शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

ना बाह्यवळण रस्ता, ना शहरात प्रवेश; कोल्हापुरात अवजड वाहनधारकांची कोंडी

By भारत चव्हाण | Updated: January 28, 2023 13:00 IST

महापालिकेने आखलेले रस्ते अपूर्णच राहिले

भारत चव्हाणकोल्हापूर : कोकण, गोवा, मराठवाडा-विदर्भ आणि उत्तर कर्नाटक यांना व्यापार, उद्योगाच्या दृष्टीने प्रगतीचा रस्ता खुला करणाऱ्या कोल्हापूर शहराभोवती बाह्यवळण रस्ता (रिंगरोड) नसल्याने अवजड तसेच मालवाहतूक करणाऱ्या वाहनधारकांची मोठी अडचण होत आहे. अवजड वाहनांना रोज छोट्या-छोट्या गावातून आपला पल्ला गाठावा लागत आहे. त्यामुळे त्यांचा वेळ, पैसा खर्च होतोच शिवाय अपघाताचीही भीती अधिक आहे.कोल्हापूर शहर हे गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र अशा तीन राज्यांचे प्रवेशद्वार आहे. त्यामुळे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाताना कोल्हापूर शहर ओलांडूनच जावे लागते. व्यापार, उद्योगाची वाहतूक येथूनच सुरू होते. त्यामुळे रोज ६०० ते ७०० अवजड वाहने कोल्हापूरच्या सीमा ओलांडून पुढे जात आहेत. बऱ्याच वेळा सांगली, सातारामार्गे कोकणात जाणाऱ्या तसेच कोकणातून व गोव्यातून येणाऱ्या वाहनधारकांना बाह्यवळण रस्ता नसल्यामुळे थेट शहरात येऊन पोहचतात. अशा वेळी एक तर त्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागते, तसेच बराच वेळ एकाच जागी ताटकळत थांबावे लागते.कोल्हापूर जिल्हा पोलिस प्रशासनाने सकाळी दहा ते रात्री आठ अशी शहरात प्रवेश करण्यास अवजड वाहनांना बंद घातली असल्याने रात्री आठ वाजेपर्यंत थांबण्याशिवाय वाहनधारकांना पर्याय नसतो. शिये-भुयेमार्गे कोकणात जाण्याचा वाहनांना एक पर्याय आहे. शिये-भुयेमार्गे वडणगे, आंबेवाडी रस्ता अतिशय छोटा असल्याने वाहतूक करतानाही चालकांच्या जीवाची घालमेल होते. अन्य मार्गाने येणाऱ्या वाहनधारकांनाही अशाच छोट्या-छोट्या रस्त्यांचे पर्याय निवडावे लागतात.नकाशावर रेघा मारल्या, पुढे काय झाले?कोल्हापूर शहराभोवतीच्या बाह्यवळण रस्त्याच्या अनुषंगाने तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून बाह्यवळण रस्त्याचे नकाशे तयार करण्यात आले. त्यांच्याच कारकिर्दीत नंतर कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण स्थापन झाले, परंतु या प्राधिकरणाकडून कोणती कार्यवाही झाली, हे आजपर्यंत गुलदस्त्यात राहिले. त्यावर पुढच्या काळात कोणीच लक्ष घातले नाही.महापालिकेने आखलेले रस्ते अपूर्णच राहिलेमहानगरपालिकेने फुलेवाडी ते कळंबा, संभाजीनगर पेट्रोल पंप ते सायबर चौक हे बाह्यवळण रस्ते तयार केले. या रस्त्यांना सलग जोडताना कळंबा जेलची इमारत आडवी आल्याने रस्ता कळंबा ते संभाजीनगर असा वळविण्यात आला. परंतु आता हेच रस्ते शहराच्या मध्यवस्तीत आले आहेत. शिवाय शिवाजी पूल ते कसबा बावडा हा रस्ताही अपूर्णच आहे.

बाह्यवळण रस्त्याची सुविधा नसल्याने शहरातील वाहतुकीवर प्रचंड ताण पडला आहे. शिवाय शहरातील रस्तेही लहान आहेत. त्यावरून अवजड तसेच मालवाहतूक करणे शक्य होत नाही. द्वारकानाथ कपूर यांच्या काळात बाह्यवळण रस्त्याची आखणी झाली, काही प्रमाणात अंमलबजावणी झाली. परंतु शहराचा विस्तार झाल्याने आता नवीन बाह्यवळण रस्त्यांची मोठी गरज आहे. -शशिकांत फडतारे, उपसंचालक (निवृत्त) नगररचना पुणे विभाग 

शहराला लागून बाह्यवळण रस्ते नसल्यामुळे वाहनधारकांची भयंकर अडचणी येत आहे. शहरातून जाता येत नाही आणि थांबायचे म्हटले तर शहराच्या प्रवेशद्वारावर ट्रक टर्मिनल्सही नाहीत. वाहनधारकांना पर्यायी मार्ग शोधावे लागतात. त्यात वेळ जातो, वाहतूक खर्चही वाढतो. - सुभाष जाधव, अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा लॉरी ऑपरेटर्स असो.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTrafficवाहतूक कोंडी