शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

'वंचितां'बाबत माध्यमांकडून समाजजागृतीची गरज

By admin | Updated: May 19, 2015 00:21 IST

‘समर्थन’च्या चर्चासत्रातील सूर : मानवी हक्क वार्ता पुरस्कार वितरण सोहळा

कोल्हापूर : वंचितदेखील माणसे आहेत. त्यांना माणसांसारखे जगता आले पाहिजे. त्यासाठी माध्यमांनी वंचितांच्या प्रश्नांबाबत समाजाला जागृत करावे, असा सूर समर्थन व अभिव्यक्ती समर्थन पत्रकार संघटनेच्या चर्चासत्रात सोमवारी येथे उमटला.येथील शिवाजी उद्यमनगरमधील शेठ रामभाई सामाणी सभागृहात ‘समर्थन’तर्फे ‘वंचितांचे प्रश्न व माध्यमांची भूमिका’ या विषयावर चर्चासत्र झाले. यावेळी माजी आमदार संपतराव पवार-पाटील, ‘समर्थन’चे कार्याध्यक्ष व माजी आमदार विवेक पंडित, ‘अवनि’च्या अनुराधा भोसले, सकाळचे मुख्य संपादक श्रीराम पवार उपस्थित होते. यावेळी ‘लोकमत’चे बातमीदार संतोष मिठारी यांना २०१४ चा ‘समर्थन मानवी हक्क वार्ता पुरस्कार’ माजी आमदार पंडित यांच्या हस्ते देण्यात आला. पत्रकार महेश गावडे, शैलेश पालकर, राजू सोनवणे यांनाही पुरस्काराने सन्मानित केले.माजी आमदार पवार-पाटील म्हणाले, लोकशाही मुक्त आहे का? याचा विचार गांभीर्याने करण्याची सध्या वेळ आली आहे. निर्भयपणे लढण्याचे वातावरण संपले आहे. हे चित्र बदलण्यासाठी वंचित, असंघटित घटकांचे समाजातील स्थान बळकट होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने माध्यमांनी समाजाला जागृत करावे.‘अवनि’च्या भोसले म्हणाल्या, शिक्षण आणि जगणे याकडे एकत्रितपणे बघणे आवश्यक आहे. वंचितांच्या सक्षमीकरणासाठी ते महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने माध्यमांनी कार्यरत राहावे.माजी आमदार पंडित म्हणाले, समाजातील उत्तरदायित्व हे पूर्णपणे मोडीत निघाले आहे. सरकारी क्षेत्रातील उत्तरदायित्वाची जबाबदारी असलेली यंत्रणा निकामी झाली आहे. ती वंचितांसाठी मारक ठरत आहे. आपले हक्क मिळविण्यासह प्रश्न सोडविण्यासाठी ते संघटित नसल्याने त्यांची ताकद कमी पडते. हे लक्षात घेऊन वंचितांना न्याय देण्यासाठी त्यांचे प्रश्न मांडण्यासह त्यांच्या लढ्याला माध्यमांनी बळ द्यावे. कार्यक्रमास मुक्ता भारती, गुरुनाथ सावंत, दिलीप जाधव, गजानन साळुंखे, सोनल सहस्त्रबुद्धे, उजळाईवाडीचे माजी सरपंच राजेंद्र माने, उमेश सांगळे, विलास सुवरे, आदी उपस्थित होते. ‘समर्थन’चे सहसंचालक मेकॅन्झी डाबरे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी) 'वंचितां'बाबत माध्यमांकडून समाजजागृतीची गरज‘समर्थन’च्या चर्चासत्रातील सूर : मानवी हक्क वार्ता पुरस्कार वितरण सोहळाकोल्हापूर : वंचितदेखील माणसे आहेत. त्यांना माणसांसारखे जगता आले पाहिजे. त्यासाठी माध्यमांनी वंचितांच्या प्रश्नांबाबत समाजाला जागृत करावे, असा सूर समर्थन व अभिव्यक्ती समर्थन पत्रकार संघटनेच्या चर्चासत्रात सोमवारी येथे उमटला.येथील शिवाजी उद्यमनगरमधील शेठ रामभाई सामाणी सभागृहात ‘समर्थन’तर्फे ‘वंचितांचे प्रश्न व माध्यमांची भूमिका’ या विषयावर चर्चासत्र झाले. यावेळी माजी आमदार संपतराव पवार-पाटील, ‘समर्थन’चे कार्याध्यक्ष व माजी आमदार विवेक पंडित, ‘अवनि’च्या अनुराधा भोसले, सकाळचे मुख्य संपादक श्रीराम पवार उपस्थित होते. यावेळी ‘लोकमत’चे बातमीदार संतोष मिठारी यांना २०१४ चा ‘समर्थन मानवी हक्क वार्ता पुरस्कार’ माजी आमदार पंडित यांच्या हस्ते देण्यात आला. पत्रकार महेश गावडे, शैलेश पालकर, राजू सोनवणे यांनाही पुरस्काराने सन्मानित केले.माजी आमदार पवार-पाटील म्हणाले, लोकशाही मुक्त आहे का? याचा विचार गांभीर्याने करण्याची सध्या वेळ आली आहे. निर्भयपणे लढण्याचे वातावरण संपले आहे. हे चित्र बदलण्यासाठी वंचित, असंघटित घटकांचे समाजातील स्थान बळकट होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने माध्यमांनी समाजाला जागृत करावे.‘अवनि’च्या भोसले म्हणाल्या, शिक्षण आणि जगणे याकडे एकत्रितपणे बघणे आवश्यक आहे. वंचितांच्या सक्षमीकरणासाठी ते महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने माध्यमांनी कार्यरत राहावे.माजी आमदार पंडित म्हणाले, समाजातील उत्तरदायित्व हे पूर्णपणे मोडीत निघाले आहे. सरकारी क्षेत्रातील उत्तरदायित्वाची जबाबदारी असलेली यंत्रणा निकामी झाली आहे. ती वंचितांसाठी मारक ठरत आहे. आपले हक्क मिळविण्यासह प्रश्न सोडविण्यासाठी ते संघटित नसल्याने त्यांची ताकद कमी पडते. हे लक्षात घेऊन वंचितांना न्याय देण्यासाठी त्यांचे प्रश्न मांडण्यासह त्यांच्या लढ्याला माध्यमांनी बळ द्यावे. कार्यक्रमास मुक्ता भारती, गुरुनाथ सावंत, दिलीप जाधव, गजानन साळुंखे, सोनल सहस्त्रबुद्धे, उजळाईवाडीचे माजी सरपंच राजेंद्र माने, उमेश सांगळे, विलास सुवरे, आदी उपस्थित होते. ‘समर्थन’चे सहसंचालक मेकॅन्झी डाबरे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)