शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

कोरोनानंतरच्या मुलांच्या भावजीवनावर लेखन होणे गरजेचे : किरण केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 18:04 IST

literature Online Kolhapur : कोरोनानंतरचे मुलांचे भावजीवन यावर आज लेखन होणे गरजेचे आहे. ज्या साहित्यामध्ये बालसाहित्य असतं त्यामध्ये वाचणारी पिढी घडते. बालसाहित्य म्हणजे नुसतं फुल नाही तर त्या फुलाचा सुगंध आहे. नुसता समुद्र नाही तर समुद्राच्या लाटा देखील आहेत, ज्याला सुगंध घेता येतो, लाटा झेलता येतात असा माणूस चांगली बालसाहित्याची निर्मिती करू शकतो, असे मत 'किशोर' या मासिकाचे संपादक किरण केंद्रे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देकोरोनानंतरच्या मुलांच्या भावजीवनावर लेखन होणे गरजेचे : किरण केंद्रेआभासी बालसाहित्य व्याख्यानमाला : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे आयोजन

कोल्हापूर : कोरोनानंतरचे मुलांचे भावजीवन यावर आज लेखन होणे गरजेचे आहे. ज्या साहित्यामध्ये बालसाहित्य असतं त्यामध्ये वाचणारी पिढी घडते. बालसाहित्य म्हणजे नुसतं फुल नाही तर त्या फुलाचा सुगंध आहे. नुसता समुद्र नाही तर समुद्राच्या लाटा देखील आहेत, ज्याला सुगंध घेता येतो, लाटा झेलता येतात असा माणूस चांगली बालसाहित्याची निर्मिती करू शकतो, असे मत 'किशोर' या मासिकाचे संपादक किरण केंद्रे यांनी व्यक्त केले.दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आभासी व्याख्यानमालेत ते बोलत होते. या 'बालसाहित्य व्याख्यानमाले 'अंतर्गत केंद्रे यांनी 'बालसाहित्यिकाकडून अपेक्षा 'या विषयावर आपले मत व्यक्त केले. या आभासी व्याख्यानमालेचे संयोजन गोविंद पाटील, वि. द. कदम, प्रा. विनोद कांबळे यांनी केले.बालसाहित्य हे बालमनाला अलगद स्पर्शून जाणारं असावं असे सांगून किरण केंद्रे म्हणाले, हलक्याफुलक्या शब्दकळांनी संस्कार संपन्न करणार असं साहित्य येणे गरजेचे आहे. बालसाहित्य आणि चित्र यांची सांगड घालण्याचं काम मुलं करत आहेत. बालसाहित्य हे सहजतेने घेणारी गोष्ट नाही. सोपं लिहिणं सर्वात कठीण असतं हे बालसाहित्य वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल. साहित्याचा उद्देशात माहिती, मूल्यं आणि शहाणपण हे आहे. बालसाहित्यामधून यातला नेमका उद्देश मुलांना व्यापक दृष्टिकोनातून सांगण्याची गरज आहे.मराठी बालसाहित्याची उपेक्षामहाराष्ट्रामध्ये मराठी बालसाहित्याची उपेक्षा झालेली दिसते. या साहित्याकडे जितक्या गंभीरतेने मराठी साहित्याने बघायला पाहिजे होतं तितकं बघितलं नाही. जोपर्यंत आपली भूमिका स्पष्ट होत नाही तोपर्यंत बालसाहित्यामध्ये नाविन्यपूर्ण लेखन येणार नाही. 'किशोर' मासिकाचे काम करत असताना रोज अनेक प्रकारचे साहित्य येतं. मात्र यातलं नेमकं बालसाहित्य आम्ही प्रसिद्ध करीत असतो, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :literatureसाहित्यkolhapurकोल्हापूरonlineऑनलाइन