शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

चित्रपट संवेदनशीलतेने समजून घेण्याची गरज- अशोक राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 15:43 IST

भारतीय चित्रपट म्हटले की भपकेबाजपणा, स्त्रियांचे अंगप्रदर्शन किंवा अश्लील दृश्ये असे चित्र निर्माण झाले आहे. दर्जेदार आणि चांगल्या आशयाचे अनेक चित्रपट निघतात; पण ती पाहण्याची रसिकांची मानसिकता नाही. समाजाचे प्रतिंिबंब असलेला चित्रपट संवेदनशीलतेने पाहण्याची व त्यातून आपणच बोध घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रपट समीक्षक अशोक राणे यांनी येथे केले.

ठळक मुद्दे चित्रपट संवेदनशीलतेने समजून घेण्याची गरज- अशोक राणेप्रकट मुलाखतीत मांडले चित्रपटांचे तंत्र

कोल्हापूर : भारतीय चित्रपट म्हटले की भपकेबाजपणा, स्त्रियांचे अंगप्रदर्शन किंवा अश्लील दृश्ये असे चित्र निर्माण झाले आहे. दर्जेदार आणि चांगल्या आशयाचे अनेक चित्रपट निघतात; पण ती पाहण्याची रसिकांची मानसिकता नाही. समाजाचे प्रतिंिबंब असलेला चित्रपट संवेदनशीलतेने पाहण्याची व त्यातून आपणच बोध घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रपट समीक्षक अशोक राणे यांनी येथे केले.राम गणेश गडकरी हॉलमध्ये दि न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित सी. जी. कुलकर्णी वाङ्मय मंडळाच्या वतीने आयोजित प्रकट मुलाखतीत त्यांनी ‘भारतीय सिनेमा आणि जागतिक सिनेमा’ या विषयावर अभ्यासपूर्ण विवेचन केले. अभिनेत्री डॉ. समीरा गुजर यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी ‘सिनेमा पाहणारा माणूस’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. अध्यक्षस्थानी नियामक मंडळाचे अध्यक्ष विनोदकुमार लोहिया होते.राणे म्हणाले, हिंदी सिनेमा ही अभ्यास करण्याची गोष्ट आहे. त्याचा शास्त्रोक्त विचार व्हायला हवा. सिनेमाकडे पाहण्याची, रसिकांच्या दृष्टीने मनोरंजनाची विशिष्ट चौकट आहे. माणसाचं वय वाढत जातं तशी त्याच्यामध्ये प्रगल्भता येते, अभिरुची बदलते असं आपण मानतो; पण असं होत नाही. आपलं वय वाढतं, त्यासोबत समज वाढत नाही. आपण इतके सुमार दर्जाचे चित्रपट पाहत आहोत की सगळीकडे कचरा बघून आपली सौंदर्यदृष्टीच नाहीशी झाली आहे.

गोष्टीपलीकडची गोष्ट पाहिलीच जात नाही. त्यासाठी स्वत:मधील विश्लेषणाची ताकद मिळवावी लागेल. याचा अर्थ पाश्चात्त्य सिनेमे चांगले आणि भारतीय सिनेमे वाईट असा नाही. भारतातील दर्जेदार सिनेमे परदेशातील नागरिकांपर्यंत पोहोचत नाहीत. तसेच कलात्मक सिनेमे चांगले आणि व्यावसायिक सिनेमे वाईट असेही नाही.संस्थेचे समन्वय समिती अध्यक्ष नितीन वाडीकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत जोशी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. स्नेहा फडणीस यांनी सूत्रसंचालन केले.व्यक्तिरेखांच्या प्रेमातराणे म्हणाले, भारतीय रसिक व्यक्तिरेखांच्या खूप प्रेमात असतात; म्हणून कलाकारही आपल्या त्याच त्या प्रतिमांना चिकटून असतात. बाईचं शरीर दाखविण्यासाठीच असतं, हे मानून मनोरंजनाची पातळी घसरली आहे. अमुक एका मालिकेत मेलेला हिरो जिवंत व्हावा म्हणून देशभर पूजापाठ केले जातात. निर्मात्यांना ती व्यक्तिरेखा पुन्हा आणावी लागते. त्याच वेळी बंगालच्या सीमेवर २२ जवान शहीद होतात, या घटनेने कोणी हळहळत नाही, ही शोकांतिका आहे. 

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकkolhapurकोल्हापूर