शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

‘दौलत’साठी एकत्र येण्याची गरज

By admin | Updated: March 2, 2015 00:02 IST

सुनील शिंत्रे : ‘दौलत’ बचाव संघर्ष समितीचा शेतकरी, कामगार मेळावा

चंदगड : दौलत कारखाना विकत घ्यायला बरेच लोक तयार आहेत; पण बंद कारखाना चालू करायला कोणीही पुढे येत नाही. ही चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांची व कामगारांची शोकांतिका आहे. न्यायालयीन आणि रस्त्यावरील दोन्ही लढाया एकाचवेळी लढण्याची वेळ आहे. यासाठी सर्वांनी वेळ काढून दौलत हे घरचे कार्य समजून एकत्र येण्याचे आवाहन आजरा कारखान्याचे संचालक प्रा. सुनील शिंत्रे यांनी केले. हलकर्णी (ता. चंदगड) येथील कारखाना कार्यस्थळावर दौलत बचाव संघर्ष समितीच्यावतीने बोलावण्यात आलेल्या शेतकरी, कामगार मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. सुभाष जाधव होते.विजय पाटील यांनी प्रास्ताविक करून केवळ राजकारणासाठी दौलतचा वापर करणारे व सत्ता भोगणाऱ्यांनी शेतकरी व कामगारांना दु:खाच्या खाईत लोटले आहे. त्यांना आता त्यांची जागा दाखविण्याची वेळ आल्याचे सांगितले.प्रा. शिंत्रे पुढे म्हणाले, रस्त्यावरील चळवळ उभी केली, तर त्याला ठरावीक वेळेत यश आले पाहिजे, अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभे राहिल्यास एव्हीएच हटेल व दौलत सुरू होईल. यासाठी आपले सर्व स्तरावर सहकार्य असल्याचे सांगितले.यावेळी प्रा. सुभाष जाधव म्हणाले, दौलतच्या संचालक मंडळाला कारखाना सुरू करण्यासाठी भरपूर संधी दिली. त्यांच्यावरून गेल्या चार वर्षांत काहीही हालचाल झालेली नाही. त्यामुळे आंदोलन यशस्वी करण्यासाठी वेगळी रणनीती ठरवावी लागेल. केंद्रीय कृषीमंत्री, केंद्रीय सचिव व सहकारमंत्री यांची भेट घेऊन दौलतवर प्रशासक आणण्यासंदर्भात विचार करावा लागणार आहे. दिलेला प्रशासक हा शेतकरी व कामगारांचा विचार करणारा असावा. आजी-माजी संचालकांची चौकशी करून त्यांच्यावर कर्जाची जबाबदारी निश्चित करून फौजदारी दाखल करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून आमदार, खासदार यांचेही सहकार्य घेऊ, असे सांगितले. यावेळी आंदोलन किंवा संतप्त झालेल्या कामगार व शेतकऱ्यांनी आणखी किती वर्षे आंदोलन करायचे? ज्यांनी दौलत लुटली ते दौलतकडे ढुंकूनही बघायला तयार नाहीत. ते उजळमाथ्याने समाजात फिरत आहेत. त्यांना दहशत दाखवून राजीनाम्याला प्रवृत्त करावे लागेल, असे मत हणमंत पाटील, दत्तू कडोलकर यांनी मांडले. यावेळी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न डॉ. जाधव यांनी करताच अ‍ॅड. संतोष मळवीकर यांनी त्यांना विरोध करत गांधी मार्गाने आंदोलन करून ‘दौलत’चा प्रश्न सुटणार नाही, तीन वर्षे आंदोलन करूनही निर्ढावलेले संचालक मंडळ दौलत सुरू करण्याला असमर्थ ठरले आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेणे हे पहिले काम आहे. गोपाळराव पाटील व संचालकांनी शनिवारपर्यंत राजीनामे न दिल्यास सोमवारी त्यांच्या घरी जाऊन किंवा कोठेही भेटतील तेथे राजीनामे घेऊया, असे सांगताच त्याला कामगार व शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला. यावेळी एस. एम. कोले, नारायण धामणेकर, दिवाकर पाटील, कृष्णा रेगडे, प्रा. आबासाहेब चौगुले यांनीही मार्गदर्शन केले. कॉम्रेड आण्णा शिंदे, सतीश सबनीस, शिवसेना तालुकाप्रमुख महादेव गावडे, प्रभाकर खांडेकर, जे. जी. पाटील, अर्जुन कुंभार, धोंडिबा रोकडे, सुरेश हरेर, महादेव फाटक, आदी उपस्थित होते.