शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

नवीन अंशदान पेन्शन योजना तोट्याची

By admin | Updated: December 5, 2015 00:59 IST

पेन्शनरांचा आज मोर्चा : जुनी पेन्शन योजनाच लागू करा; संबंधितांच्या हयातीपर्यंतच मिळणार पेन्शन

कोल्हापूर : शासनाने १ नोव्हेंबर २००५ नंतर रूजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लागू केलेली ‘अंशदान निवृत्तिवेतन योजना’ (डीसीपीएस) कर्मचाऱ्यांसाठी तोट्याची आहे. कारण निवृत्तीनंतर जमा होणारी रक्कम ही शासन शेअर मार्केटमध्ये गुंतवून त्यावर मिळणारी रक्कम पेन्शन स्वरूपात संबंधित निवृत्त कर्मचाऱ्याला त्याच्या हयातीपर्यंतच देणार आहे. शेअर मार्केटमधील चढ-उतार व असुरक्षितता पाहता ही योजनाच तोट्याची असल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये आहे. त्यासाठी जुनी पेन्शन योजनाच लागू करावी, अशी मागणी त्यांच्यातून केली जात आहे.शासनाने १ नोव्हेंबर २००५नंतर रूजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी २००५ पासूनच ‘अंशदान निवृत्तिवेतन योजना’ (डीसीपीएस) लागू केली आहे. गेल्या दहा वर्षांत या पेन्शनसंदर्भात म्हणावा असा उठाव कर्मचाऱ्यांकडून झाला नाही; परंतु २०१०नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना आपल्या भविष्याची चिंता निर्माण झाल्याने त्यांनी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेची जिल्हा शाखा स्थापन करून बंडाचे निशाण फडकाविले आहे. (डीसीपीएस) योजनेंतर्गत निवृत्तीनंतर किती निवृत्तिवेतन मिळेल याची हमी नाही. सेवेत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना निवृत्तिवेतन अथवा अनुकंपा तत्त्वावर नोकरी याबाबत कोणतीही तरतूद नाही. सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजना (जीपीएफ) ही लागू नाही. त्यामुळे सेवेत असेपर्यंत प्रामाणिकपणे काम करूनही निवृत्तीनंतर आवश्यक पेन्शनचा हक्क शासनाने हिरावून घेतला आहे. परिणामी कर्मचारी व कुटुंबीयांचे भविष्य अंधकारमय झाले आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी आज, शनिवारी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर भवानी मंडप, शिवाजी पुतळा, सीपीआर चौकमार्गे मोर्चा काढण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)शेअर मार्केटमधील चढ-उतारामुळे असुरक्षितता : जुन्या व नवीन पेन्शनमधील फरकजुनी पेन्शन योजना सेवेत असताना मृत्यू झाल्यावर संबंधित कर्मचाऱ्याच्या पत्नीला कुटुंब निवृत्तिवेतन मिळते. विकलांग मुला-मुलीस हे वेतन मिळते. निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण, ग्रॅच्युएटी सात लाखांच्या मर्यादित मिळते, भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा असलेली संपूर्ण रक्कम मिळते.शारीरिक व मानसिक विकलांगतेमुळे सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तिवेतन, निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण, ग्रॅच्युएटी सात लाखांच्या मर्यादेत व भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा झालेली संपूर्ण रक्कम मिळते.सक्तीने सेवानिवृत्त केलेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तिवेतन, निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण, ग्रॅच्युएटी सात लाखांच्या मर्यादित व भविष्य निर्वाह निधीत जमा असलेली संपूर्ण रक्कम मिळते.निवृत्तीनंतर निवृत्तिवेतनाशिवाय मिळणारे एकूण (उपदान, अंशराशीकरण, भविष्य निर्वाह निधी) वर्ग-१-कर्मचारी-सरासरी २९ लाख रुपये, वर्ग-२-कर्मचारी-सरासरी २० लाख रुपये, वर्ग-३-कर्मचारी-सरासरी १४ लाख रुपये, वर्ग-४-कर्मचारी-सरासरी १० लाख रुपये मिळतात.नवीन पेन्शन योजना सेवेत असताना मृत्यू झाल्यावर संबंधित कर्मचाऱ्याच्या पत्नीला, विकलांग मुला-मुलीस कुटुंब निवृत्तिवेतन, निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण, ग्रॅच्युएटी सात लाखांची मर्यादित रक्कम यापैकी काहीही मिळत नाही. फक्त भविष्य निर्वाह निधीत जमा असलेली संपूर्ण रक्कम मिळते.इतर कोणतीही सुविधा न मिळता फक्त भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा असलेली संपूर्ण रक्कम मिळते.सक्तीने सेवानिवृत्त केलेल्या कर्मचाऱ्यांना कोणतेही नियम या योजनेत नाहीत.शासनाकडून जमा रकमेशिवाय सेवानिवृत्तीविषयक ोणतेही लाभ देण्यात येणार नाहीत. (जमा रकमेच्या फक्त ६० टक्के रक्कम मिळणार आहे)सुमारे दहा हजारकर्मचाऱ्यांना नवीन पेन्शनजिल्ह्यातील जवळपास दहा हजार शासकीय कर्मचाऱ्यांना शासनाची नवीन पेन्शन योजना लागू आहे. २००५नंतर रूजू झालेले हे कर्मचारी असून त्यामध्ये आरोग्यसेवक सुमारे २०००, ग्रामसेवक सुमारे २००० व शिक्षक सुमारे ५००० आहेत.पेन्शनबाबतचा शासनाचा निर्णय हा कर्मचाऱ्यांवर अन्यायी आहे. आम्हाला जुन्या पेन्शन योजनेप्रमाणेच पेन्शन लागू करावी.- ज्ञानेश्वर पिसाळ, जिल्हा कार्याध्यक्ष,महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना