शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नवीन शर्त रद्दचे अधिकार प्रांतांना

By admin | Updated: August 3, 2014 22:44 IST

धोम, कण्हेर : प्रत्येक गावात होणार कॅम्प

सातारा : धोम-कण्हेर धरणाने बाधित झालेल्या धरणग्रस्तांच्या शेतजमिनीवरील नवीन अविभाज्य शर्त रद्द करण्याचे अधिकार प्रांताधिकाऱ्यांना दिले आहेत. याबाबतची माहिती सातारा जिल्हा धोम, कण्हेर, कोयना पुनर्वसन कमिटीचे कार्याध्यक्ष टी. जे. सणस यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.पुणे येथे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत २० मे आणि २१ मे २०१४ रोजी या अनुषंगाने बैठक झाली होती. या बैठकील जिल्हाधिकारी आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी उपस्थित होते. याचबैठकी हे अधिकार प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, त्याच्या आदेशाची प्रत प्राप्त झाली नव्हती. ती आता सातारा जिल्हा धोम, कण्हेर, कोयना पुनर्वसन कमिटीकडे आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयालाही त्याची एक प्रत आली आहे.जिल्हा पुनर्वसन कार्यालयात नवीन अविभाज्य शर्त रद्द करण्याची प्रक्रिया अतिशय संथगतीने सुरू होती. त्यासाठी विस्थापित आणि पुनर्वसित खातेदारांना अनावश्यक अशा अठरा कागदांची पूर्तता करावी लागत होती. ही कागदपत्रे गोळा करण्यासाठी अनेकदा खर्च आणि वेळ वाया जात होता. एवढी सर्व पूर्तता केल्यानंतरही प्रस्ताव दाखल झाला आणि तो मंजूर करण्यास बराच कालावधी लागत होता. या पार्श्वभूमीवर धरणग्रस्तांच्या संघटनांनी मोर्चा काढण्याबरोबरच आंदोलनेही केली होती. या अनुषंगाने सातारा जिल्हा धोम, कण्हेर, कोयना पुनर्वसन कमिटीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे, टी. जे. सणस, वाय. एन. पिसाळ, संपत शिंदे यांनी विभागीय आयुक्तांकडे वारंवार चर्चा करण्याबरोबरच निवेदनही दिले होते. जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री शशिकांत शिंदे यांच्यासमवेतही बैठक आयोजित केली होती. त्यावेळीही नवीन शर्तीचा विषय ऐरणीवर आला होता. परिणामी विभागीय आयुक्तांनी दि. २१ जून २०१४ रोजी त्याचा आदेश काढला आणि धरणग्रस्तांच्या जमिनीवरील नवीन शर्त रद्द करण्याचे अधिकार प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे नमूद केले.दरम्यान, नवीन शर्त रद्द करण्याचे अधिकार प्रांताना देण्यात आल्यामुळे प्रत्येक गावात कॅम्प लावले जाणार आहेत. यासाठी पुनर्वसित खातेदारांनी फरकाची रक्कम भरल्याची चलन आणि पाण्यात गेलेल्या जमिनीचे जुने सातबारा उतारे द्यावे लागणार आहेत. तरी ज्या खातेदारांना आपल्या जमिनीवरील नवीन अविभाज्य शर्त कमी करावयाची आहे, अशा खातेदारांनी फरकाची रक्कम त्याचप्रमाणे संबंधित तालुक्यातील पाण्यात गेलेल्या जमिनीचे सातबारा उतारे काढावेत, असे आवाहन सातारा जिल्हा धोम, कण्हेर, कोयना पुनर्वसन कमिटीच्या सर्व सदस्यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे. (प्रतिनिधी)