शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

... दाद ना फिर्याद.. कोरोना संसर्गच अमर्याद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:25 IST

गेल्या दहा-बारा दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण जसे मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे, त्यावरूनच प्रशासनाचे प्रयत्न असफल होत असल्याचे पाहायला मिळत ...

गेल्या दहा-बारा दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण जसे मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे, त्यावरूनच प्रशासनाचे प्रयत्न असफल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. गतवर्षी २०२० च्या एप्रिल महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण कोल्हापूर महापालिकेच्या हद्दीत सापडला आणि तेथून संसर्गाची साखळी निर्माण झाली. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ही साखळी तुटली अशी वाटत असतानाच कोरोनाची दुसरी लाट आली. सुस्त झालेली यंत्रणा आळस झटकून सज्ज होईपर्यंत कोरोना विषाणूने शहरातील सर्वच भागात आपले बस्तान बसविले.

वास्तविक दुसरी लाट येणार असल्याचे आणि कोल्हापूर शहरातील अनेक भाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरणार असल्याची पूर्वसूचना केंद्र व राज्य सरकारने दिले असताना जानेवारी, फेब्रुवारी व मार्च अशा तीन महिन्यांत पूर्वतयारी करून ठेवण्याची आवश्यकता होती, परंतु प्रशासनाने काहीही केले नाही. रुग्ण वाढतील तशी व्यवस्था करु, असे सांगत प्रशासन वेळ मारुन नेत राहिले. त्यामुळे व्हायचा तो गोंधळ झालाच. दि. १ एप्रिलपासून महापालिका क्षेत्रात रोज शंभरच्या पुढे नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून यायला लागले. रोज १००, २००, ३०० रुग्ण आढळून यायला लागले तरी यंत्रणा संथगतीने काम करत आहे.

-गृहअलगीकरण मोठी चुूक -

सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दुसऱ्या लाटेवेळी एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह आली तरी त्यांना घरात अलगीकरणास परवानगी देण्यात आली. हीच मोठी घोडचूक ठरली. तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देऊन सौम्य लक्षणे तसेच कोणतीच लक्षणे नसलेल्या बाधित रुग्णांना घरात अलगीकरण होण्यास परवानगी देण्यात आली; परंतु घडले उलटेच. त्याच घरातील चार ते पाच व्यक्ती संसर्गामुुळे बाधित झाल्या. बाधितांच्या घरातील अन्य व्यक्ती खुलेआम बाजारपेठेत खरेदी, सार्वजनिक ठिकाणचा प्रवास करू लागल्या. समाजात मिसळून राहू लागल्या. त्यामुळे संसर्ग रोखण्याऐवजी तो अधिक गतीने फैलावण्यास सुरुवात झाली.

एप्रिल, मे महिन्यात विस्फोट-

यावर्षी पालिका क्षेत्रात जानेवारीत २२५ ,फेब्रुवारीत ३४३, मार्चमध्ये ८१६ कोरोनाबाधित नवे रुग्ण समोर आले. त्यानंतर एप्रिल व मे हे दोन महिने शहराच्या दृष्टीने अतिशय घातक ठरले. एप्रिल महिन्यात ५४४७ तर दि. १८ मेअखेर ५२२३ नवीन रुग्णांची भर पडली. म्हणजेच दोन महिन्यात कोरोना संसर्गाचा महाभयंकर उद्रेक झाला आणि नेमकी याचकाळात प्रशासकीय यंत्रणा कमी पडली आहे.

संपर्कातील व्यक्तींचा शोध कुठाय?

एखादा कोरोना रुग्ण आढळून आला तर त्याच्या नजिकच्या संपर्कातील व्यक्तींची सक्तीने आरटीपीसीआर चाचणी करण्याच्या सूचना आहेत; परंतु नजीकच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणेच आता बंद झाले आहे. एप्रिल आणि मे महिन्यात शहरात १० हजार ५०० नवे बाधित रुग्ण आढळले आहेत, त्यांच्या संपर्कातील पाच जरी व्यक्तींची चाचणी करायची झाली असती तर किमान ५० हजार चाचण्या व्हायला पाहिजे होत्या. पण इतक्या मोठ्या संख्येन चाचण्या झालेल्या नाहीत, हे स्पष्ट आहे.

-प्रोटोकॉल बासनात, अधिकारी बैठकीत

कागदोपत्री नियोजन करण्यात प्रशासन आघाडीवर आहे, परंतु प्रत्यक्षात काहीच काम झाले नाही. प्रोटोकॉलनुसार जेव्हा रुग्ण सापडतो त्यावेळी त्याला नेण्यासाठी रुग्णवाहिका दारात पोहोचायची. तेथील भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला जायचा. तेथे औषध फवारणी केली जायची. रुग्णाच्या नजीकच्या संपर्कातील व्यक्तींचे सक्तीने स्राव घेऊन त्याचे अहवाल येईपर्यंत संस्थात्मक विलगीकरणात रवानगी व्हायची. जरी अहवाल निगेटिव्ह आला तरी चौदा दिवस गृहअलगीकरणात राहण्याची सक्ती व्हायची. दारावर ‘होम क्वारंटाईन’चे स्टीकर लावले जायचे. प्रभाग सचिवांचे त्यांच्यावर नियंत्रण असायचे. परगावांहून कोण आले याची नोंदी व्हायच्या. पण आता यातील काहीही होत नाही. सगळ बेभरवशावर आहे.