शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

'वंचितां'बाबत माध्यमांकडून समाजजागृतीची गरज

By admin | Updated: May 19, 2015 00:21 IST

‘समर्थन’च्या चर्चासत्रातील सूर : मानवी हक्क वार्ता पुरस्कार वितरण सोहळा

कोल्हापूर : वंचितदेखील माणसे आहेत. त्यांना माणसांसारखे जगता आले पाहिजे. त्यासाठी माध्यमांनी वंचितांच्या प्रश्नांबाबत समाजाला जागृत करावे, असा सूर समर्थन व अभिव्यक्ती समर्थन पत्रकार संघटनेच्या चर्चासत्रात सोमवारी येथे उमटला.येथील शिवाजी उद्यमनगरमधील शेठ रामभाई सामाणी सभागृहात ‘समर्थन’तर्फे ‘वंचितांचे प्रश्न व माध्यमांची भूमिका’ या विषयावर चर्चासत्र झाले. यावेळी माजी आमदार संपतराव पवार-पाटील, ‘समर्थन’चे कार्याध्यक्ष व माजी आमदार विवेक पंडित, ‘अवनि’च्या अनुराधा भोसले, सकाळचे मुख्य संपादक श्रीराम पवार उपस्थित होते. यावेळी ‘लोकमत’चे बातमीदार संतोष मिठारी यांना २०१४ चा ‘समर्थन मानवी हक्क वार्ता पुरस्कार’ माजी आमदार पंडित यांच्या हस्ते देण्यात आला. पत्रकार महेश गावडे, शैलेश पालकर, राजू सोनवणे यांनाही पुरस्काराने सन्मानित केले.माजी आमदार पवार-पाटील म्हणाले, लोकशाही मुक्त आहे का? याचा विचार गांभीर्याने करण्याची सध्या वेळ आली आहे. निर्भयपणे लढण्याचे वातावरण संपले आहे. हे चित्र बदलण्यासाठी वंचित, असंघटित घटकांचे समाजातील स्थान बळकट होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने माध्यमांनी समाजाला जागृत करावे.‘अवनि’च्या भोसले म्हणाल्या, शिक्षण आणि जगणे याकडे एकत्रितपणे बघणे आवश्यक आहे. वंचितांच्या सक्षमीकरणासाठी ते महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने माध्यमांनी कार्यरत राहावे.माजी आमदार पंडित म्हणाले, समाजातील उत्तरदायित्व हे पूर्णपणे मोडीत निघाले आहे. सरकारी क्षेत्रातील उत्तरदायित्वाची जबाबदारी असलेली यंत्रणा निकामी झाली आहे. ती वंचितांसाठी मारक ठरत आहे. आपले हक्क मिळविण्यासह प्रश्न सोडविण्यासाठी ते संघटित नसल्याने त्यांची ताकद कमी पडते. हे लक्षात घेऊन वंचितांना न्याय देण्यासाठी त्यांचे प्रश्न मांडण्यासह त्यांच्या लढ्याला माध्यमांनी बळ द्यावे. कार्यक्रमास मुक्ता भारती, गुरुनाथ सावंत, दिलीप जाधव, गजानन साळुंखे, सोनल सहस्त्रबुद्धे, उजळाईवाडीचे माजी सरपंच राजेंद्र माने, उमेश सांगळे, विलास सुवरे, आदी उपस्थित होते. ‘समर्थन’चे सहसंचालक मेकॅन्झी डाबरे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी) 'वंचितां'बाबत माध्यमांकडून समाजजागृतीची गरज‘समर्थन’च्या चर्चासत्रातील सूर : मानवी हक्क वार्ता पुरस्कार वितरण सोहळाकोल्हापूर : वंचितदेखील माणसे आहेत. त्यांना माणसांसारखे जगता आले पाहिजे. त्यासाठी माध्यमांनी वंचितांच्या प्रश्नांबाबत समाजाला जागृत करावे, असा सूर समर्थन व अभिव्यक्ती समर्थन पत्रकार संघटनेच्या चर्चासत्रात सोमवारी येथे उमटला.येथील शिवाजी उद्यमनगरमधील शेठ रामभाई सामाणी सभागृहात ‘समर्थन’तर्फे ‘वंचितांचे प्रश्न व माध्यमांची भूमिका’ या विषयावर चर्चासत्र झाले. यावेळी माजी आमदार संपतराव पवार-पाटील, ‘समर्थन’चे कार्याध्यक्ष व माजी आमदार विवेक पंडित, ‘अवनि’च्या अनुराधा भोसले, सकाळचे मुख्य संपादक श्रीराम पवार उपस्थित होते. यावेळी ‘लोकमत’चे बातमीदार संतोष मिठारी यांना २०१४ चा ‘समर्थन मानवी हक्क वार्ता पुरस्कार’ माजी आमदार पंडित यांच्या हस्ते देण्यात आला. पत्रकार महेश गावडे, शैलेश पालकर, राजू सोनवणे यांनाही पुरस्काराने सन्मानित केले.माजी आमदार पवार-पाटील म्हणाले, लोकशाही मुक्त आहे का? याचा विचार गांभीर्याने करण्याची सध्या वेळ आली आहे. निर्भयपणे लढण्याचे वातावरण संपले आहे. हे चित्र बदलण्यासाठी वंचित, असंघटित घटकांचे समाजातील स्थान बळकट होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने माध्यमांनी समाजाला जागृत करावे.‘अवनि’च्या भोसले म्हणाल्या, शिक्षण आणि जगणे याकडे एकत्रितपणे बघणे आवश्यक आहे. वंचितांच्या सक्षमीकरणासाठी ते महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने माध्यमांनी कार्यरत राहावे.माजी आमदार पंडित म्हणाले, समाजातील उत्तरदायित्व हे पूर्णपणे मोडीत निघाले आहे. सरकारी क्षेत्रातील उत्तरदायित्वाची जबाबदारी असलेली यंत्रणा निकामी झाली आहे. ती वंचितांसाठी मारक ठरत आहे. आपले हक्क मिळविण्यासह प्रश्न सोडविण्यासाठी ते संघटित नसल्याने त्यांची ताकद कमी पडते. हे लक्षात घेऊन वंचितांना न्याय देण्यासाठी त्यांचे प्रश्न मांडण्यासह त्यांच्या लढ्याला माध्यमांनी बळ द्यावे. कार्यक्रमास मुक्ता भारती, गुरुनाथ सावंत, दिलीप जाधव, गजानन साळुंखे, सोनल सहस्त्रबुद्धे, उजळाईवाडीचे माजी सरपंच राजेंद्र माने, उमेश सांगळे, विलास सुवरे, आदी उपस्थित होते. ‘समर्थन’चे सहसंचालक मेकॅन्झी डाबरे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)