शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

दुग्धजन्य पदार्थात भेसळ करणाऱ्यांवर कारवाईची गरज, कुरुंदवाड येथे शाळेत विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याने भेसळीचा प्रश्न चर्चेत  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 15:45 IST

निवासी सैनिकी पॅटर्न शाळेतील विद्यार्थ्यांना दुपारच्या जेवणानंतर विद्यार्थ्यांसह शिक्षक, कर्मचारी अशा सुमारे ४० जणांना विषबाधा

गणपती कोळीकुरुंदवाड : येथील सैनिकी पॅटर्न निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याने शहर व परिसरातील दुग्धजन्य पदार्थांच्या भेसळीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. बासुंदी खाल्ल्याने विषबाधा झाली असताना अन्न व औषध प्रशासन अधिकारी भेसळीचा शोध घेण्याऐवजी तीव्र तापमानाचे कारण सांगून दुग्धजन्य पदार्थ करणाऱ्या भेसळखोरांना एक प्रकारे क्लीनचीट दिली जात आहे. त्यामुळे पालकांसह नागरिकांतून संताप व्यक्त होत असून, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ खेळणाऱ्या भेसळखोरांचा शोध घेऊन कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.येथील निवासी सैनिकी पॅटर्न शाळेतील विद्यार्थ्यांना रविवारी दुपारच्या जेवणानंतर विद्यार्थ्यांसह शिक्षक, कर्मचारी अशा सुमारे ४० जणांना विषबाधा झाली होती. बाधित विद्यार्थी व कर्मचारी यांंच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून, धोका टळला आहे. जेवणात बासुंदी असल्याने बासुंदी खाऊन पाणी प्यायल्याने तसेच उच्च तापमान यामुळे डीहायड्रेशन झाल्याचा अंदाज शाळा व्यवस्थापन, वैद्यकीय अधिकारी करत आहेत.या घटनेनंतर जिल्ह्यातील जिल्हा परिषद वैद्यकीय यंत्रणा सतर्क होऊन वैद्यकीय सेवा पुरवित आहेत. शाळा व्यवस्थापनाने वेळीच उपचार केल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा धोका टळला आहे. सोमवारी अन्न व औषध प्रशासन अधिकारी महेश मासाळ यांनी रुग्णालयात जाऊन घटनेचा पंचनामा केला.  टोळी सक्रिय असल्याची चर्चाशहर व परिसरात दूध, खवा, बासुंदीसह इतर दुग्धजन्य पदार्थांची भेसळ सर्रासपणे सुरू आहे. यापूर्वी अनेकदा भेसळीचे प्रकार या परिसरात उघडकीस आले आहेत. मात्र, अन्न व औषध प्रशासनाच्या जुजबी कारवाईमुळे अद्याप भेसळीचे प्रमाण सुरूच आहे. भेसळीतून जादा कमाई करण्यासाठी दुग्धजन्य पदार्थ करणारी टोळी सक्रिय आहे. त्यामुळे अशा भेसळखोरांचा शोध घेऊन भेसळ करण्याचे धाडस पुन्हा होऊ नये, अशी कारवाई करणे गरजेचे आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmilkदूध