शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
2
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
16
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
17
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
18
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
19
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
20
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख

नळजोडणीधारकांना नाहक भुर्दंड

By admin | Updated: May 27, 2016 00:03 IST

बिलांत तिपटीने वाढ : वाढत्या तक्रारींमुळे मीटर रीडर वैतागले; पाणीवापराच्या तिसऱ्या टप्प्यामुळे बिले भरमसाट

तानाजी पोवार -- कोल्हापूर : पाणी बिलात अपहार होऊ नये म्हणून ‘स्पॉट बिलिंग’ची अत्याधुनिक आॅनलाईन यंत्रणा महानगरपालिकेच्या वतीने कार्यरत केली असली तरी ग्राहकांना चार महिने उशिरा बिले हाती मिळत असल्यामुळे नियमानुसार बिलिंगमधील पाणीवापराचा टप्पा वाढून त्याचा नाहक भुर्दंड नळजोडणीधारकावर पडत आहे. चार महिन्यांनी पण अडीच ते तिप्पट वाढीची पाण्याची बिले हाती पडल्यानंतर नळजोडणीधारक चक्रावून जात आहेत; त्यामुळे तक्रारींत भर पडत आहे.शहरातील पाण्याची स्पॉट बिलिंगची योजना ५ मार्चपासून सुरू झाली. ती सुरू झाल्यापासून तक्रारी कमी होण्याऐवजी त्यांत भरच पडत आहे. स्पॉट बिलिंग उपक्रमात बिल जाग्यावरच ग्राहकांना देण्यासाठी लागणारा कालावधी विचारात घेता, मीटर रीडरची संख्या वाढविणे क्रमप्राप्त आहे. शिवाय तांत्रिक बाबींकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. अन्यथा त्याचा पाणी बिल वसुलीवर परिणाम होणार आहे.नळजोडणीधारकांच्या हाती चार महिन्यांनी ‘स्पॉट बिल’ मिळत असल्यामुळे २० हजार लिटर पाणीवापरापर्यंत १९० रुपये कमीत-कमी आकारणी, त्यापुढील २० हजार ते ४० हजार लिटरपर्यंत पाणी वापरासाठी ११.५० रुपये प्रतिहजारी असा दर पडतो. त्यामुळे सामान्य कुटुंबाचे दोन महिन्यांचे बिल जास्तीत जास्त ३५० रुपये येत होते. चार महिन्यांचे जास्तीत जास्त ७०० रुपये अपेक्षित असताना हेच बिल १४०० ते १६०० रुपये आल्यामुळे ग्राहक चक्रावून जात आहेत. विशेष म्हणजे, बिले देण्यास लागलेल्या विलंबामुळे चार महिन्यांचा पाणीवापर घेण्यात येतो त्यावेळी पाणीवापराच्या तिसऱ्या टप्प्याचा (४० हजार लिटर पाणीवापर पुढे) प्रतिहजारी १५ रुपये प्रतिहजारी दर लागू होतो. त्यामुळे पाण्याच्या बिलात सुमारे अडीच ते तिप्पट वाढ होत आहे. (समाप्त)बंद मीटरचा महापालिकेला तोटामीटर बंद असताना पहिल्या महिन्यातच नळजोडणीधारकाला १३२० रुपयांचा आकार आकारला जातो. त्यानंतरही मीटर दुरुस्त न केल्यास दर दोन महिन्यांनी या दंडाच्या रकमेत वाढ होते; पण स्पॉट बिलिंगमध्ये बंद मीटरसाठी १९० रुपयेच प्रथम आकार आकारला जातो. त्यानंतरही मीटर दुरुस्त न केल्यास दर दोन महिन्यांनी ५२०, ६५०, १०४० रु. असा दंडात्मक आकार वाढत जातो. किमान हजार रुपये बिल येत असेल तर स्पॉट बिलिंगमध्ये मीटर बंद दाखविल्यास त्याचे बिल अवघे १९० रुपये येते. त्यामुळे महानगरपालिकेला जादा रकमेचा तोटा सहन करावा लागत आहे. तक्रार करूनही प्रशासनाने त्याची गंभीरपणे दखल घेतलेली नाही.