शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपट संवेदनशीलतेने समजून घेण्याची गरज- अशोक राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 15:43 IST

भारतीय चित्रपट म्हटले की भपकेबाजपणा, स्त्रियांचे अंगप्रदर्शन किंवा अश्लील दृश्ये असे चित्र निर्माण झाले आहे. दर्जेदार आणि चांगल्या आशयाचे अनेक चित्रपट निघतात; पण ती पाहण्याची रसिकांची मानसिकता नाही. समाजाचे प्रतिंिबंब असलेला चित्रपट संवेदनशीलतेने पाहण्याची व त्यातून आपणच बोध घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रपट समीक्षक अशोक राणे यांनी येथे केले.

ठळक मुद्दे चित्रपट संवेदनशीलतेने समजून घेण्याची गरज- अशोक राणेप्रकट मुलाखतीत मांडले चित्रपटांचे तंत्र

कोल्हापूर : भारतीय चित्रपट म्हटले की भपकेबाजपणा, स्त्रियांचे अंगप्रदर्शन किंवा अश्लील दृश्ये असे चित्र निर्माण झाले आहे. दर्जेदार आणि चांगल्या आशयाचे अनेक चित्रपट निघतात; पण ती पाहण्याची रसिकांची मानसिकता नाही. समाजाचे प्रतिंिबंब असलेला चित्रपट संवेदनशीलतेने पाहण्याची व त्यातून आपणच बोध घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रपट समीक्षक अशोक राणे यांनी येथे केले.राम गणेश गडकरी हॉलमध्ये दि न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित सी. जी. कुलकर्णी वाङ्मय मंडळाच्या वतीने आयोजित प्रकट मुलाखतीत त्यांनी ‘भारतीय सिनेमा आणि जागतिक सिनेमा’ या विषयावर अभ्यासपूर्ण विवेचन केले. अभिनेत्री डॉ. समीरा गुजर यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी ‘सिनेमा पाहणारा माणूस’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. अध्यक्षस्थानी नियामक मंडळाचे अध्यक्ष विनोदकुमार लोहिया होते.राणे म्हणाले, हिंदी सिनेमा ही अभ्यास करण्याची गोष्ट आहे. त्याचा शास्त्रोक्त विचार व्हायला हवा. सिनेमाकडे पाहण्याची, रसिकांच्या दृष्टीने मनोरंजनाची विशिष्ट चौकट आहे. माणसाचं वय वाढत जातं तशी त्याच्यामध्ये प्रगल्भता येते, अभिरुची बदलते असं आपण मानतो; पण असं होत नाही. आपलं वय वाढतं, त्यासोबत समज वाढत नाही. आपण इतके सुमार दर्जाचे चित्रपट पाहत आहोत की सगळीकडे कचरा बघून आपली सौंदर्यदृष्टीच नाहीशी झाली आहे.

गोष्टीपलीकडची गोष्ट पाहिलीच जात नाही. त्यासाठी स्वत:मधील विश्लेषणाची ताकद मिळवावी लागेल. याचा अर्थ पाश्चात्त्य सिनेमे चांगले आणि भारतीय सिनेमे वाईट असा नाही. भारतातील दर्जेदार सिनेमे परदेशातील नागरिकांपर्यंत पोहोचत नाहीत. तसेच कलात्मक सिनेमे चांगले आणि व्यावसायिक सिनेमे वाईट असेही नाही.संस्थेचे समन्वय समिती अध्यक्ष नितीन वाडीकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत जोशी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. स्नेहा फडणीस यांनी सूत्रसंचालन केले.व्यक्तिरेखांच्या प्रेमातराणे म्हणाले, भारतीय रसिक व्यक्तिरेखांच्या खूप प्रेमात असतात; म्हणून कलाकारही आपल्या त्याच त्या प्रतिमांना चिकटून असतात. बाईचं शरीर दाखविण्यासाठीच असतं, हे मानून मनोरंजनाची पातळी घसरली आहे. अमुक एका मालिकेत मेलेला हिरो जिवंत व्हावा म्हणून देशभर पूजापाठ केले जातात. निर्मात्यांना ती व्यक्तिरेखा पुन्हा आणावी लागते. त्याच वेळी बंगालच्या सीमेवर २२ जवान शहीद होतात, या घटनेने कोणी हळहळत नाही, ही शोकांतिका आहे. 

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकkolhapurकोल्हापूर