शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात: ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीचा मृत्यू, १२ जण जखमी
2
'सिस्टममध्ये मोठी गडबड, निवडणूक आयोगानेही तडजोड केली', राहुल गांधींनी अमेरिकेत मांडला महाराष्ट्र निवडणुकीचा मुद्दा
3
इकडे आड...! अमेरिकेसोबत व्यापारी करार केलात तर याद राखा; चीनची जगाला धमकी
4
भारतात उभारलं जाणार जगातील पहिले अक्षय ऊर्जेवर चालणारे शहर? कशा असतील अत्याधुनिक सुविधा?
5
Maharashtra Politics :"दोन ‘बंधू’ एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा..."; सामनातून विरोधकांना डिवचले, संकेतही दिले
6
झारखंडच्या बोकारोमध्ये चकमक! सुरक्षा दलांनी ६ नक्षलवाद्यांना ठार केले
7
सरकारी टेलिकॉम कंपनी MTNL नं ₹८,३४६ कोटींचं कर्ज केलं डिफॉल्ट; 'या' ७ बँकांकडून घेतलंय लोन
8
वानखेडेवर १७ वर्षांच्या आयुष म्हात्रेची तुफानी फटकेबाजी, सामना पाहणाऱ्या भावाला आनंदाश्रू अनावर, व्हिडीओ होतोय व्हायरल 
9
राज्य सरकार हिंदीचा प्रचार का करतंय?; २२ शैक्षणिक संघटनांचा हिंदी सक्तीला विरोध
10
Stock Market Today: ३४९ अंकांच्या तेजीसह उघडला Sensex, बँक निफ्टीचा रेकॉर्ड; रियल्टी-हेल्थकेअरमध्ये मोठी तेजी
11
‘अटी’तटीत अडकली ठाकरे युती, चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच; मनसेची आक्रमक भूमिका
12
NAV म्हणजे नक्की काय हो? Mutual Fund मध्ये गुंतवणूक करत असाल तर हे माहितच हवं
13
महाराष्ट्रात सौर ऊर्जा क्रांती, राज्याला महत्त्वपूर्ण यश; ८,४५० मेगावॅट वीजनिर्मिती
14
Post Office ची कमालीची सेव्हिंग स्कीम; गुंतवणूक करा आणि महिन्याला २० हजारांचं पेन्शन फिक्स
15
काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश
16
"भारतातील निवडणूक प्रक्रियेत...’’, महाराष्ट्रातील मतदानाचा उल्लेख करत राहुल गांधींचं अमेरिकेत मोठं विधान
17
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
19
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
20
दोन मुलांना मारून टाकणार, पेटवून घेणार; महिलेचा 'तो' ईमेल आणि विख्यात डॉक्टरांनी संपवलं जीवन

ग्रामविकास, कारवाईचा फार्स: जुन्या नियमांसह धोरणे बदला अन् गावे वाचवा

By समीर देशपांडे | Updated: February 7, 2025 11:53 IST

वित्त'मधून लाखो रुपये मोठ्या ग्रामपंचायतींना, ग्रामविकास विभाग हजारांतच

समीर देशपांडेकोल्हापूर : गावात रात्री मोटार बिघडली, तर ती दुसऱ्याच दिवशी दुरुस्त करण्याची गरज असते; परंतु त्यासाठी दोन कोटेशन घेण्याची अट, ते न घेता तातडीचे म्हणून काम करून घेतले आणि नंतर ते विसरून राहिले की तक्रारीला वाव, हात शिल्लक ठेवायला फक्त ५ हजारांची मर्यादा, मोठी गावेसुद्धा एका ग्रामविकास अधिकाऱ्यावर अवलंंबून, असे जुने नियम आणि जुनी धोरणे बदलण्याची गरज आहे.एकीकडे वित्त आयोगाच्या माध्यमातून लाखो रुपये मोठ्या ग्रामपंचायतींच्या खात्यावर येत असताना शासनाचा ग्रामविकास विभाग अजूनही हजारातच खेळत बसला आहे. जर ग्रामपंचायती धडपणे चालवायच्या असतील, तक्रारी कमी व्हायच्या असतील, तर जुन्या नियमांमध्ये बदल करण्याची गरज आहे.

केंद्र आणि राज्य शासनाची प्रत्येक योजना गावात राबवायची आहे, तर मग त्याला पूरक अशी प्रशासकीय चौकट तयार करण्याचे काम शासनाचेच आहे; परंतु याकडे पाहण्यासाठी कोणाला वेळ नाही. परिणामी, अनेकदा तक्रारदारांना तक्रार करण्यासाठी आयतीच संधी मिळते. त्यापेक्षा काही नियम बदलले, तर या तक्रारी कमी होतील आणि कामकाजाही सुलभ होईल.कलम ६० अ मध्ये पंचायत सचिव जबाबदारी व कर्तव्याबाबत बदल व्हायला हवा, कलम १२४, फेरफार नोटीस, अपील तरतूद आवश्यक, नोंद मंजुरीचे अधिकार विस्तार अधिकाऱ्यांना द्यावेत, कर्मचारी नेमणूक संख्या आकृतिबंध बदलावा, जीएम पोर्टलबाबत अधिनियमात तरतूद करावी, कलम ४५ मध्ये ग्रामपंचायतीने कोणते दाखले, उतारे द्यावेत याबाबत तरतूद करावी.

हे करण्याची गरजगावातील थकबाकीदारांच्या मिळकतींवर बोजा नोंद करावा, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा जाॅब चार्ट निश्चित करावा, ग्रामपंचायतीना शाॅप ॲक्ट लागू करावा. जिल्हा परिषद स्तरावर सरपंच समिती असावी. पडीक जमीन, वारस नसणाऱ्या मिळकतींबाबत अपवादात्मक परिस्थितीत करात सूट देण्याचे अधिकार ग्रामपंचायतीला द्यावेत, मोठ्या ग्रामपंचायतीला एक किंवा पाच लहान गावांसाठी एक अभियंता नियुक्त करावा.

हातशिल्लक वाढवायला हवीग्रामपंचायतीमध्ये ५ हजार रुपयांची हातशिल्लक ठेवावी, असा नियम २०११ साली करण्यात आला. त्याला १३ वर्षे झाली. आता ग्रामपंचायतींच्या कामाचे स्वरूप झपाट्याने बदलले आहे. १५ व्या वित्त आयोगाचा निधी लाखापासून कोटीपर्यंत खात्यावर येत आहे. त्यामुळे हातशिल्लक मर्यादाही वाढवली पाहिजे.

  • ग्रामपंचायत करासाठी राज्य शासनाने ऑनलाइन प्रणाली विकसित करावी. यामध्ये गावातील मालमत्ताधारकांची यादी आणि त्यांना लागू असलेल्या सर्व प्रकारच्या करांची रक्कम त्याला दिसेल.
  • या कर प्रणालीचा लाॅग इन पासवर्ड फक्त ग्रामपंचायतीकडे असेल.
  • ही पावती सर्व शासकीय विभागांच्या योजना आणि बॅकांमधील कामांसाठी अनिवार्य करावी. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कर बुडवेगिरीला आळा बसेल आणि अपात्र ग्रामस्थ शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी धजावणार नाहीत.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायतGovernmentसरकार