शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

‘दौलत’साठी एकत्र येण्याची गरज

By admin | Updated: March 2, 2015 00:02 IST

सुनील शिंत्रे : ‘दौलत’ बचाव संघर्ष समितीचा शेतकरी, कामगार मेळावा

चंदगड : दौलत कारखाना विकत घ्यायला बरेच लोक तयार आहेत; पण बंद कारखाना चालू करायला कोणीही पुढे येत नाही. ही चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांची व कामगारांची शोकांतिका आहे. न्यायालयीन आणि रस्त्यावरील दोन्ही लढाया एकाचवेळी लढण्याची वेळ आहे. यासाठी सर्वांनी वेळ काढून दौलत हे घरचे कार्य समजून एकत्र येण्याचे आवाहन आजरा कारखान्याचे संचालक प्रा. सुनील शिंत्रे यांनी केले. हलकर्णी (ता. चंदगड) येथील कारखाना कार्यस्थळावर दौलत बचाव संघर्ष समितीच्यावतीने बोलावण्यात आलेल्या शेतकरी, कामगार मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. सुभाष जाधव होते.विजय पाटील यांनी प्रास्ताविक करून केवळ राजकारणासाठी दौलतचा वापर करणारे व सत्ता भोगणाऱ्यांनी शेतकरी व कामगारांना दु:खाच्या खाईत लोटले आहे. त्यांना आता त्यांची जागा दाखविण्याची वेळ आल्याचे सांगितले.प्रा. शिंत्रे पुढे म्हणाले, रस्त्यावरील चळवळ उभी केली, तर त्याला ठरावीक वेळेत यश आले पाहिजे, अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभे राहिल्यास एव्हीएच हटेल व दौलत सुरू होईल. यासाठी आपले सर्व स्तरावर सहकार्य असल्याचे सांगितले.यावेळी प्रा. सुभाष जाधव म्हणाले, दौलतच्या संचालक मंडळाला कारखाना सुरू करण्यासाठी भरपूर संधी दिली. त्यांच्यावरून गेल्या चार वर्षांत काहीही हालचाल झालेली नाही. त्यामुळे आंदोलन यशस्वी करण्यासाठी वेगळी रणनीती ठरवावी लागेल. केंद्रीय कृषीमंत्री, केंद्रीय सचिव व सहकारमंत्री यांची भेट घेऊन दौलतवर प्रशासक आणण्यासंदर्भात विचार करावा लागणार आहे. दिलेला प्रशासक हा शेतकरी व कामगारांचा विचार करणारा असावा. आजी-माजी संचालकांची चौकशी करून त्यांच्यावर कर्जाची जबाबदारी निश्चित करून फौजदारी दाखल करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून आमदार, खासदार यांचेही सहकार्य घेऊ, असे सांगितले. यावेळी आंदोलन किंवा संतप्त झालेल्या कामगार व शेतकऱ्यांनी आणखी किती वर्षे आंदोलन करायचे? ज्यांनी दौलत लुटली ते दौलतकडे ढुंकूनही बघायला तयार नाहीत. ते उजळमाथ्याने समाजात फिरत आहेत. त्यांना दहशत दाखवून राजीनाम्याला प्रवृत्त करावे लागेल, असे मत हणमंत पाटील, दत्तू कडोलकर यांनी मांडले. यावेळी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न डॉ. जाधव यांनी करताच अ‍ॅड. संतोष मळवीकर यांनी त्यांना विरोध करत गांधी मार्गाने आंदोलन करून ‘दौलत’चा प्रश्न सुटणार नाही, तीन वर्षे आंदोलन करूनही निर्ढावलेले संचालक मंडळ दौलत सुरू करण्याला असमर्थ ठरले आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेणे हे पहिले काम आहे. गोपाळराव पाटील व संचालकांनी शनिवारपर्यंत राजीनामे न दिल्यास सोमवारी त्यांच्या घरी जाऊन किंवा कोठेही भेटतील तेथे राजीनामे घेऊया, असे सांगताच त्याला कामगार व शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला. यावेळी एस. एम. कोले, नारायण धामणेकर, दिवाकर पाटील, कृष्णा रेगडे, प्रा. आबासाहेब चौगुले यांनीही मार्गदर्शन केले. कॉम्रेड आण्णा शिंदे, सतीश सबनीस, शिवसेना तालुकाप्रमुख महादेव गावडे, प्रभाकर खांडेकर, जे. जी. पाटील, अर्जुन कुंभार, धोंडिबा रोकडे, सुरेश हरेर, महादेव फाटक, आदी उपस्थित होते.