शहरं
Join us  
Trending Stories
1
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
2
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
3
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
4
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
5
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
6
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
7
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
8
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
9
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
10
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
11
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
12
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
13
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
14
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
15
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
16
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
17
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
18
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
19
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
20
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा

मोक्का कितीही लावला तरी गुन्हेगारी नाही लगाम... इचलकरंजीत पोलिसांसमोर आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 23:12 IST

राजाराम पाटील । इचलकरंजी : तब्बल दहा टोळ्यांना मोक्का लागूनही पोलीस यंत्रणेचा गुन्हेगारांवर वचक बसत नसल्याने वस्त्रनगरी धास्तावली आहे. ...

ठळक मुद्देनवीन गुन्हेगारांना आवर घालण्याचे कायद्याचा वचक नसल्याचे चित्रवाढलेल्या नवीन उद्योगांच्या वसाहतींमध्ये गुन्हेगारी वाढत चालली.

राजाराम पाटील ।इचलकरंजी : तब्बल दहा टोळ्यांना मोक्का लागूनही पोलीस यंत्रणेचा गुन्हेगारांवर वचक बसत नसल्याने वस्त्रनगरी धास्तावली आहे. बहुतांशी सराईत गुंड गजाआड आहेत, तर तीन पोलिस ठाणी, उपअधीक्षक व अतिरिक्त अधीक्षकांची कार्यालये असूनसुद्धा गुन्हेगारीचा उपद्रव वाढतच आहे. अशा स्थितीत नवीन गुन्हेगारांना आवर घालण्याचे पोलिसांसमोर तगडे आव्हान आहे.

शहरामध्ये यापूर्वी दोन पोलीस ठाणी असताना शहापूर, तारदाळ, खोतवाडी, यड्राव, कोरोची अशा उत्तरेकडील ग्रामीण भागांमध्ये, पण वाढलेल्या नवीन उद्योगांच्या वसाहतींमध्ये गुन्हेगारी वाढत चालली. त्यामुळे त्या परिसरात नव्याने शहापूर पोलीस ठाण्याची निर्मिती केली. अशा स्थितीत गुन्हेगारीचे वाढते स्वरुप आणि गंभीर गुन्ह्यांचा वाढत जाणारा आलेख पाहता इचलकरंजी शहरातील एकापाठोपाठ एक याप्रमाणे तब्बल दहा टोळ्यांवर मोक्काची कारवाई करण्यात आली. त्यापैकी एका टोळीवर दुहेरी मोक्का लागला आहे.

अशा पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि उपअधीक्षक यांच्याकडून स्वतंत्र पथके कार्यान्वित करण्यात आली. स्थानिक पोलिसांबरोबरच या पथकाकडूनसुद्धा गंभीर गुन्ह्यांची दखल घेत वारंवार कारवाई केली जाते. मात्र, अद्यापही काही उद्योजक आणि विशेषत: परप्रांतीय कामगारांचा पाठलाग करून त्यांना लुटणे, चेन स्नॅचिंग, मारामारी, टोळीचे वर्चस्व गाजविण्यासाठी खुनासारखे गंभीर गुन्हे तसेच आर्थिक देवघेवीवरून होणारे खून यांचेही स्वरुप अलीकडील काळात वाढत चालले आहे.

नव्याने गुन्हे घडण्याच्या प्रकारामध्ये नवीन तरुणांचा भरणा अधिक दिसून येत आहे. यापूर्वी कोणत्याही प्रकारचे गंभीर गुन्हे त्यांच्यावर नोंद नसताना अचानकपणे हाफ मर्डर, मर्डरसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्येही तरुणांचा सहभाग दिसून येत आहे. यामध्ये अवघ्या २० ते २५ वयोगटांतील तरुणांचा सहभाग लक्षणीय आहे. ज्यामुळे वस्त्रनगरीत नवनवीन टोळ्या पुन्हा उदयास येत असल्याचे निदर्शनास येत आहे आणि यांनाच आवर घालण्याचे काम पोलिसांना करावयाचे आहे..अल्पवयीनांच्या सहभागाची चिंताखून किंवा गंभीररित्या दुखापतीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढत चालला आहे. त्यामुळे ज्या परिस्थितीत नवनवीन मुले गुन्हेगारीमध्ये दाखल होत आहेत. त्याचा अभ्यास करून पोलिसांनी अशा मुलांबरोबरच त्यांच्या पालकांच्याही वर्तणुकीवर लक्ष देण्याची गरज आहे. विशेषत: स्वत:चे कामधंदे अथवा रोजगार उपलब्ध करून घेण्याच्या वयात त्यांना वाईट वळण लागत आहे. अशा स्थितीत मुलांना समुपदेशनाची गरज असल्याचे ज्येष्ठ नागरिकांचे म्हणणे आहे.बेरोजगारीमुळे तरुण वाममार्गाकडेवरर्षभरामध्ये तिन्ही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत तेरा खून, वीस खुनाचे प्रयत्न, ५२ गंभीर मारहाणे आणि वीसहून अधिक गर्दी मारामारीचे प्रकार घडले आहेत. अलीकडील तीन-चार वर्षांमध्ये वस्त्रोद्योगामध्ये असलेली मंदी आणि त्यामुळे बंद पडत चाललेले उद्योगधंदे यामुळे बेरोजगारी वाढली आहे. त्याचा परिणाम म्हणून हाताला काम नसल्याने तरुणवर्ग गुन्हेगारी जगताकडे वळत असल्याबद्दलची चर्चा शहर व परिसरात आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPolice Stationपोलीस ठाणे