शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

पक्षांतर्गत कुरघोडीमुळे राष्ट्रवादीने कारखाना गमावला

By admin | Updated: May 25, 2016 23:27 IST

वाऱ्याचे रूपांतर वादळात : निवडणूक ठरली बदलत्या समीकरणाची नांदी; आगामी निवडणुकांत राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढणार

ज्योतीप्रसाद सावंत --आजरागत पंचवार्षिक निवडणुकीत समविचारी पक्ष व संघटनांच्या मदतीने सत्तांतर घडविण्यात यशस्वी झालेल्या राष्ट्रवादीने या निवडणुकीत मात्र अंतर्गत गटबाजी थेट चव्हाट्यावर आणत पक्षातील काही मंडळींना ते पक्षापासून बाजूला कसे होतील, याची फिल्डिंग लावल्यामुळे पक्षाचे नुकसान होणार नाही, असा निष्कर्षही काढला; पण पक्षातून बाजूला झालेल्या अशोकअण्णा चराटी व विष्णुपंत केसरकर यांनी सेना-भाजप व स्वाभिमानीच्या मदतीने तयार केलेल्या वाऱ्याचे वादळात रूपांतर झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर कारखाना गमाविण्याची वेळ आली. महाआघाडीची सत्ता राष्ट्रवादीच्या आर्थिक नाड्या आवळणारी तर ठरलीच; पण त्याचबरोबर आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीसह विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढविणारी ठरणार आहे. ‘आजरा’ साखर कारखान्यासाठी जिल्हा बँकेचे संचालक अशोकअण्णा चराटी यांनी निवडणुकीची चाचपणी सुरू केली होती. या चाचपणीत आपली एकट्याची ताकद पोहोचू शकत नाही, याची जाणीव झाल्याबरोबर ‘गोकुळ’चे रवींद्र आपटे, स्वाभिमानी, सेना-भाजप यांच्याशी सकारात्मक चर्चा करीत जयवंतराव शिंपी यांच्या गटासोबतही चर्चेच्या फेऱ्या सुरू ठेवल्या. सभापती विष्णुपंत केसरकर राष्ट्रवादीपासून बाजूला होणार नाहीत, असे गृहीत धरून राष्ट्रवादीच्या कारभाऱ्यांनी जयवंतराव व अशोकअण्णा एकत्र येणार नाहीत, याची पुरेपूर दक्षता घेत जयवंतरावांना सोबत घेण्याचा निर्णय वरिष्ठांना घेण्यास भाग पाडले.जयवंतराव हाताला लागल्यानंतर सुधीर देसाई, उदय पवार यांनी विष्णुपंत यांची गरजच नाही, अशा पद्धतीने विधान करण्यास सुरुवात केली. केसरकर यांनी वेळीच सावध पवित्रा घेतला. उमेदवारीकरिता फरफटत जावे लागत असेल, तर निवडणुकीत आपली ‘गेम’ होण्याची शक्यता गृहीत धरून राष्ट्रवादीची संगतच नको, असे म्हणत थेट अशोकअण्णांशी हातमिळवणी केली.विष्णुपंत यांची ताकद माहिती असणाऱ्या अशोकअण्ण यांनी फारसे न ताणवता विष्णुपंत यांना सोबत घेतले. येथूनच कारखाना राजकारणाने खरी कलाटणी घेतली. अशोकअण्णा व विष्णुपंत यांनी राजकीय धूर्तपणा दाखवीत तातडीने आघाडीचे उमेदवार जाहीर केले. या सर्व गडबडीत राष्ट्रीय काँगे्रसच्या उमेदवार श्रीमती अंजनाताई रेडेकर, शिवसेनेचे प्रा. सुनील शिंत्रे यांना राष्ट्रवादीशी जवळीक करण्याशिवाय पर्याय राहिला नाही.प्रत्येक गटात नेटका उमेदवार, पाठीशी आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, माजी आमदार के. पी. पाटील यामुळे राष्ट्रवादी-राष्ट्रीय काँगे्रस आघाडी, स्थानिक मंडळी विजयाचा दावा करू लागली; पण आघाडीचे उमेदवार जाहीर होईपर्यंत महाआघाडीने प्रचाराची पहिली फेरी पूर्ण करण्याबरोबरच नाराजांची नाराजी दूर करण्यात यश मिळविले.खासदार राजू शेट्टी, सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार प्रकाश आबिटकर, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, ‘गोकुळ’चे बाबा देसाई, राजेंद्र गड्यान्नावर, तानाजी देसाई, सुनील शिंदे, माजी आमदार संजय घाटगे, महादेवराव महाडिक, सदाभाऊ खोत यांच्या सभांना एकीकडे प्रचंड प्रतिसाद मिळत असताना दुसरीकडे आमदार मुश्रीफ, पाटील यांच्या सभांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही.काँगे्रस-राष्ट्रवादीची अनेक मंडळी महाआघाडीसोबत दिसत होती. उत्तूर व पेरणोली गटाने राष्ट्रवादीला फारशी साथ दिली नाही. आमदार संध्यादेवींनी विष्णुपंतांना दुखावू नये, असा निकटवर्तीयांनी कानमंत्र दिल्याने त्या पंधरा दिवसांत कुठेच दिसल्या नाहीत. अशोकअण्णांनी मात्र राष्ट्रवादीचे अनेक मोहरे टिपले. ‘त्यांचे काय येते ?’ असा प्रश्न विचारण्यापलीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फारसे काही केले नाही.निकालानंतर मात्र महाआघाडीने सुरुंग कुठे पेरले होते. हे राष्ट्रवादी-राष्ट्रीय काँगे्रसला समजले; पण तोपर्यंत राष्ट्रवादीने कारखाना गमावला, त्याचबरोबर कार्यकर्तेही गमावले.भाजपने दोन जागांसह कारखान्यात सन्मानाने प्रवेश मिळविला. सेना, स्वाभिमानीलाही प्रतिनिधित्व मिळाले आहे. तब्बल विद्यमान दहा संचालकांना मात्र कट्ट्यावर बसावे लागले आहे.-आजरा कारखाना निवडणूक -विश्लेषण