शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

पॅकेजसाठी राष्ट्रवादीचा विराट मोर्चा

By admin | Updated: June 7, 2015 01:26 IST

पोलिसांचा हस्तक्षेप : मोर्चाच्यावतीने हॉकी स्टेडियम कार्यालयात चंद्रकांतदादांनी निवेदन स्वीकारले

कोल्हापूर : राज्य सरकारने साखर कारखान्यांना जाहीर केलेले दोन हजार कोटींचे पॅकेज त्वरित द्यावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शनिवारी कोल्हापुरात मोर्चा काढला. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या घरावर मोर्चाचे नियोजन केले होते; पण पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने ‘यू’ टर्न घेत मोर्चा हॉकी स्टेडियमकडे वळविण्यात आला. तेथे मंत्री पाटील व आंदोलनकर्त्यांमध्ये चर्चा झाली. दोन हजार कोटींचे पॅकेज विनाअट सरकारने द्यावे, अशी मागणी करीत राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी सरकारला ३१ मेची डेडलाईन देत पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. तरीही पॅकेज दिले नसल्याने शनिवारी निर्माण चौक, संभाजीनगरपासून पालकमंत्री पाटील यांच्या घरावर मोर्चा काढण्याचे नियोजन राष्ट्रवादीने केले होते. या मोर्चाला भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रतिमोर्चाचे आव्हान दिल्याने जिल्ह्णातील वातावरण चांगले तापले होते. शनिवारी सकाळी दहापासून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मैलखड्डा येथील मैदानावर एकत्रित येत होते. दुपारी साडेबारा वाजता मेळाव्यास सुरुवात झाली. यावेळी केंद्र व राज्य सरकारवर सडकून टीका करताना आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, शेतकऱ्यांचे हजार कोटी रुपयांची ऊस बिले अडकली आहेत. जूनअखेर कर्ज परत केले, तर नवीन कर्ज मिळणार आहे, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला असताना केवळ आश्वासनापलीकडे सरकार काहीच करत नाही. धनगर समाजाचे आरक्षण, एलबीटी, टोल यांसह प्रत्येक गोष्टीत सरकारने जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत. काळ््या पैशांतून प्रत्येक नागरिकाच्या खात्यात १५ लाख रुपये देण्याची घोषणाही मोदी सरकारने केली होती. फसवणूक करून सत्तेवर आलेल्या सरकारला धडा शिकविण्याची वेळ आली आहे. पॅकेजबाबत केवळ निवेदन देऊन चालणार नाही. ठोस आश्वासन घेतल्याशिवाय कोल्हापूर सोडायचे नाही. प्रसंगी शहरातील वाहतूक ठप्प करावी लागली तरी बेहत्तर, शेतकऱ्यांसाठी गोळ्या छातीवर घेण्याची तयारी करूनच आम्ही येथे आल्याचा इशाराही त्यांनी दिला. खासदार धनंजय महाडिक, के. पी. पाटील, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, भैया माने, धैर्यशील पाटील, व्यंकाप्पा भोसले, प्रा. किशन चौगले यांनी मनोगत व्यक्त केले. आमदार संध्यादेवी कुपेकर, निवेदिता माने, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, आर. के. पोवार, ‘गोकुळ’चे संचालक विलास कांबळे, प्रवीणसिंह पाटील, नामदेवराव भोईटे, राजेंद्र पाटील-यड्रावकर, मधुकर जांभळे, आदील फरास, आदी उपस्थित होते. त्यानंतर दुपारी सव्वा दोन वाजता मेळाव्याच्या ठिकाणाहून मोर्चा निघाला. निर्माण चौकातच पोलिसांनी मोर्चा अडवून हॉकी स्टेडियमकडे वळविला. चौकात मोर्चा थांबवून आमदार मुश्रीफ, खासदार महाडिक, निवेदिता माने, आमदार कुपेकर, ए. वाय. पाटील, के. पी. पाटील आदींचे शिष्टमंडळ स्टेडियमच्या कार्यालयात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या भेटीला गेले. राष्ट्रवादी ‘नंबर वन’च! घरावर मोर्चा काढणार म्हटल्यावर काहीतरी कारण सांगून दादा पळ काढत आहेत. त्यांच्या घरासमोर दोनशे कार्यकर्ते असल्याचे कळले. आमचे वीस हजार आहेत. राष्ट्रवादीची ताकद कोणी अजमावण्याचा प्रयत्न करू नये. अजूनही राष्ट्रवादी जिल्ह्यात ‘नंबर वन’च असल्याचा टोला मुश्रीफ यांनी हाणला. म्हणूनच मोर्चा शिवाजी महाराज स्वारीवर जाताना पिकांच्या देठालाही कोणाला हात लावू देत नव्हते. आता शेतकरी हवालदिल झाला आहे, या दिवसाची आठवण राज्यकर्त्यांना व्हावी, यासाठीच शिवराज्याभिषेकादिवशी मोर्चा काढल्याचे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. साखरेचं पोतं सुईनं उसवलं... साखर कारखान्यांना राज्य सरकारने दोन हजार कोटी रुपयांचे पॅकेज द्यावे, तेही बिनव्याजी, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. गतवर्षी केंद्रात भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आले; पण त्यांनी राज्य सरकारला या पॅकेजबद्दल मदतीचा हात दिलेला नाही. त्यामुळे त्यांनी ‘साखरेचं पोतं सुईनं उसवलं आणि मोदी सरकारनं शेतकऱ्यांना फसवलं,’ असे सरकारचे वर्णन केले.(प्रतिनिधी)