शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
3
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
4
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
5
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
6
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
7
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
8
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
9
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
10
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
11
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
12
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
13
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
14
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
15
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
16
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
17
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
18
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
20
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 

ऐतिहासिक चित्रपट बनवताना मर्यादेचे भान आवश्यक : सुभाष घई, कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पत्रकारांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 18:21 IST

आपण ऐतिहासिक आणि पौराणिक कथा ऐकत मोठे झाले, त्या संस्कारात वाढलो. त्यामुळे ऐतिहासिक घटनांवर आधारित चित्रपटांची निर्मिती करताना त्यातील प्रतिमांना धक्का न लावता मर्यादेचे भान राखा असा सल्ला ज्येष्ठ दिग्दर्शक सुभाष घई यांनी गुरूवारी दिला. कोल्हापुरातील शाहु स्मारक भवनात आयोजित कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त कोल्हापूर दौºयावर आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कलामहर्षि बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी, सचिव दिलीप बापट उपस्थित होते.

ठळक मुद्देसुभाष घई यांचा कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात संवाद ऐतिहासिक चित्रपट बनवताना मर्यादेचे भान आवश्यक : घई

कोल्हापूर : आपण ऐतिहासिक आणि पौराणिक कथा ऐकत मोठे झाले, त्या संस्कारात वाढलो. त्यामुळे ऐतिहासिक घटनांवर आधारित चित्रपटांची निर्मिती करताना त्यातील प्रतिमांना धक्का न लावता मर्यादेचे भान राखा असा सल्ला ज्येष्ठ दिग्दर्शक सुभाष घई यांनी गुरूवारी दिला.कोल्हापुरातील शाहु स्मारक भवनात आयोजित कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कलामहर्षि बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी, सचिव दिलीप बापट उपस्थित होते.सुभाष घई म्हणाले, चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे नव्हे तर जागृतीचे सशक्त माध्यम आहे. भारतीय संस्कृतीत मर्यादा आणि संस्कांचे अनन्य साधारण महत्व असल्याने आपला देश विविधतेने नटला आहे. व्यक्ती, जाती, धर्म आणि विचारांची भिन्नता असणे स्वाभाविक आहे. 

दिग्दर्शक एक कथा चित्रपटातून रसिकांपुढे मांडत असतो. पण ती कथा जेंव्हा इतिहासातील सत्य घटनेवर आधारित असते तेंव्हा वैयक्तिक न राहता समाजावर परिणामकारक असते. त्यामुळे सत्य घटना सांगण्यासाठी मनोरंजनांचा आधार घेतला गेला किंवा दिग्दर्शकाने स्वत:ची कल्पना त्यात वापरली तरी ती एका मर्यादेत राहिली पाहीजे.

आपल्या कलाकृतीमुळे एखाद्याचे समाधानच होणार नसेल तो विषयच हाताळू नये. मात्र लोकही चित्रपट पाहण्याआधीच तर्क आणि निर्णय लावून मोकळे होतात. प्रत्येक क्षेत्रात चांगल्या वाईट गोष्टी घडत असतात. चांगले चित्रपट यादगार बनतात.युट्युबसारख्या सोशल मिडियावर थेट प्रसारित होणाऱ्या चित्रपटांबद्दल ते म्हणाले, हे माध्यमे तर चित्रपटांचे भविष्य आहेत. नव्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण कलाकृती जगासमोर नेऊ शकतो. माध्यम कोणताही असो त्याचा महोत्सव झाला पाहीजे. रसिकांना, अभ्यासकांना आणि यात करिअर करू इच्छिणाऱ्यांना त्याचे ज्ञान मिळाले पाहीजे.

राम गबाले माझे गुरू...यावेळी त्यांनी कोल्हापूरबद्दल विशेष कोतुकोदगार काढले. ते म्हणाले, मी व्ही. शांताराम यांचे चित्रपट पाहत मोठा झालो. राम गबाले हे तर माझे गुरू होते. मी या क्षेत्रात प्रगती करू शकलो त्यात मराठी चित्रपटांचा मोठा वाटा आहे.

भारतीय सिनेमात कलामहर्षि बाबूराव पेंटर यांच्यासह अनेक कोल्हापूरकरांनी मोलाचे योगदान दिले आहे. आजच्या पिढीला याबद्दल अज्ञान आहे, त्यांना पुन्हा या क्षेत्राकडे वळवायचे असेल तर किफ्फ सारखे चित्रपट महोत्सव झाले पाहीजे. मी आजवर तीन मराठी चित्रपट बनवले आहेत त्यातील संहिता या किफ्फमध्ये प्रदर्शित होत आहे.

स्वत:मधले गुण ओळखा..यावेळी झालेल्या कार्यशाळेत त्यांनी तरुणाईला स्वत:मधील गुण ओळखून करीअरची वाट निवडण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, शाळा, महाविद्यालयांमधले पुस्तकी ज्ञान मिळाले की चांगली नोकरी मिळते यासाठी शिकू नका, तर त्यासोबत कलेचे कौशल्यही आत्मसात करा.

आवडीच्या क्षेत्रात सिनेमा पाहिले की मुलं बिघडतात या विचारसरणीच्या सामान्य कुटूंबातून मी या क्षेत्रात आलो आणि यशस्वी झालो. त्यामुळे स्वप्न बघा आणि ते पूर्ण करण्यासाठी स्वत:ला वेळ द्या. शॉर्टकटने काहिही मिळणार नाही. यश मिळवण्यासाठी संघर्ष करावाच लागेल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरentertainmentकरमणूक