शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

पक्षांतर्गत कुरघोडीमुळे राष्ट्रवादीने कारखाना गमावला

By admin | Updated: May 25, 2016 23:27 IST

वाऱ्याचे रूपांतर वादळात : निवडणूक ठरली बदलत्या समीकरणाची नांदी; आगामी निवडणुकांत राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढणार

ज्योतीप्रसाद सावंत --आजरागत पंचवार्षिक निवडणुकीत समविचारी पक्ष व संघटनांच्या मदतीने सत्तांतर घडविण्यात यशस्वी झालेल्या राष्ट्रवादीने या निवडणुकीत मात्र अंतर्गत गटबाजी थेट चव्हाट्यावर आणत पक्षातील काही मंडळींना ते पक्षापासून बाजूला कसे होतील, याची फिल्डिंग लावल्यामुळे पक्षाचे नुकसान होणार नाही, असा निष्कर्षही काढला; पण पक्षातून बाजूला झालेल्या अशोकअण्णा चराटी व विष्णुपंत केसरकर यांनी सेना-भाजप व स्वाभिमानीच्या मदतीने तयार केलेल्या वाऱ्याचे वादळात रूपांतर झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर कारखाना गमाविण्याची वेळ आली. महाआघाडीची सत्ता राष्ट्रवादीच्या आर्थिक नाड्या आवळणारी तर ठरलीच; पण त्याचबरोबर आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीसह विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढविणारी ठरणार आहे. ‘आजरा’ साखर कारखान्यासाठी जिल्हा बँकेचे संचालक अशोकअण्णा चराटी यांनी निवडणुकीची चाचपणी सुरू केली होती. या चाचपणीत आपली एकट्याची ताकद पोहोचू शकत नाही, याची जाणीव झाल्याबरोबर ‘गोकुळ’चे रवींद्र आपटे, स्वाभिमानी, सेना-भाजप यांच्याशी सकारात्मक चर्चा करीत जयवंतराव शिंपी यांच्या गटासोबतही चर्चेच्या फेऱ्या सुरू ठेवल्या. सभापती विष्णुपंत केसरकर राष्ट्रवादीपासून बाजूला होणार नाहीत, असे गृहीत धरून राष्ट्रवादीच्या कारभाऱ्यांनी जयवंतराव व अशोकअण्णा एकत्र येणार नाहीत, याची पुरेपूर दक्षता घेत जयवंतरावांना सोबत घेण्याचा निर्णय वरिष्ठांना घेण्यास भाग पाडले.जयवंतराव हाताला लागल्यानंतर सुधीर देसाई, उदय पवार यांनी विष्णुपंत यांची गरजच नाही, अशा पद्धतीने विधान करण्यास सुरुवात केली. केसरकर यांनी वेळीच सावध पवित्रा घेतला. उमेदवारीकरिता फरफटत जावे लागत असेल, तर निवडणुकीत आपली ‘गेम’ होण्याची शक्यता गृहीत धरून राष्ट्रवादीची संगतच नको, असे म्हणत थेट अशोकअण्णांशी हातमिळवणी केली.विष्णुपंत यांची ताकद माहिती असणाऱ्या अशोकअण्ण यांनी फारसे न ताणवता विष्णुपंत यांना सोबत घेतले. येथूनच कारखाना राजकारणाने खरी कलाटणी घेतली. अशोकअण्णा व विष्णुपंत यांनी राजकीय धूर्तपणा दाखवीत तातडीने आघाडीचे उमेदवार जाहीर केले. या सर्व गडबडीत राष्ट्रीय काँगे्रसच्या उमेदवार श्रीमती अंजनाताई रेडेकर, शिवसेनेचे प्रा. सुनील शिंत्रे यांना राष्ट्रवादीशी जवळीक करण्याशिवाय पर्याय राहिला नाही.प्रत्येक गटात नेटका उमेदवार, पाठीशी आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, माजी आमदार के. पी. पाटील यामुळे राष्ट्रवादी-राष्ट्रीय काँगे्रस आघाडी, स्थानिक मंडळी विजयाचा दावा करू लागली; पण आघाडीचे उमेदवार जाहीर होईपर्यंत महाआघाडीने प्रचाराची पहिली फेरी पूर्ण करण्याबरोबरच नाराजांची नाराजी दूर करण्यात यश मिळविले.खासदार राजू शेट्टी, सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार प्रकाश आबिटकर, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, ‘गोकुळ’चे बाबा देसाई, राजेंद्र गड्यान्नावर, तानाजी देसाई, सुनील शिंदे, माजी आमदार संजय घाटगे, महादेवराव महाडिक, सदाभाऊ खोत यांच्या सभांना एकीकडे प्रचंड प्रतिसाद मिळत असताना दुसरीकडे आमदार मुश्रीफ, पाटील यांच्या सभांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही.काँगे्रस-राष्ट्रवादीची अनेक मंडळी महाआघाडीसोबत दिसत होती. उत्तूर व पेरणोली गटाने राष्ट्रवादीला फारशी साथ दिली नाही. आमदार संध्यादेवींनी विष्णुपंतांना दुखावू नये, असा निकटवर्तीयांनी कानमंत्र दिल्याने त्या पंधरा दिवसांत कुठेच दिसल्या नाहीत. अशोकअण्णांनी मात्र राष्ट्रवादीचे अनेक मोहरे टिपले. ‘त्यांचे काय येते ?’ असा प्रश्न विचारण्यापलीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फारसे काही केले नाही.निकालानंतर मात्र महाआघाडीने सुरुंग कुठे पेरले होते. हे राष्ट्रवादी-राष्ट्रीय काँगे्रसला समजले; पण तोपर्यंत राष्ट्रवादीने कारखाना गमावला, त्याचबरोबर कार्यकर्तेही गमावले.भाजपने दोन जागांसह कारखान्यात सन्मानाने प्रवेश मिळविला. सेना, स्वाभिमानीलाही प्रतिनिधित्व मिळाले आहे. तब्बल विद्यमान दहा संचालकांना मात्र कट्ट्यावर बसावे लागले आहे.-आजरा कारखाना निवडणूक -विश्लेषण