शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

...तर राष्ट्रीयीकृत बँका चालू देणार नाही

By admin | Updated: December 26, 2016 21:38 IST

हसन मुश्रीफ यांचा इशारा : एटीएमसमोर जनावरे बांधू; गोरंबे येथे विविध विकासकामांचे उद्घाटन

म्हाकवे : काळा पैसा बंद करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान मोदी यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला. एकीकडे त्यांनी घोषणा केल्याप्रमाणे परदेशातील काळा पैसा आणून आम्हा सर्वांच्या खात्यावर पंधरा लाख भरण्याची आम्ही वाट बघत आहोत, तर दुसरीकडे ५० दिवसांत नोटाबंदीमुळे बिकट झालेली परिस्थिती सुधारण्याची आशा पंतप्रधान दाखवीत आहेत. २८ तारखेला ही ५० दिवसांची मुदत संपत आहे, त्यानंतर परिस्थिती न सुधारल्यास राष्ट्रवादी रस्त्यावर उतरेल. आम्ही राष्ट्रीयीकृत बँका चालू देणार नाही. एटीएमसमोर जनावरे बांधण्याचा इशारा आमदार हसन मुश्रीफ यांनी दिला.गोरंबे (ता. कागल) येथे ग्रामविकास महाआघाडीच्या वतीने विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सरपंच पांडुरंग पाटील होते. मुश्रीफ म्हणाले, स्वत:च्या खात्यावरील पैसे काढण्यासाठी नागरिकांना वेठीस धरले जाते, यासारखे दुर्दैव नाही. याशिवाय आघाडी सरकारने गोरगरिबांसाठी सुरू केलेल्या धान्य, केरोसीन, गरिबांची पेन्शन बंद करण्याचा घाट भाजप सरकारने घातला आहे; परंतु मी या अडीच हजार लाभार्थ्यांची पेन्शन पुन्हा सुरू करून ती सहाशेवरून दोन हजार रुपये प्रतिमहिना केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. जनतेने मला चारवेळा आमदार व तीनवेळा मंत्री होण्याची संधी दिली. त्यामुळेच मी माझ्या आयुष्यातला क्षण अन् क्षण त्यांच्यासाठी वेचला. गट-तट न बघता आजही आठवड्याला किमान दहा मोफत आॅपरेशन माझ्या फौंडेशनमार्फत केली जातात.जयसिंग पाटील, दत्ता पाटील-केनवडेकर, पिंटू दावणे यांची भाषणे झाली. बळवंत पाटील, शहाजी पाटील, उपसरपंच लता अरुण चौगुले, साताप्पा इंगळे, विष्णू कांबळे, नारायण पाटील, दत्ता दंडवते, प्रकाश चौगुले, तानाजी बुडके, संजय दादू पाटील, हिंदुराव बुजवडे, ईश्वरा पाटील, प्रवीण सुतार उपस्थित होते. सरपंच शिवाजी बाजीराव पाटील यांनी स्वागत केले. चंद्रकांत पाटील (हुरे) यांनी आभार मानले. (वार्ताहर)देशात प्रथम क्रमांकाचा दर देऊ कागलच्या शाहू आणि हमीदवाडा येथील साखर कारखान्यांत आपले योगदान असूनही आपल्याला या कारखान्यांत राहता आले नाही, याचे शल्य व्यक्त करून आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, आता आपला घोरपडे कारखाना सुरू होऊन दोनच वर्षे झाली आहेत. अजून त्याचे कर्जाचे पाच हप्ते देणे बाकी आहे. त्याची परतफेड झाल्यानंतर हा साखर कारखाना देशात पहिल्या क्रमांकाचा दर देईल.मी झोळी घेऊन आलो म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींनी सर्वांनाच झोळी घ्यायला लावल्याचा टोला लगावून राष्ट्रवादी रस्त्यावर उतरून आंदोलन करील, असा इशारा त्यांनी दिला.राज्यात आदर्श सरपंच गट-तट न बघता स्वत:ला झोकून देऊन किती चांगल्याप्रकारे गावचे काम करता येते याचे आदर्श उदाहरण म्हणून शिवाजी पाटील यांच्याकडे बघावे लागेल, असे गौरवोद्गार आमदार मुश्रीफ यांनी काढले.