शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
4
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
5
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
6
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
7
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
8
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
9
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
10
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
11
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
12
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
13
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
14
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
15
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
16
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
17
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
18
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
19
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
20
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!

पक्षांतर्गत कुरघोडीमुळे राष्ट्रवादीने कारखाना गमावला

By admin | Updated: May 25, 2016 23:27 IST

वाऱ्याचे रूपांतर वादळात : निवडणूक ठरली बदलत्या समीकरणाची नांदी; आगामी निवडणुकांत राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढणार

ज्योतीप्रसाद सावंत --आजरागत पंचवार्षिक निवडणुकीत समविचारी पक्ष व संघटनांच्या मदतीने सत्तांतर घडविण्यात यशस्वी झालेल्या राष्ट्रवादीने या निवडणुकीत मात्र अंतर्गत गटबाजी थेट चव्हाट्यावर आणत पक्षातील काही मंडळींना ते पक्षापासून बाजूला कसे होतील, याची फिल्डिंग लावल्यामुळे पक्षाचे नुकसान होणार नाही, असा निष्कर्षही काढला; पण पक्षातून बाजूला झालेल्या अशोकअण्णा चराटी व विष्णुपंत केसरकर यांनी सेना-भाजप व स्वाभिमानीच्या मदतीने तयार केलेल्या वाऱ्याचे वादळात रूपांतर झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर कारखाना गमाविण्याची वेळ आली. महाआघाडीची सत्ता राष्ट्रवादीच्या आर्थिक नाड्या आवळणारी तर ठरलीच; पण त्याचबरोबर आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीसह विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढविणारी ठरणार आहे. ‘आजरा’ साखर कारखान्यासाठी जिल्हा बँकेचे संचालक अशोकअण्णा चराटी यांनी निवडणुकीची चाचपणी सुरू केली होती. या चाचपणीत आपली एकट्याची ताकद पोहोचू शकत नाही, याची जाणीव झाल्याबरोबर ‘गोकुळ’चे रवींद्र आपटे, स्वाभिमानी, सेना-भाजप यांच्याशी सकारात्मक चर्चा करीत जयवंतराव शिंपी यांच्या गटासोबतही चर्चेच्या फेऱ्या सुरू ठेवल्या. सभापती विष्णुपंत केसरकर राष्ट्रवादीपासून बाजूला होणार नाहीत, असे गृहीत धरून राष्ट्रवादीच्या कारभाऱ्यांनी जयवंतराव व अशोकअण्णा एकत्र येणार नाहीत, याची पुरेपूर दक्षता घेत जयवंतरावांना सोबत घेण्याचा निर्णय वरिष्ठांना घेण्यास भाग पाडले.जयवंतराव हाताला लागल्यानंतर सुधीर देसाई, उदय पवार यांनी विष्णुपंत यांची गरजच नाही, अशा पद्धतीने विधान करण्यास सुरुवात केली. केसरकर यांनी वेळीच सावध पवित्रा घेतला. उमेदवारीकरिता फरफटत जावे लागत असेल, तर निवडणुकीत आपली ‘गेम’ होण्याची शक्यता गृहीत धरून राष्ट्रवादीची संगतच नको, असे म्हणत थेट अशोकअण्णांशी हातमिळवणी केली.विष्णुपंत यांची ताकद माहिती असणाऱ्या अशोकअण्ण यांनी फारसे न ताणवता विष्णुपंत यांना सोबत घेतले. येथूनच कारखाना राजकारणाने खरी कलाटणी घेतली. अशोकअण्णा व विष्णुपंत यांनी राजकीय धूर्तपणा दाखवीत तातडीने आघाडीचे उमेदवार जाहीर केले. या सर्व गडबडीत राष्ट्रीय काँगे्रसच्या उमेदवार श्रीमती अंजनाताई रेडेकर, शिवसेनेचे प्रा. सुनील शिंत्रे यांना राष्ट्रवादीशी जवळीक करण्याशिवाय पर्याय राहिला नाही.प्रत्येक गटात नेटका उमेदवार, पाठीशी आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, माजी आमदार के. पी. पाटील यामुळे राष्ट्रवादी-राष्ट्रीय काँगे्रस आघाडी, स्थानिक मंडळी विजयाचा दावा करू लागली; पण आघाडीचे उमेदवार जाहीर होईपर्यंत महाआघाडीने प्रचाराची पहिली फेरी पूर्ण करण्याबरोबरच नाराजांची नाराजी दूर करण्यात यश मिळविले.खासदार राजू शेट्टी, सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार प्रकाश आबिटकर, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, ‘गोकुळ’चे बाबा देसाई, राजेंद्र गड्यान्नावर, तानाजी देसाई, सुनील शिंदे, माजी आमदार संजय घाटगे, महादेवराव महाडिक, सदाभाऊ खोत यांच्या सभांना एकीकडे प्रचंड प्रतिसाद मिळत असताना दुसरीकडे आमदार मुश्रीफ, पाटील यांच्या सभांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही.काँगे्रस-राष्ट्रवादीची अनेक मंडळी महाआघाडीसोबत दिसत होती. उत्तूर व पेरणोली गटाने राष्ट्रवादीला फारशी साथ दिली नाही. आमदार संध्यादेवींनी विष्णुपंतांना दुखावू नये, असा निकटवर्तीयांनी कानमंत्र दिल्याने त्या पंधरा दिवसांत कुठेच दिसल्या नाहीत. अशोकअण्णांनी मात्र राष्ट्रवादीचे अनेक मोहरे टिपले. ‘त्यांचे काय येते ?’ असा प्रश्न विचारण्यापलीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फारसे काही केले नाही.निकालानंतर मात्र महाआघाडीने सुरुंग कुठे पेरले होते. हे राष्ट्रवादी-राष्ट्रीय काँगे्रसला समजले; पण तोपर्यंत राष्ट्रवादीने कारखाना गमावला, त्याचबरोबर कार्यकर्तेही गमावले.भाजपने दोन जागांसह कारखान्यात सन्मानाने प्रवेश मिळविला. सेना, स्वाभिमानीलाही प्रतिनिधित्व मिळाले आहे. तब्बल विद्यमान दहा संचालकांना मात्र कट्ट्यावर बसावे लागले आहे.-आजरा कारखाना निवडणूक -विश्लेषण