शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

'वंचितां'बाबत माध्यमांकडून समाजजागृतीची गरज

By admin | Updated: May 19, 2015 00:21 IST

‘समर्थन’च्या चर्चासत्रातील सूर : मानवी हक्क वार्ता पुरस्कार वितरण सोहळा

कोल्हापूर : वंचितदेखील माणसे आहेत. त्यांना माणसांसारखे जगता आले पाहिजे. त्यासाठी माध्यमांनी वंचितांच्या प्रश्नांबाबत समाजाला जागृत करावे, असा सूर समर्थन व अभिव्यक्ती समर्थन पत्रकार संघटनेच्या चर्चासत्रात सोमवारी येथे उमटला.येथील शिवाजी उद्यमनगरमधील शेठ रामभाई सामाणी सभागृहात ‘समर्थन’तर्फे ‘वंचितांचे प्रश्न व माध्यमांची भूमिका’ या विषयावर चर्चासत्र झाले. यावेळी माजी आमदार संपतराव पवार-पाटील, ‘समर्थन’चे कार्याध्यक्ष व माजी आमदार विवेक पंडित, ‘अवनि’च्या अनुराधा भोसले, सकाळचे मुख्य संपादक श्रीराम पवार उपस्थित होते. यावेळी ‘लोकमत’चे बातमीदार संतोष मिठारी यांना २०१४ चा ‘समर्थन मानवी हक्क वार्ता पुरस्कार’ माजी आमदार पंडित यांच्या हस्ते देण्यात आला. पत्रकार महेश गावडे, शैलेश पालकर, राजू सोनवणे यांनाही पुरस्काराने सन्मानित केले.माजी आमदार पवार-पाटील म्हणाले, लोकशाही मुक्त आहे का? याचा विचार गांभीर्याने करण्याची सध्या वेळ आली आहे. निर्भयपणे लढण्याचे वातावरण संपले आहे. हे चित्र बदलण्यासाठी वंचित, असंघटित घटकांचे समाजातील स्थान बळकट होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने माध्यमांनी समाजाला जागृत करावे.‘अवनि’च्या भोसले म्हणाल्या, शिक्षण आणि जगणे याकडे एकत्रितपणे बघणे आवश्यक आहे. वंचितांच्या सक्षमीकरणासाठी ते महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने माध्यमांनी कार्यरत राहावे.माजी आमदार पंडित म्हणाले, समाजातील उत्तरदायित्व हे पूर्णपणे मोडीत निघाले आहे. सरकारी क्षेत्रातील उत्तरदायित्वाची जबाबदारी असलेली यंत्रणा निकामी झाली आहे. ती वंचितांसाठी मारक ठरत आहे. आपले हक्क मिळविण्यासह प्रश्न सोडविण्यासाठी ते संघटित नसल्याने त्यांची ताकद कमी पडते. हे लक्षात घेऊन वंचितांना न्याय देण्यासाठी त्यांचे प्रश्न मांडण्यासह त्यांच्या लढ्याला माध्यमांनी बळ द्यावे. कार्यक्रमास मुक्ता भारती, गुरुनाथ सावंत, दिलीप जाधव, गजानन साळुंखे, सोनल सहस्त्रबुद्धे, उजळाईवाडीचे माजी सरपंच राजेंद्र माने, उमेश सांगळे, विलास सुवरे, आदी उपस्थित होते. ‘समर्थन’चे सहसंचालक मेकॅन्झी डाबरे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी) 'वंचितां'बाबत माध्यमांकडून समाजजागृतीची गरज‘समर्थन’च्या चर्चासत्रातील सूर : मानवी हक्क वार्ता पुरस्कार वितरण सोहळाकोल्हापूर : वंचितदेखील माणसे आहेत. त्यांना माणसांसारखे जगता आले पाहिजे. त्यासाठी माध्यमांनी वंचितांच्या प्रश्नांबाबत समाजाला जागृत करावे, असा सूर समर्थन व अभिव्यक्ती समर्थन पत्रकार संघटनेच्या चर्चासत्रात सोमवारी येथे उमटला.येथील शिवाजी उद्यमनगरमधील शेठ रामभाई सामाणी सभागृहात ‘समर्थन’तर्फे ‘वंचितांचे प्रश्न व माध्यमांची भूमिका’ या विषयावर चर्चासत्र झाले. यावेळी माजी आमदार संपतराव पवार-पाटील, ‘समर्थन’चे कार्याध्यक्ष व माजी आमदार विवेक पंडित, ‘अवनि’च्या अनुराधा भोसले, सकाळचे मुख्य संपादक श्रीराम पवार उपस्थित होते. यावेळी ‘लोकमत’चे बातमीदार संतोष मिठारी यांना २०१४ चा ‘समर्थन मानवी हक्क वार्ता पुरस्कार’ माजी आमदार पंडित यांच्या हस्ते देण्यात आला. पत्रकार महेश गावडे, शैलेश पालकर, राजू सोनवणे यांनाही पुरस्काराने सन्मानित केले.माजी आमदार पवार-पाटील म्हणाले, लोकशाही मुक्त आहे का? याचा विचार गांभीर्याने करण्याची सध्या वेळ आली आहे. निर्भयपणे लढण्याचे वातावरण संपले आहे. हे चित्र बदलण्यासाठी वंचित, असंघटित घटकांचे समाजातील स्थान बळकट होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने माध्यमांनी समाजाला जागृत करावे.‘अवनि’च्या भोसले म्हणाल्या, शिक्षण आणि जगणे याकडे एकत्रितपणे बघणे आवश्यक आहे. वंचितांच्या सक्षमीकरणासाठी ते महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने माध्यमांनी कार्यरत राहावे.माजी आमदार पंडित म्हणाले, समाजातील उत्तरदायित्व हे पूर्णपणे मोडीत निघाले आहे. सरकारी क्षेत्रातील उत्तरदायित्वाची जबाबदारी असलेली यंत्रणा निकामी झाली आहे. ती वंचितांसाठी मारक ठरत आहे. आपले हक्क मिळविण्यासह प्रश्न सोडविण्यासाठी ते संघटित नसल्याने त्यांची ताकद कमी पडते. हे लक्षात घेऊन वंचितांना न्याय देण्यासाठी त्यांचे प्रश्न मांडण्यासह त्यांच्या लढ्याला माध्यमांनी बळ द्यावे. कार्यक्रमास मुक्ता भारती, गुरुनाथ सावंत, दिलीप जाधव, गजानन साळुंखे, सोनल सहस्त्रबुद्धे, उजळाईवाडीचे माजी सरपंच राजेंद्र माने, उमेश सांगळे, विलास सुवरे, आदी उपस्थित होते. ‘समर्थन’चे सहसंचालक मेकॅन्झी डाबरे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)