शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

निविदेलाच गेले ५२२ दिवस;सातारा-कागल रस्त्याचे काम : सहापदरीकरणाच्या निविदेची २२ शुद्धिपत्रके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 00:30 IST

संतोष पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : सातारा-कागल राष्ट्रीय महामार्ग सहापदरीकरणाची एक हजार १७ कोटी ३२ लाख रुपयांची ...

संतोष पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : सातारा-कागल राष्ट्रीय महामार्ग सहापदरीकरणाची एक हजार १७ कोटी ३२ लाख रुपयांची निविदा अंतिम करण्याचे काम गेले ५०६ दिवस सुरू आहे. २२ डिसेंबर २०१७ पासून सुरू असलेली ही प्रक्रिया २९ मे २०१९ ला सकाळी अकरा वाजता संपण्याची आशा आहे. या कालावधीत नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाने (एनएचआय) तब्बल २२ वेळा शुद्धिपत्रक काढून निविदा प्रक्रियेला मुदतवाढ दिली. या ४६.५ किलोमीटर कामाची मुुदत ७३० दिवसांची आहे; परंतु निविदा प्रक्रियाच तब्बल ५२२ दिवस लांबली आहे. परिणामी, ‘डी.एस.आर.’नुसार कामाची किंमत किमान २०० कोटी रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.मुंबई-चेन्नई हायवे (एनएच ४८) हा पुणे-सातारा-बंगलोर-चित्तूर आणि चेन्नई, आदी प्रमुख दहा शहरांतून जातो. महाराष्टÑ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू राज्यांतून तब्बल १४१९ किलोमीटरचा हायवे आहे. १९९९ साली स्वर्णिम चतुर्भुज योजनेत मुंबई-चेन्नई हायवेचे चौपदरीकरण झाले.महाराष्टÑातील ठाणे, पुणे, सातारा, कोल्हापूर, तर कर्नाटकातील बेळगाव, धारवाड, हुबळी, चित्तूर, टूमकूर, आदी शहरांतून हा महामार्ग आहे. ५८४६ किलोमीटरच्या स्वर्णिम चतुर्भुज योजनेत ९० टक्के रस्त्यांचे सहापदरीकरण पूर्ण केले आहे. त्यातील मुंबई-पुणे २००० साली जलदगतीने एक्स्प्रेस वे केला गेला. मात्र, त्यानंतर राज्यातील रुंदीकरण कासव छाप ठरले.एनएचआयच्या २०१६-१७ च्या वार्षिक अहवालात सातारा-कागल या १३३ किलोमीटरच्या रस्त्याचे सहापदरीकरण करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. १४१९ किलोमीटरच्या रस्त्यातील ६७८.५०० ते ७२५ किलोमीटर दरम्यानचा ४६.५० किलोमीटरचा सातारा-कागल दरम्यानचा टप्पा क्रमांक ३ या रस्त्याचे सहापदरीकरण ठरले. त्यानुसार ‘एनएचआय’ने २२ डिसेंबर २०१७ ला दुपारी ५.४० वाजता १२० दिवस मुदतीची एक हजार १७ कोटी ३२ लाख रुपयांची निविदा प्रसिद्ध केली. मात्र, ही निविदा आजपर्यंत उघडलीच नाही.आता २८ मे २०१९ पर्यंत निविदा भरण्याची अंतिम तारीख असून, २९ मे २०१९ ला सकाळी अकरा वाजता निविदा उघडली जाणार आहे. या ५०६ दिवसांच्या काळात ‘एनएचआय’ने तब्बल २२ वेळा शुद्धिपत्रक काढले. २८ फेब्रुवारी २०१९ ला सायंकाळी ५ वाजून १७ मिनिटांनी शेवटचे २२ वे शुद्धिपत्रक काढण्यात आले. त्यात पुन्हा बदल करून एका मिनिटाच्या अवधीत पुन्हा ५ वाजून १८ मिनिटांनी रिवाईज केले. आता पुन्हा शुद्धिपत्रक न निघाल्यास सातारा-कागल रस्त्याच्या तिसऱ्या टप्प्यातील कामास २९ मे २०१९ ला मुहूर्त लागण्याची शक्यता आहे.डीएसआरनुसार २०० कोटींची वाढसातारा-कागल सहापदरीकरणातील ४६.५० कि.मी.च्या रस्त्यासाठी एक हजार १७ कोटी ३२ लाख रुपयांची निविदा २२ डिसेंबर २०१७ला प्रसिद्ध झाली. १२० दिवसांची निविदा प्रक्रिया पावणेदोन वर्षांपेक्षा अधिक काळ लांबली. जिल्हा दरसूची (डी.एस.आर.) दरवर्षी सरासरी १० ते १५ टक्क्यांनी वाढते. ‘डी.एस.आर.’ वाढीनुसार प्रकल्प खर्च वाढीचे प्रयोजन निविदेच्या अटी, शर्थीत असल्यास मूळ प्रकल्प खर्चात किमान २०० कोटी रुपयांची वाढ होईल.