शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

स्पर्धा परीक्षांचे पुढील वेळापत्रक लवकर जाहीर करावे, मार्गदर्शक, परीक्षार्थीच्या प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 13:27 IST

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने योग्य निर्णय घेतला आहे. परीक्षार्थीचे मानसिक स्वास्थ कायम राहण्यासाठी परीक्षांचे पुढील वेळापत्रक आयोगाने लवकर जाहीर करावे. तिसऱ्यांदा परीक्षा पुढे गेल्याने मानसिक ताण वाढणार आहे, अशा संमिश्र प्रतिक्रिया कोल्हापुरातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक आणि परीक्षार्थींनी व्यक्त केल्या.

ठळक मुद्देमार्गदर्शक, परीक्षार्थीच्या प्रतिक्रिया मानसिक स्वास्थाचा सरकार, आयोगाने विचार करावा

कोल्हापूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने योग्य निर्णय घेतला आहे. परीक्षार्थीचे मानसिक स्वास्थ कायम राहण्यासाठी परीक्षांचे पुढील वेळापत्रक आयोगाने लवकर जाहीर करावे. तिसऱ्यांदा परीक्षा पुढे गेल्याने मानसिक ताण वाढणार आहे, अशा संमिश्र प्रतिक्रिया कोल्हापुरातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक आणि परीक्षार्थींनी व्यक्त केल्या.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा अनिश्चित काळासाठी सरकारने पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला. त्याबाबत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, परीक्षार्थींच्या प्रतिक्रिया लोकमतने जाणून घेतल्या.

तिसऱ्यांदा परीक्षा पुढे ढकलल्यायावर्षी राज्यसेवा (सामाईक पूर्व परीक्षा), वनसेवा, अभियांत्रिकी सेवेच्या परीक्षा होणार आहेत. राज्यसेवेची परीक्षा ५ एप्रिलला होणार होती. कोरोनामुळे ती १३ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली. त्यादिवशीच जेईई, नीटची परीक्षा होणार असल्याने आयोगाने राज्यसेवा परीक्षा २० सप्टेंबरला घेण्याचे जाहीर केले. आता कोरोनामुळे पुन्हा पुढे ढकलली आहे.

कोरोनाबाबतची सद्य:स्थिती पाहता २० सप्टेंबरला होणाऱ्या परीक्षेबाबतही परीक्षार्थीना अनिश्चितता वाटत होती. ती राज्य सरकारने आज निर्णय घेऊन दूर केली. तारखेत वारंवार बदल झाल्याने परीक्षार्थींच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होतो. त्यांचे मानसिक स्वास्थ कायम राहण्यासाठी राज्य सरकारने यावर्षीच्या आणि पुढील वर्षीच्या स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक लवकर जाहीर करावे.-शशिकांत बोराळकर,संचालक, युनिक अकॅडमी कोल्हापूर.

परीक्षार्थींची संख्या आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने परीक्षा लांबणीवर टाकण्याचा सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे. परीक्षार्थींना अभ्यासाचे नियोजन करता यावे यासाठी आयोगाने परीक्षांच्या पुढील तारखांची लवकरात लवकर घोषणा करणे महत्त्वाचे ठरणार आहे.-जॉर्ज क्रूझ, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. या परिस्थितीत परीक्षा देणे शक्य होणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून सरकारने चांगला निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे वेळापत्रक बिघडले होते. परीक्षा पुढे गेल्याने आम्हा विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आणखी वेळ मिळणार आहे.-अरविंद माने,परीक्षार्थी, केर्ले.

आपला जीव वाचला तरच परीक्षा देता येणार आहे. परीक्षा पुढे गेली आहे म्हणून विद्यार्थ्यांनी अभ्यासात सैल पडू नये. त्यांनी अभ्यासामध्ये सातत्य ठेवावे. सरकार घेईल त्यावेळी परीक्षा देण्याची तयारी ठेवावी.-राहुल अंगज, परीक्षार्थी, चिमगांव.

परीक्षांच्या तारखेत बदल झाल्याने मानसिक स्वास्थावर निश्चितपणे परिणाम होतो. पूर्वपरीक्षेची की, मुख्य परीक्षेची तयारी करायची, अशी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे आयोगाने पुढील सर्व परीक्षांच्या तारखा लवकर जाहीर कराव्यात. कोरोनाची स्थिती असताना कर्नाटक सरकारने गेल्या १५ दिवसांपूर्वी दहावी-बारावीच्या परीक्षा घेतल्या आहेत. त्यांचे नियोजन लक्षात घेऊन आपल्या आयोगाने पुढील तयारी करावी.-राजवर्धन पाटील, परीक्षार्थी, हुपरी.

 

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाkolhapurकोल्हापूर