शहरं
Join us  
Trending Stories
1
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
2
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
3
आजचे राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२५, अचानक धनलाभ संभवतो, नोकरीतील वातावरण अनुकूल राहील
4
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
5
Air Pollution: राजधानी दिल्ली ठरले जगातील सर्वात प्रदूषित शहर, शाळा-महाविद्यालयांतील क्रीडा उपक्रम बंद ठेवण्याचे आदेश
6
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
7
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
8
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
9
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
10
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
11
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
12
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
13
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
14
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
15
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
16
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
17
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
18
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
19
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
20
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचे मिशन विधानसभा सुरू : शनिवारी मुंबईत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 11:22 IST

लोकसभा निवडणुकीची राज्यातील रणधुमाळी संपल्यावर लगेचच राष्ट्रवादीने विधानसभेसाठी जोर-बैठका सुरू केल्या आहेत. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी राज्यस्तरीय आढावा बैठकीचे नियोजन केले असून, तसे निरोप जिल्हा, तालुका पातळीवर पोहोचही झाले आहेत. येत्या उद्या, शनिवारी सकाळी ११ वाजता मुंबईत पक्षाच्या कार्यालयात होणाऱ्या या बैठकीत आजी-माजी आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष, जिल्हा कार्याध्यक्ष, विविध सेलचे पदाधिकारी या सर्वांना बैठकीचे बोलावणे धाडण्यात आले आहे.

ठळक मुद्देराष्ट्रवादी कार्यालयात शरद पवार मार्गदर्शन करणारराज्यातील आजी-माजी खासदार, आमदारासह पदाधिकाऱ्यांना निरोप

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीची राज्यातील रणधुमाळी संपल्यावर लगेचच राष्ट्रवादीने विधानसभेसाठी जोर-बैठका सुरू केल्या आहेत. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी राज्यस्तरीय आढावा बैठकीचे नियोजन केले असून, तसे निरोप जिल्हा, तालुका पातळीवर पोहोचही झाले आहेत. येत्या उद्या, शनिवारी सकाळी ११ वाजता मुंबईत पक्षाच्या कार्यालयात होणाऱ्या या बैठकीत आजी-माजी आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष, जिल्हा कार्याध्यक्ष, विविध सेलचे पदाधिकारी या सर्वांना बैठकीचे बोलावणे धाडण्यात आले आहे.विधानसभा निवडणूक सहा महिन्यांवर आल्याने लोकसभा निवडणुकीतच विधानसभेच्या प्रचाराचे नारळ सर्वच पक्षांतील विद्यमान व इच्छुकांनी फोडले आहेत. स्वत: पवार यांनी तर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला आहे. निवडणुकीचा चौथा टप्पा संपल्यानंतर लागलीच पवार हे राज्यभर दुष्काळ दौऱ्याच्या निमित्ताने फिरत आहेत.

या दौऱ्याच्या अनुषंगाने नापिकी, पाणीटंचाई, चार छावण्या हा विषय त्यांनी सातत्याने लावून धरला आहे. शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी आणि दुष्काळ हे तीन विषय आगामी विधानसभा निवडणुकीत तापण्याची चिन्हे असल्याने आतापासून वातावरण निर्मिती करण्याचे काम पवार यांनी हाती घेतले आहे.शनिवारी होणाऱ्या या आढावा बैठकीत लोकसभा निवडणुकीतील कामगिरीचा लेखाजोखा घेण्याबरोबरच भविष्यात विधानसभेला सामोरे जाताना पक्षाची कोणती दिशा असणार आहे, याचा आढावा घेतला जाणार आहे. लोकसभेला कोणी कोणाला मदत केली, याचा हिशेब मांडला जाणार आहे.

शिवाय प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे पुढील काळात उमेदवारीचा घोळही निर्माण होणार आहे, याचा कानोसा या बैठकीच्या निमित्ताने घेतला जाणार आहे. या बैठकीच्या निमित्ताने एकप्रकारे निवडणुकीचे रणशिंगच फुंकले जाणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 

 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसkolhapurकोल्हापूर