शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
2
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
3
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
4
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
5
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
6
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
7
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
8
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
9
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
10
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
11
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
12
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
13
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
14
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
15
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
16
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
17
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
18
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
19
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
20
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?

राज्याच्या विकासासाठी नवक्रांती हवी

By admin | Updated: March 3, 2015 23:02 IST

माधव भंडारी : काँग्रेसने आता अधोगतीचे अपश्रेयही घ्यावे

इस्लामपूर : महाराष्ट्रात सामाजिक, राजकीय, आर्थिक, कृषी अशा सर्व क्षेत्रातील क्रांतीची सुरुवात झाली. मात्र मध्येच वाट चुकल्याने भ्रांतीत गेलो. या भ्रांतीतून बाहेर पडून महाराष्ट्राला पुन्हा घडविण्यासाठी क्रांतीची वाट धरली पाहिजे, असे प्रतिपादन भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केले. काँग्रेसने ५५ वर्षांच्या सत्ताकाळात अनेक धोरणे व योजना राबवून प्रगतीचे श्रेय घेतले, आता अधोगतीचे अपश्रेयही त्यांनीच घ्यायला हवे, अशी टीकाही त्यांनी केली.येथील सार्वजनिक तालुका वाचनालयाच्या वसंत व्याख्यानमालेत ‘महाराष्ट्र असा असावा... असा घडवावा’ या विषयावर भंडारी बोलत होते. दीनानाथ लाड यांनी स्वागत केले. संजय भागवत, नरेंद्र मंद्रुपकर यांची उपस्थिती होती.भंडारी म्हणाले की, आर्थिक विषमता, बेरोजगारी व सामाजिक असुरक्षितता ही महाराष्ट्रापुढची आव्हाने आहेत. विकासाच्या विरोधातल्या निकषांवर वाढत गेलो. राज्यात गुन्हेगारी, बेरोजगारी व शेती सोडणाऱ्यांची संख्या वाढत गेली. त्यातून समतोल विकासाच्या मुद्द्यांवर महाराष्ट्र मागे पडला. अशावेळी विदर्भ वेगळा करण्याची मागणी होते. मुंबई, ठाणे, नाशिक परिसर सोडला की, दरडोई उत्पन्न घसरते. रेल्वेचे जाळे दिसत नाही. विदर्भात विकासाचे वाळवंट, तर कोकणात विकास शोधावा लागतो. मराठवाड्यातही तीच परिस्थिती आहे. सुशिक्षित, अल्पशिक्षित व अशिक्षितांची बेरोजगारी हे चिंतेचे विषय आहेत. या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना विश्वासार्ह रोजगाराची संधी दिली पाहिजे. पोट भरण्याची संधी मिळाली, तर तो माणूस पुढच्या विकासाचे पाऊल टाकेल. या सर्वातून शेतीला बाजूला करता येणार नाही. शेतीमधील पूर्ण सामर्थ्य वापरले, तर हे शक्य आहे.प्रादेशिक असमतोल हा राजकीय प्रश्न आहे. ज्याच्याकडे दमडीसुध्दा नाही, त्याला संपत्ती कमावण्याचा अधिकार मिळावा, असे वातावरण तयार करावे लागेल. मोडकळीस आलेले उद्योग उभे करावे लागतील. पंतप्रधान मोदींनी ‘मेक इन इंडिया’चे धोरण जाहीर केले आहे. त्यासाठीची गुणवत्ता, कौशल्ये महाराष्ट्राकडे आहेत. प्रचंड साधनसामग्री आहे. या सर्वांचा वापर झाल्यास उत्पादकता क्षेत्र विस्तारेल. शेतीखालोखाल रोजगार देण्याची क्षमता या क्षेत्रात आहे. एकूणच रोजगार क्षेत्रातील ६५ टक्के रोजगार शेतीमधून संतुलित होईल. यामध्ये भरीव काम झाले, तर उद्यमशील महाराष्ट्र उभा राहील, असे भंडारी यांनी स्पष्ट केले.यावेळी माजी आमदार भगवानराव साळुंखे, बाबा सूर्यवंशी, सदाभाऊ खोत, विक्रमभाऊ पाटील, नगरसेवक विजय कुंभार, माजी नगराध्यक्षा सौ. अरुणादेवी पाटील, अ‍ॅड. बी. डी. पाटील, अ‍ॅड. बी. एस. पाटील, डॉ. सौ. जिज्ञा शहा, राजेश मंत्री, जयंत भागवत, संजय ढोबळे-पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)