शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

राज्याच्या विकासासाठी नवक्रांती हवी

By admin | Updated: March 3, 2015 23:02 IST

माधव भंडारी : काँग्रेसने आता अधोगतीचे अपश्रेयही घ्यावे

इस्लामपूर : महाराष्ट्रात सामाजिक, राजकीय, आर्थिक, कृषी अशा सर्व क्षेत्रातील क्रांतीची सुरुवात झाली. मात्र मध्येच वाट चुकल्याने भ्रांतीत गेलो. या भ्रांतीतून बाहेर पडून महाराष्ट्राला पुन्हा घडविण्यासाठी क्रांतीची वाट धरली पाहिजे, असे प्रतिपादन भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केले. काँग्रेसने ५५ वर्षांच्या सत्ताकाळात अनेक धोरणे व योजना राबवून प्रगतीचे श्रेय घेतले, आता अधोगतीचे अपश्रेयही त्यांनीच घ्यायला हवे, अशी टीकाही त्यांनी केली.येथील सार्वजनिक तालुका वाचनालयाच्या वसंत व्याख्यानमालेत ‘महाराष्ट्र असा असावा... असा घडवावा’ या विषयावर भंडारी बोलत होते. दीनानाथ लाड यांनी स्वागत केले. संजय भागवत, नरेंद्र मंद्रुपकर यांची उपस्थिती होती.भंडारी म्हणाले की, आर्थिक विषमता, बेरोजगारी व सामाजिक असुरक्षितता ही महाराष्ट्रापुढची आव्हाने आहेत. विकासाच्या विरोधातल्या निकषांवर वाढत गेलो. राज्यात गुन्हेगारी, बेरोजगारी व शेती सोडणाऱ्यांची संख्या वाढत गेली. त्यातून समतोल विकासाच्या मुद्द्यांवर महाराष्ट्र मागे पडला. अशावेळी विदर्भ वेगळा करण्याची मागणी होते. मुंबई, ठाणे, नाशिक परिसर सोडला की, दरडोई उत्पन्न घसरते. रेल्वेचे जाळे दिसत नाही. विदर्भात विकासाचे वाळवंट, तर कोकणात विकास शोधावा लागतो. मराठवाड्यातही तीच परिस्थिती आहे. सुशिक्षित, अल्पशिक्षित व अशिक्षितांची बेरोजगारी हे चिंतेचे विषय आहेत. या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना विश्वासार्ह रोजगाराची संधी दिली पाहिजे. पोट भरण्याची संधी मिळाली, तर तो माणूस पुढच्या विकासाचे पाऊल टाकेल. या सर्वातून शेतीला बाजूला करता येणार नाही. शेतीमधील पूर्ण सामर्थ्य वापरले, तर हे शक्य आहे.प्रादेशिक असमतोल हा राजकीय प्रश्न आहे. ज्याच्याकडे दमडीसुध्दा नाही, त्याला संपत्ती कमावण्याचा अधिकार मिळावा, असे वातावरण तयार करावे लागेल. मोडकळीस आलेले उद्योग उभे करावे लागतील. पंतप्रधान मोदींनी ‘मेक इन इंडिया’चे धोरण जाहीर केले आहे. त्यासाठीची गुणवत्ता, कौशल्ये महाराष्ट्राकडे आहेत. प्रचंड साधनसामग्री आहे. या सर्वांचा वापर झाल्यास उत्पादकता क्षेत्र विस्तारेल. शेतीखालोखाल रोजगार देण्याची क्षमता या क्षेत्रात आहे. एकूणच रोजगार क्षेत्रातील ६५ टक्के रोजगार शेतीमधून संतुलित होईल. यामध्ये भरीव काम झाले, तर उद्यमशील महाराष्ट्र उभा राहील, असे भंडारी यांनी स्पष्ट केले.यावेळी माजी आमदार भगवानराव साळुंखे, बाबा सूर्यवंशी, सदाभाऊ खोत, विक्रमभाऊ पाटील, नगरसेवक विजय कुंभार, माजी नगराध्यक्षा सौ. अरुणादेवी पाटील, अ‍ॅड. बी. डी. पाटील, अ‍ॅड. बी. एस. पाटील, डॉ. सौ. जिज्ञा शहा, राजेश मंत्री, जयंत भागवत, संजय ढोबळे-पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)