीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

अधिक माहितीसाठी    www.mahapariksha.gov.in या वेबसाईटवर माहिती घ्यावी लागणार आहे.ही परीक्षा २०० गुणांसाठी होईल.हे प्रश्न बहुपर्यायी राहणार आहेत.प्रश्न सोडविण्यासाठी दीड तास वेळ असेल.तांत्रिक पदांसाठी ४० गुणांचे प्रश्न त्या विषयावरील असतील.सर्वसाधारणपणे इंग्रजी, मराठी, सामान्यज्ञान आणि बुद्धिमापन या विषयासाठी प्रत्येकी १५ प्रश्न असतील.एका प्रश्नाला दोन गुण असतील.गुणांना उत्तीर्णज्या उमेदवाराला २०० पैकी ९० गुण म्हणजे ४५ टक्के गुण मिळतील तो उत्तीर्ण समजला जाईल. यानंतर सर्वसाधारण गुणवत्ता आणि प्रतीक्षा यादी तयार केली जाईल. ही यादी जिल्हा परिषदांकडे पाठविण्यात येईल. त्यानुसार उमेदवारांना बोलावून त्यांच्या कागदपत्रांची छाननी केली जाईल. त्यानंतर संबंधितांना नेमणूक पत्र दिले जाईल. ही निवड यादी एक वर्षासाठी ग्राह्य धरली जाईल.वयाची मर्यादा38खुल्या प्रवर्गासाठी43मागासवर्गीयांसाठी45अपंग, प्रकल्पग्रस्त, स्वातंत्र्यसैनिकांच्या पाल्यांसाठी43खेळाडूंसाठी38अनाथांसाठी43आर्थिकदृष्ट्या मागास (१० टक्के आरक्षणासाठी) 

ही संपूर्ण प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने होणार असल्याने कुणीही, कितीही सांगितले तरीही यामध्ये वशिला चालणार नाही. एकाच वर्गात पेपर सोडविताना प्रत्येकाला वेगळा पेपर जाणार आहे. त्यामुळे कुणालाही पैसे देऊन उमेदवारांनी फसवणूक करून घेऊ नये.- रविकांत आडसूळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर

 

टॅग्स :Politicsराजकारणkolhapurकोल्हापूर