शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
4
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
5
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
6
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
7
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
8
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
9
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
10
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
11
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
12
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
13
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
14
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
15
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
16
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
17
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
18
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
19
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
20
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!

मनपा निवडणुकीपूर्वी गुन्हेगारांना तडिपार करणार

By admin | Updated: May 21, 2015 00:44 IST

एस. चैतन्या यांची माहिती : नूतन अप्पर पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला

कोल्हापूर : आगामी महापालिका निवडणुकीमध्ये काही गुन्हेगार निवडणूक लढविण्यामध्ये सक्रिय असल्याचे समजते. त्यासाठी ते आतापासून आपल्या नावाचा गाजावाजा करीत आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यासाठी प्रस्ताव पोलीस ठाणे स्तरावर सुरू असून, निवडणूक कालावधीमध्ये एकही गुन्हेगार शहरात व उपनगरांत दिसणार नाही, त्यासाठी त्यांना सळो की पळो करून सोडू, अशी माहिती नूतन अप्पर पोलीस अधीक्षक एस. चैतन्या यांनी पत्रकारांना दिली. बुधवारी एस. चैतन्या यांनी मावळते अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्याकडून बुधवारी पदभार स्वीकारला. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा उपस्थित होते. कोल्हापूरचे अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांची वर्धा जिल्ह्णाच्या पोलीस अधीक्षकपदी पदोन्नती झाली. त्यांच्या जागी इचलकरंजी विभागाचे पोलीस उपअधीक्षक एस. चैतन्या यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानुसार त्यांनी बुधवारी सकाळी ११ वाजता मावळते अप्पर पोलीस अधीक्षक गोयल यांच्याकडून पदभार स्वीकारला. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, इचलकरंजी विभागात गेल्या दोन वर्षांपासून काम करीत असल्याने कोल्हापूर शहराची चांगली ओळख आहे. आगामी महापालिका निवडणूक लढविण्यासाठी काही ‘आर.सी.’ व ‘एस.टी.’ गँगचे गुन्हेगार सक्रिय आहेत. त्यासाठी त्यांना काही राजकीय व गुन्हेगारी टोळ्यांकडून पाठबळ मिळत असल्याचे समजते. या गुन्हेगारांमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडून जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर निवडणुकीपूर्वी सर्व सराईत गुन्हेगारांना तडीपार केले जाईल, असे चैतन्या यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)पानसरे हत्येचा छडा लावणारचज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासामध्ये मी सुरुवातीपासून आहे. आता या तपासाची सर्वस्वी जबाबदारी माझ्यावर पडल्याने तो माझ्यासाठी महत्त्वाचा बनला आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये तपासासाठी भरपूर प्रयत्न झाले असले तरी आव्हानात्मक दृष्टिकोनातून या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे.पोलीस ठाण्याच्या प्रमुखाला नोटीसजिल्ह्यात सुरुवातीपासून अवैध व्यावसायिकांवर कठोर कारवाई केली जात आहे. शहरात कुठे मटका, जुगार, दारूसाठा, आदी अवैध प्रकार दिसून आल्यास संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रमुखाला नोटीस काढली जाईल. जिल्ह्णातील सर्व अवैध धंदे मोडीत काढण्यासाठी कठोर पावले उचलणार आहे.