शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

इच्छुकांच्या मनधरणीसाठी निकराचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकूळ’ निवडणुकीसाठी दोन्ही आघाड्यांकडे इच्छुकांची संख्या माेठ्या प्रमाणात असल्याने माघारीसाठी मनधरणी करताना नेत्यांची दमछाक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘गोकूळ’ निवडणुकीसाठी दोन्ही आघाड्यांकडे इच्छुकांची संख्या माेठ्या प्रमाणात असल्याने माघारीसाठी मनधरणी करताना नेत्यांची दमछाक उडत आहे. रविवारी दिवसभर नेत्यांनी पॅनलमधील नावांवर अंतिम हात फिरवला असून आज, सोमवारी उमेदवार निश्चित होणार आहेत. त्यामुळे माघारीसाठी आज, निवडणूक कार्यालयात अक्षरश: झुंबड उडणार आहे.

‘गोकूळ’च्या २१ जागांसाठी ४८२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननीनंतर २४१ जणांचे ३९० अर्ज वैध ठरले. ६ एप्रिलपासून माघारीस सुरुवात झाली असली तरी केवळ बारा जणांनी माघार घेतली आहे. माघारीसाठी दोनच दिवस राहिले आहेत आणि ३७८ अर्ज शिल्लक आहेत. यावरून पॅनलमधील इच्छुकांचा दबाव लक्षात येतो. शेवटच्या क्षणापर्यंत आपले नाव रेटण्याचा प्रयत्न इच्छुकांकडून सुरू असल्याने दोन्ही आघाड्यांतील नेत्यांच्या समोर अडचणी उभ्या राहिल्या आहेत.

रविवारी दिवसभर पॅनलला अंतिम स्वरूप देण्यासाठी दोन्ही आघाड्यांमध्ये बैठकांचा धडाका सुरू होता. सत्तारूढ गटाकडून आ. पी. एन. पाटील, माजी आ. महादेवराव महाडीक यांच्या चर्चा होती. तर विरोधी आघाडीकडून पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह इतर नेत्यांमध्ये खलबते सुरू होते. आज, सोमवारी पॅनलमधील नावावर शेवटचा हात फिरवला जाणार आहे. मात्र, ज्यांना संधी मिळणार नाही, त्यांना नेत्यांनी माघार घेण्याची सूचना दिल्याने गर्दी होणार आहे.

निवडणुकीचा आज फैसला

कोराेनाच्या पार्श्वभूमीवर सत्तारूढ गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर आज, सोमवारी सुनावणी होत आहे. कोरोना संसर्गाने शाहूवाडीतील एका ठरावधारकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे न्यायालयन निवडणुकीबाबत काय भूमिका घेते, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष आहे.

अवैध ठरवलेल्या अर्जांचा आज निकाल

‘गोकूळ’च्या छाननीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरवलेल्या पंधरा जणांनी विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूकर यांच्याकडे अपील केले होते. संबधितांचे म्हणणे ऐकून घेतले असून त्याचा निकाल आज दिला जाणार आहे.