शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
3
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
4
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
5
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
6
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
7
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
8
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
9
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
10
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
11
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
12
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
13
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
14
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
15
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
16
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
18
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
19
आर्यनच्या सीरिजमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता कोण? समीर वानखेडेंच्या वादावर म्हणाला..
20
अमानवीय! तुमच्या म्हशी आमच्या शेतात चरायला येतात; शेतकऱ्याचा १२ म्हशींवर कुऱ्हाडीने वार...

चित्रपट संवेदनशीलतेने समजून घेण्याची गरज- अशोक राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 15:43 IST

भारतीय चित्रपट म्हटले की भपकेबाजपणा, स्त्रियांचे अंगप्रदर्शन किंवा अश्लील दृश्ये असे चित्र निर्माण झाले आहे. दर्जेदार आणि चांगल्या आशयाचे अनेक चित्रपट निघतात; पण ती पाहण्याची रसिकांची मानसिकता नाही. समाजाचे प्रतिंिबंब असलेला चित्रपट संवेदनशीलतेने पाहण्याची व त्यातून आपणच बोध घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रपट समीक्षक अशोक राणे यांनी येथे केले.

ठळक मुद्दे चित्रपट संवेदनशीलतेने समजून घेण्याची गरज- अशोक राणेप्रकट मुलाखतीत मांडले चित्रपटांचे तंत्र

कोल्हापूर : भारतीय चित्रपट म्हटले की भपकेबाजपणा, स्त्रियांचे अंगप्रदर्शन किंवा अश्लील दृश्ये असे चित्र निर्माण झाले आहे. दर्जेदार आणि चांगल्या आशयाचे अनेक चित्रपट निघतात; पण ती पाहण्याची रसिकांची मानसिकता नाही. समाजाचे प्रतिंिबंब असलेला चित्रपट संवेदनशीलतेने पाहण्याची व त्यातून आपणच बोध घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रपट समीक्षक अशोक राणे यांनी येथे केले.राम गणेश गडकरी हॉलमध्ये दि न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित सी. जी. कुलकर्णी वाङ्मय मंडळाच्या वतीने आयोजित प्रकट मुलाखतीत त्यांनी ‘भारतीय सिनेमा आणि जागतिक सिनेमा’ या विषयावर अभ्यासपूर्ण विवेचन केले. अभिनेत्री डॉ. समीरा गुजर यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी ‘सिनेमा पाहणारा माणूस’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. अध्यक्षस्थानी नियामक मंडळाचे अध्यक्ष विनोदकुमार लोहिया होते.राणे म्हणाले, हिंदी सिनेमा ही अभ्यास करण्याची गोष्ट आहे. त्याचा शास्त्रोक्त विचार व्हायला हवा. सिनेमाकडे पाहण्याची, रसिकांच्या दृष्टीने मनोरंजनाची विशिष्ट चौकट आहे. माणसाचं वय वाढत जातं तशी त्याच्यामध्ये प्रगल्भता येते, अभिरुची बदलते असं आपण मानतो; पण असं होत नाही. आपलं वय वाढतं, त्यासोबत समज वाढत नाही. आपण इतके सुमार दर्जाचे चित्रपट पाहत आहोत की सगळीकडे कचरा बघून आपली सौंदर्यदृष्टीच नाहीशी झाली आहे.

गोष्टीपलीकडची गोष्ट पाहिलीच जात नाही. त्यासाठी स्वत:मधील विश्लेषणाची ताकद मिळवावी लागेल. याचा अर्थ पाश्चात्त्य सिनेमे चांगले आणि भारतीय सिनेमे वाईट असा नाही. भारतातील दर्जेदार सिनेमे परदेशातील नागरिकांपर्यंत पोहोचत नाहीत. तसेच कलात्मक सिनेमे चांगले आणि व्यावसायिक सिनेमे वाईट असेही नाही.संस्थेचे समन्वय समिती अध्यक्ष नितीन वाडीकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत जोशी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. स्नेहा फडणीस यांनी सूत्रसंचालन केले.व्यक्तिरेखांच्या प्रेमातराणे म्हणाले, भारतीय रसिक व्यक्तिरेखांच्या खूप प्रेमात असतात; म्हणून कलाकारही आपल्या त्याच त्या प्रतिमांना चिकटून असतात. बाईचं शरीर दाखविण्यासाठीच असतं, हे मानून मनोरंजनाची पातळी घसरली आहे. अमुक एका मालिकेत मेलेला हिरो जिवंत व्हावा म्हणून देशभर पूजापाठ केले जातात. निर्मात्यांना ती व्यक्तिरेखा पुन्हा आणावी लागते. त्याच वेळी बंगालच्या सीमेवर २२ जवान शहीद होतात, या घटनेने कोणी हळहळत नाही, ही शोकांतिका आहे. 

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकkolhapurकोल्हापूर